शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अमरधाममधील बांधकाम थांबविण्याचे आदेश

By admin | Updated: September 4, 2016 00:01 IST

अहमदनगर : अमरधाम स्मशानभूमीतील मुलांची दफनभूमी उकरून गाळेधारकांनी केलेल्या बांधकामावरून शहरात संतापजनक वातावरण असतानाही या बांधकामाबाबत कोणताही ठोस निर्णय न घेता स्थायी समितीमध्ये केवळ चर्चा रंगली.

अहमदनगर : अमरधाम स्मशानभूमीतील मुलांची दफनभूमी उकरून गाळेधारकांनी केलेल्या बांधकामावरून शहरात संतापजनक वातावरण असतानाही या बांधकामाबाबत कोणताही ठोस निर्णय न घेता स्थायी समितीमध्ये केवळ चर्चा रंगली. बांधकामाला तातडीने स्थगिती देण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत. मात्र तसे आदेश चार दिवसांपूर्वीच देवून बांधकाम थांबविल्याचे उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी स्पष्ट केले. अमरधाममधील अवैध बांधकामाचा ठराव विखंडित करणे आणि झालेले बांधकाम हटविण्याबाबत सभापतींनी मौन बाळगले. अवैध बांधकामाबाबत महासभेत चर्चा करण्याचे मोघम उत्तर देवून सभापतींनीही वेळ मारून नेली.अमरधाम स्मशानभूमीतील गाळेधारकांनी गाळ््यांच्या मागे असलेली अमरधाममधील मुलांच्या दफनभूमीच्या जागेवरच अतिक्रमण केले आहे. याबाबत वर्तमानपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी बांधकाम थांबविण्याचे आदेश दिले होते. याबाबत खासदार दिलीप गांधी यांनी मोटारसायकल रॅली काढून जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना निवेदन देवून सदरचे बांधकाम पाडण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीची सभा सुरू होताच सदस्य बाळासाहेब बोराटे यांनी अमरधाममधील अवैध बांधकामाचा प्रश्न उपस्थित केला. याबाबत शहरात ज्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत, याबाबत सभेला सविस्तर माहिती दिली आणि सदरचे बांधकाम हटविण्याबाबत आक्रमक भाषेत मागणी केली. मात्र त्यांच्या मागणीकडे सभापतींसह प्रशासनानेही दुर्लक्ष केले. याबाबत महासभेत नेमका काय ठराव झाला होता, याचे वाचन सभेत झाले. मुलांची दफनभूमी उकरली आहे. मृतदेह उकरून काढण्याचे प्रयत्न झाले आहेत. असे असताना झालेले बांधकाम पाडून तेथे पुन्हा संरक्षक भिंत घालावी आणि दफनभूमी सुरक्षित करावी, अशी बोराटे यांनी ओरड केली. मात्र त्यांचा मुद्दा स्थायी समिती आणि प्रशासनाला कळालाच नाही. बांधकाम थांबविण्याचे आदेश सभापती जाधव यांनी देवून याबाबत महासभेत चर्चा करू, असे मोघम उत्तर त्यांना ऐकायला मिळाले. दरम्यान महासभेत झालेला बोगस ठराव विखंडित करून अमरधाममधील जागा गाळेधारकांकडून पुन्हा ताब्यात घेण्याबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने स्थायी समितीमधील चर्चाही फोल ठरली.(प्रतिनिधी)