शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

'त्रिपुरातील घटनेचे पडसाद आपल्या शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात नकोत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 17:19 IST

राज्यातील तमाम जनतेला मी कर्जतमधील सभेतून आवाहन करतो की, आपल्या ईशान्य भारतात त्रिपुरा राज्यात गेल्या काही दिवसांत दुर्दैवी घटना घडत आहेत. मात्र, तेथील या घटनांबद्दल आपण सर्वांनी संवेदनशील असलंच पाहिजे

अहमदनगर - त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातील जनतेला शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अपप्रचारला कुणीही बळू पडू नये, असेही ते म्हणाले.

राज्यातील तमाम जनतेला मी कर्जतमधील सभेतून आवाहन करतो की, आपल्या ईशान्य भारतात त्रिपुरा राज्यात गेल्या काही दिवसांत दुर्दैवी घटना घडत आहेत. मात्र, तेथील या घटनांबद्दल आपण सर्वांनी संवेदनशील असलंच पाहिजे. आपण भारताचे नागरिक आहोत, परंतु तिथल्या हिंसाचाराचे पडसाद आपल्या शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात दिसणार नाहीत. इथल्या समता, बंधुतेला कुठलाही धक्का लागणार नाही, याची काळजी आपणा सर्वांना घ्यावीच लागेल, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. राज्यात जातीय व धार्मिक सलोखा टिकवण्याचं काम आपणा सर्वांना करायचं आहे. त्यामध्ये, कायदा व सुव्यवस्था कायम ठेवायची आहे. अफवा आणि अपप्रचाराला कुणीही बळू पडू नका. राज्यातील तमाम जननेतं संयम बाळगावा, सावधगिरी बाळगावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. 

कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांच्या निधीतून सुरु असलेल्या कामांचं भूमिपूजन आणि उद्धाटन समारंभ आज पार पडला. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांना मिळून तब्बल २३० कोटी रुपयांचा निधी विकासकामांना मिळाला असून त्यातून ही कामे होणार आहेत. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर(Devendra Fadnavis) निशाणा साधला.

गृहमंत्र्यांनीही केलंय शांततेचं आवाहन

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संयम बाळगावा असे कळकळीचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे. यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohit Pawarरोहित पवारTripuraत्रिपुरा