शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तनातून समाजप्रबोधन करणारी ‘क्रांती’ !

By अनिल लगड | Updated: May 28, 2020 17:50 IST

सालेवडगाव (ता.आष्टी, जि.बीड) येथील कीर्तनकार कुमारीका क्रांती सोनवणे हिने आठवीपासून आळंदीत अध्यात्मिक शिक्षण घेतले. ती सध्या संत, महात्म्यायाशिवाय देशभक्ती, एकात्मता, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूण हत्या, शेतकरी आत्महत्या, साधूसंताची, आई-वडिलांची सेवा, गोमातेची सेवा याविषयी ती प्रबोधन करीत आहे. यामुळे ती महिला कीर्तनकार म्हणून नावारुपाला येत आहे. 

अध्यात्म / अनिल लगड / भारतात ऐतिहासीक, धार्मिक परंपरा पूर्वीपासून चालत आहे. अनेक संत, महात्म्ये आपल्या देशात निर्माण होऊन गेले. त्यांच्या विचारांचा वारसा आजही अनेक जण पुढे नेत आहेत. यात अध्यात्मिक क्षेत्र आघाडीवर आहे. यातून अनेक समाजप्रबोधनकार, कीर्तनकार, प्रवचनकार संत विचारांचा वारसा पुढे नेत आहेत. या संत विचारांचा प्रसार,  प्रचार  देशातील तीर्थक्षेत्र, धार्मिक स्थळे, गावोगावचे सप्ताह, उरूस, यात्रा उत्सवांमधून कीर्तनकार, प्रवचनकार करतात. यात महिला देखील मागे राहिल्या नाहीत. आता ग्रामीण भागातूनही अनेक कुमारीका मुलींपासून महिला देखील या क्षेत्रात पुढे आल्या आहेत.

 बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सालेवडगाव हे नगर-बीड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेले छोटेसे खेडेगाव. या खेडेगावातील क्रांती नानासाहेब सोनवणे ही अध्यात्मिक शिक्षक घेऊन कीर्तन, प्रवचन करीत आहे. क्रांती हिचा जन्म १४ एप्रिल २००० रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. क्रांती ही चार वर्षाची असताना २००४ मध्ये महाराष्टÑात मोठा दुष्काळ पडला होता. पिण्यासाठी पाणी नसल्याने क्रांतीच्या वडिलांना जनावरे घेऊन आष्टी येथे छावणीत जावे लागले. सोबत आई पण होती. त्यांचा मुक्काम आष्टीच्या छावणीत असे. परंतु तेथे आईचे वडील तिचे आजोबा तुकाराम खंडू पवार हे आष्टीतच रहात होते. क्रांती हिचे आजोबा कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते. ते कम्य्ुनिस्ट विचारांचे होते. क्रांतीला तिची आई आष्टीतच आजोबांकडे घेऊन रहात. आई पण वडिलांना मदत करायला छावणीत जात असे. घरात क्रांती लहान असताना रांगत रांगत घरातील देवघरातील सर्व देव गोळा करीत. घरातच ती देवांचा खेळ ती मांडत असे तिचे वडील सांगतात. परंतु आष्टी येथे आल्यानंतर तिला मात्र नवेनवे वाटू लागले. परंतु तिचा नाविलाज होता. आष्टी येथे आजोबा रहात असलेल्या गल्लीतील महिला, मुली दत्त मंदिरात जात. क्रांतीला लहानपणापासून खेळातच देवांचे धडे मिळाले. यामुळे तिला देवदेवताचे आकर्षण वाटे. महिला दत्त मंदिरात जाताना तिला चल मंदिरात... असे खुणावत. परंतु माझे आजोबा कम्युनिस्ट विचारांचे असल्याने ते देवाला मानत नसत. या महिलांच्या मागे ती लागायची मला आजोबा रागायचे. मग क्रांती रडायची. क्रांती रडली की आजोबा मंदिरात जायला परवानगी देत. 

