शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाला आरक्षण हे प्रस्थापित मराठ्यांनाच द्यायचे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:16 IST

संगमनेर तालुक्यातील साकूर येथे रविवारी (दि. २०) शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवदास जाधव, ...

संगमनेर तालुक्यातील साकूर येथे रविवारी (दि. २०) शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवदास जाधव, प्रवक्ते भानुदास शिंदे, कैलास कोळसे, कोंडाजी कडनर, बुबाजी खेमनर, संघटनेचे संगमनेर तालुकाध्यक्ष भिवाजी सोन्नर, गुलाब भोसले, नवनाथ वावरे, नवनाथ ढेंबरे, शैलेश फटांगरे, सोपान तांबे, माधव कुदनर, मल्हारी सोन्नर आदी यावेळी उपस्थित होते.

खोत म्हणाले, राज्यात आतापर्यंत ८० ते ९० टक्के मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यात सलग पंधरा वर्षे सत्तेत होते. केंद्रातदेखील ते सत्तेत होते. मग का मराठा समाजाला आरक्षण दिले नाही? कारण प्रस्थापित मराठ्यांना माहीत आहे. विस्थापित, गरीब मराठ्याचा पोरगा अधिकारी झाला तर तो आपल्या मांडीला मांडी लावून बसेल. आपली उंची कमी होईल, तो अधिकारी बनून चांगले काम करायला लागला तर लोक त्याला उद्या आमदार, खासदार, मंत्री करतील. मग आम्ही प्रस्थापित मराठ्यांनी काय गुरं राखायला जायचं का? हे प्रस्थापित मराठ्यांना माहीत असल्याने त्यांनी जाणीवपूर्वक मराठा समाजाला आरक्षण मिळू दिले नाही.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. ते ब्राह्मण असल्याने हे सगळे बगलबच्चे प्रस्थापित मराठे एक झाले आणि काही लोकांना पुढे करत त्यांनी फडणवीसांना विरोध केला. मात्र, माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन केला. मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकविले. राज्यात बिगर मराठा मुख्यमंत्री झाल्यानंतर विस्थापित मराठ्यांना आरक्षण मिळाले. अन्यथा हे आरक्षण शंभर टक्के मिळाले नसते. महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात वकील व्यवस्थित दिले नाहीत, वकिलांना माहिती दिली नाही. मराठीचे भाषांतर इंग्रजीमध्ये केले नाही. जी माहिती पुरवायला पाहिजे होती, ती माहिती हे पुरवू शकले नाहीत. त्यामुळे मराठा आरक्षण गेले. आणि आता म्हणत आहेत, आम्ही पुन्हा न्यायालयात जाणार.

------------

त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत होते. त्यामुळे

मराठा समाजाला जर आरक्षण मिळायचे असेल तर पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनाच यावे लागेल. कारण हे लांडगे मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. ओबींसीचे राजकीय आरक्षणसुद्धा या मंडळींनी घालविले. न्यायालयात वेळेत माहिती सादर न केल्याने ओंबीसी समाज सर्वच निवडणुकांमध्ये वंचित राहणार आहे, असेही माजी मंत्री सदाभाऊ खोत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

-----------------

धास्तीमुळे वसुलीची शर्यत

कोरोनाच्या काळात दुधाचे भाव पडले. शेतकऱ्यांच्या घरात पैसे येण्याचा एकमेव व्यवसाय हा दुधाचा आहे. महाविकास आघाडी सरकारने किमान दुधाला तीस रुपये प्रतिलिटर भाव द्यायला पाहिजे होता. खासगी दूध संघ तेजीच्या काळात जास्त भाव देऊन दुधाची खरेदी करतात आणि जागतिक बाजारपेठेत दूध पावडरच्या दरात घसरण झाल्यानंतर मातीमोल पद्धतीने दुधाची खरेदी केली जाते. आणि सरकार हात वरते, खासगी दूध संघांवर कारवाई करण्याचा आम्हाला अधिकार नसल्याचे सांगितले जाते. कायदे करून न्याय देण्याचा अधिकार हा सरकारचा असतो. मात्र, असे होताना दिसत नाही. सरकार आज जाते की उद्या जाते, ही धास्ती असल्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये समावेश असलेल्या तिन्ही पक्षांतील मंडळींमध्ये वसुलीची शर्यत लागलेली आहे, अशीही टीका माजी मंत्री खोत यांनी केली.