शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

एसआयटीकडे तपास न दिल्याची खंत

By admin | Updated: June 15, 2023 12:29 IST

अहमदनगर : नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या एसआयटी पथकामार्फत करण्यात यावा, अशी मागणी अंनिसचे कार्यकर्ते करीत होते़.

 अहमदनगर : नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या एसआयटी पथकामार्फत करण्यात यावा, अशी मागणी अंनिसचे कार्यकर्ते करीत होते़ मात्र, शुक्रवारी (दि़९) न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याचे आदेश दिल्यानंतर हा तपास एसआयटीमार्फतच व्हायला पाहिजे होता, अशी खंत अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केली़ नगर येथे आयोजित पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, दाभोलकर यांची हत्या होऊन ८ महिने झाले आहेत़ या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक होणे गरजेचे होते़ मात्र, या घटनेचा तपास अद्याप लागू शकला नाही़ ही घटना पुण्यात घडल्याने स्थानिक पोलीस व राज्य सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी आमची अपेक्षा होती़ मात्र, आठ महिने उलटले तरी या घटनेचा तपास लागत नाही़ त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत़ या घटनेचा तपास एसआयटीमार्फत व्हावा, अशी आमची मागणी होती़ त्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांची भेट घेतली होती़ त्यांनी एसआयटीमार्फत तपास करण्यासाठी अनुकूलता दाखविली़ मात्र, पुढे काहीही कार्यवाही केली नाही़ एसआयटी ही न्यायालयाला जबाबदेही असते़ त्यामुळे या प्रकरणाचा तपास लवकर व नि:पक्षपाती होईल, अशी अपेक्षा होती, असे पाटील म्हणाले़ दरम्यान, मुंबईतील एका कार्यकर्त्याने न्यायालयात याचिका दाखल करून दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी केली होती़ या याचिकेवर सुनावणी होऊन दाभोलकर हत्येचा तपास सीबीआयकडे देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे़ सीबीआय तपासाला आमचा विरोध नाही़ मात्र, हा तपास स्थानिक पोलिसांनी लावणे आवश्यक होते़ तो त्यांनी केला नाही़ आता सीबीआयने तात्काळ तपास लावावा, असे पाटील म्हणाले़ (प्रतिनिधी)