शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

भंडारदरा-मुळा धरण पाणलोटात पाऊस पुन्हा सक्रिय

By admin | Updated: July 29, 2014 01:04 IST

अहमदनगर : ‘श्रावण मासी हर्षमानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे’

अहमदनगर : ‘श्रावण मासी हर्षमानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे’ या काव्याच्या ओळी प्रमाणे श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी नगर जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती कायम आहे. मुळा आणि भंडारदरा धरणातील पाणीसाठा ३० टक्क्यांच्या पुढे गेला एवढीच जमेची बाजू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १८ ते २० टक्के पेरण्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)सोमवारी नोंदविलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर या काळात ४९७.४ मिमीच्या सरासरीने ६ हजार ९६३ पाऊस पडत असतो. आतापर्यंत ८८.२१ मिमीच्या सरासरीने १ हजार २०६ पाऊस झालेला आहे. पावसाची ही टक्केवारी अवघी १७ टक्के आहे. सोमवारी जामखेड १०, कर्जत ३, पाथर्डी २८, शेवगाव २१, नगर २ , नेवासा २५ झालेला आहे.धरण साठे (दशलक्ष घनफुटात)मुळा ८ हजार ११३ (३१.२० टक्के), भंडारदरा ३ हजार ६२९ (३१.२० टक्के), निळवंडे ८३४ (१६ टक्के), आढळा १४७ (१३. ८७टक्के), मांडओहळ५४.९८ (१३.७८ टक्के), घोड १८१८ (२३. ८० टक्के), खैरी १७. ६ (३.२० टक्के), सीना ३१ (१.२९ टक्के), घाटशिरस निरंक मुळात पाण्याची आवकधरणाच्या पाणलोटात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने मुळा धरणात ३२१२ क्युसेक वेगाने आवक सुरू आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळीधरणात ८३०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला. सोमवारी दिवसभर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर ढगाळ वातावरण होते़ गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने उघडिप दिली होती. परंतु सोमवार सकाळपासून संततधार पावसाला सुरूवात झाली. मुळा धरणात आतापर्यंत झालेल्या पाणीसाठ्यात वर्षभराचा पिण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे़ अजून समाधानकारक पावसाने हजेरी लावली तर शेतीसाठीही आवर्तन उपलब्ध होऊ शकते़ धरणातील साठा १३ टीएमसीच्या पुढे गेल्याशिवाय शेतीसाठी आवर्तन सोडणे अशक्य आहे़ घाटघर, हरिश्चंद्रगड परिसरात पाऊसअमृतवाहिनी प्रवरा नदीच्या उगमस्थानी असलेल्या अमृतेश्वर शिवालय परिसरासह घाटघर व हरिश्चंद्रगड आदिवासी भागात श्रावणसरींचा अभिषेक सुरु झाला आहे. गुरुवारपासून रजेवर गेलेला पाऊस सोमवारी पुन्हा सक्रिय झाला. डोंगरदरीतील ओढे-नाले खळखळत असल्याने बलठण, घाटघर, वाकी,आंबीत, कोथळे व शिळवंडी लघूपाटबंधारे तलाव ओसंडून वाहत आहेत. गेल्या चोविस तासांत भंडारदरा धरणात ११३, तर निळवंडेत ३४ दशलक्ष घनफूट नव्या पाण्याची आवक झाली आहे. बलठण व कोथळा तलावातून २०० क्युसेक, तर वाकीतून १९७ क्युसेक पाणी विसर्ग सुरूआहे. रविवारचा पाऊस व कंसात यावर्षी पडलेला एकूण पाऊस मिलीमिटरमध्ये घाटघर- ६१(१३१०), रतनवाडी- ६३ (१५६२), पांजरे १५ (७७७), वाकी- १४ (६६२), भंडारदरा- १६ (६३१), कोतूळ १ (११४), निळवंडे- १(१३६), आढळा- ०(३३), अकोले- ० (७०) पाऊस पडला. अकोले, इंदोरी, बहिरवाडी परिसरात गुरूवारी दिवसभर श्रावणसरी कोसळत होत्या. आढळा खोऱ्यातही पावसाचा जोर थोडा वाढला आहे. हरिश्चंद्रगड परिसरात पावसाचा जोर कमी झाला असून मुळा नदीपात्रातून ३ हजार ३१२ क्युसेक इतका पाणी विसर्ग सुरू आहे.