    मग हळू हळू क्रांती आष्टीच्या गावातील दत्त मंदिरात जाऊ लागली. मला देवाची आवड निर्माण झाली. तेथे आरती, पूजापाठ असा नित्यक्रम रोज सुरू झाला. दिगंबरा..दिगंबरा..श्रीपाद वल्लभ दिगंबरा...या जयघोषात पूजा, आरतीला ती जात. तिचे सातवीपर्यंत तिचे शिक्षणआष्टीतच झाले. सहावीत असताना आजोबा वारले. तिला मंदिरात भजन गायची आवड निर्माण झाली. ती भजन देखील म्हणू लागली. शाळेत देखील जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी यांचे पोवाडे  गाऊ लागली. तसे माझे वडील शिक्षित होते.  त्यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले. आष्टीहून उन्हाळ्याच्या सुटीत गावी आले की, तेथे गुरुवर्य शामसुंदर महाराज पुरी यांच्याकडे आम्ही जात. त्यांनीही वडिलांकडे तिला आळंदीला पाठविण्याचा आग्रह  केला. यासाठी रामकृष्ण कृष्ण हरी अनंतराव दिघे महाराज यांचीही प्रेरणा मिळाली.   

  अध्यात्माची आवड पाहता वडिलांनी मला आठवीत असताना आळंदी (जि. पुणे) येथील श्री संत भगवान बाबा मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत टाकले. संस्थेतील आमच्या गुरूवर्य सुनीताताई महाराज आंधळे यांनी आम्हाला अध्यात्माचे धडे द्यायला सुरूवात केली. संस्था नवीन असल्याने तेथे अजून सुविधा उपलब्ध नव्हत्या. तेथे चार वाजता सर्वांना स्वत:च काम करावे लागे. अनेक अडचणी होत्या. पहिल्या दिवस संस्थेत कसातरी काढला. नंतर अनेक मैत्रिणींचा ग्रुप तयार झाला. आमची संस्था इंद्रायणी नदीच्या काठावर होती. पावसाळ्यात एके  दिवशी इंद्रायणीला मोठा पूर आला. आम्ही सर्व झोपेत होते. रात्री पाऊस झाल्याने इंद्रायणीला पूर आल्याने पाणी संस्थेत शिरले. आमचे सर्व सामान वाहून गेले. जे राहिले ते सर्व भिजले. आम्ही अनेक मुलींनी पेट्या बाजूला करुन माउलींचा धावा करुन रात्र जागून काढली. त्यानंतर गुरुवर्य आंधळे महाराज यांनी आम्हाला अध्यात्माबरोबरच खडतर मार्गातून कसा मार्ग काढायचा याचेही धडे दिले. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भगवद्गीतेचा कसून अभ्यासाचे धडे दिले. अनेक संत, महात्त्म्याच्या चरित्र वाचन शिकविले. त्यातून आम्ही तेथे भजन, कीर्तनाचे धडे घेतले, असे क्रांती सांगते. 

दोन, तीन वर्षे आळंदीत शिक्षण घेतल्यानंतर क्रांती गावाकडे परतली. आई, वडीलही गावी आले होते. पाऊस, पाणी चांगले असल्याने वडिलांनी डाळिंबाची बाग लावली. त्यातून चांगले उत्पन्न मिळत आहे. नगरच्या राधाबाई काळे महाविद्यालयात ११ वी, १२ वी शिक्षण घेतले. त्यानंतर डीएमएलटीचा कोर्स केला. आता देऊळगाव घाट येथील धस महाविद्यालयात शास्त्र शाखेच्या व्दितीय वर्षात शिक्षण घेत आहे. हे करीत असताना गेल्या दोन, तीन वर्षापासून अनेक ठिकाणी कीर्तन करीत आहे. आतापर्यंत विविध गावातील सप्ताहात सुमारे २५० कीर्तन केले आहे. सध्या क्रांती संत, महात्म्ययाशिवाय देशभक्ती, एकात्मता, व्यसनमुक्ती, स्त्रभ्रूण हत्या, शेतकरी आत्महत्या, साधूसंताची, आई-वडिलांची सेवा, गोमातेची सेवा याविषयी ती प्रबोधन करीत आहे. सध्या क्रांती हिच्या कीर्तन, प्रवचनाला मोठी मागणी आहे. यामुळे भविष्यात क्रांती ही निश्चितच राष्टÑीय कीर्तनकार म्हणून नावारुपाला येईल, यात शंका नाही.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक