शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

लोकमत स्टींग परिणाम : टँकर चौकशीमुळे सर्वच गॅसवर; ९८ कोटींचा खर्च 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 16:29 IST

‘लोकमत’ने ११ मे २०१९ रोजी ‘एकाच दिवशी ५० गावांत स्टिंग’ करून ही अनियमितता चव्हाट्यावर आणली होती. त्यानंतर आता नुकतेच आमदार रोहित पवार यांनी टँकर घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्याने हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. 

चंद्रकांत शेळके /  अहमदनगर : जिल्ह्यात मागील वर्षी पाणीटंचाई असल्याने प्रशासनाने गावोगावी टँकर सुरू केले खरे, परंतु यातील अनियमितता व गैरव्यवहारामुळेच टँकरची चर्चा अधिक झाली. ‘लोकमत’ने ११ मे २०१९ रोजी ‘एकाच दिवशी ५० गावांत स्टिंग’ करून ही अनियमितता चव्हाट्यावर आणली होती. त्यानंतर आता नुकतेच आमदार रोहित पवार यांनी टँकर घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्याने हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. २०१८-१९ मध्ये पावसाअभावी जिल्ह्यात मोठी पाणीटंचाई निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने गावोगावी टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. परंतु प्रारंभीच टँकरची निविदा प्रक्रिया संशयास्पद आढळली.  टँकर ठेकेदारांनी चढ्या दराने निविदा भरल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या निविदा रद्द करणे गरजेचे असताना उलट ठेकेदारांच्या मागणीप्रमाणे टँकरचे दर वाढविण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला़ शासनानेही खुशाल दर वाढविले़ दुसरीकडे त्याच वेळी बीडच्या जिल्हाधिकाºयांनी टँकरच्या वाढीव दराच्या निविदा रद्द केल्या होत्या़ दरम्यान, टँकर सुरू झाले. दिवसेंदिवस टँकरचा आकडा वाढतच होता. जून महिन्यात तर टँकरचा आकडा उच्चांकी ८७३ पर्यंत पोहोचला. यात सर्वाधिक टँकर पाथर्डी (१४६) तालुक्यात होते. त्यानंतर पारनेर (१२०), कर्जत (८५), श्रीगोंदा (७९)  येथेही टँकरचा आकडा मोठा होता. ऐन उन्हाळ्यात जेव्हा लोकांना पाण्याची खरी गरज होती, त्याच वेळी या टँकरमध्ये अनियमितता सुरू होती. त्यामुळे ‘लोकमत‘ने स्टिंग करून पाहणी केली तर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. टँकरची जीपीएस यंत्रणा सुरु नसणे, वेळेवर खेपा न होणे, टँकरला गळती, गावातील महिला समितीच्या सह्या नसणे, ठरलेल्या खेपा न करणे, कोरे लॉगबुक, पाणी ठरलेल्या उद्भवाऐवजी न भरता दुसरीकडूनच भरणे आदी बाबींवर यामुळे प्रकाश पडला. आता आमदार रोहित पवार यांनी या टँकर घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्याने अधिकारी-कर्मचा-यांसह पुरवठादार ठेकेदारांनाही धास्ती भरली आहे. जीपीएस यंत्रणा कार्यान्वित नसताना गटविकास अधिका-यांनी बिले कशी काढली? बीडच्या निविदा रद्द झाल्या, मग नगरच्या का झाल्या नाहीत, यासह अनेक बाबी या चौकशीतून पुढे येण्याची शक्यता आहे. सन २०१९-२० मध्ये पाणीटंचाईवर झालेला खर्च असा- खासगी विहिरी अधिग्रहण -९९ लाख ७४ हजार, नळयोजना दुरूस्ती -३ कोटी २६ लाख, विहिरी खोलीकरण - १३ लाख ६६ हजार, टँकर-९८ कोटी २४ लाख.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणीfraudधोकेबाजीdroughtदुष्काळ