शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

कांदा लिलाव बंद पाडले

By admin | Updated: March 26, 2024 18:35 IST

अकोले : व्यापार्‍यांच्या मनमानीला कंटाळून कृषी उत्पन्न बाजार समितीत संतप्त कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कांदा लिलाव बंद पाडले.

अकोले : व्यापार्‍यांच्या मनमानीला कंटाळून कृषी उत्पन्न बाजार समितीत संतप्त कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कांदा लिलाव बंद पाडले. रविवारी सायंकाळी सहा वाजता झालेल्या या गोंधळामुळे बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. संतप्त शेतकर्‍यांनी आवारासमोर ठिय्या देत निषेधाच्या घोषणा दिल्या. तर विक्रीसाठी आणलेला कांदा पावसामुळे भिजल्याने एका वृध्द शेतकर्‍याने फेट्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला माञ इतर शेतकर्‍यांनी व आंदोलकांनी त्याची समजूत काठल्याने अनर्थ टळला. आंदोलकांची आक्रमक भूमिका पाहून भिजलेल्या कांद्याची बाजार समिती जबाबदारी घेईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगत सोमवारी सकाळी उरलेल्या कांद्याचा लिलाव करण्याचे ठरले. भिजलेल्या कांद्याची हमी बाजार समितीने घ्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली. बाजार समितीचे उपाध्यक्ष उपस्थित होते. अध्यक्ष माञ आंदोलकांसमोर आले नाहीत. बाजार समितीत निवडणूका होणार असल्याने सध्या कुणाचे लक्ष नसल्याचे शेतकरी बोलत होते. दुसर्‍या दिवशी राहिलेले लिलाव करण्याचे ठरले. आंदोलनाचे नेतृत्व माकप किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केले. शंकरराव वाळुंज, सदाशिव घोडसरे, सुरेश भोर, लक्ष्मण नेहे, ज्ञानेश्वर आरोटे आदींसह मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी होते. (तालुका प्रतिनिधी) व्यापार्‍यांच्या तक्रारी बाजार समितीत कांदा खरेदी करणारे व्यापारी मनमानी करतात, दिवसा लिलाव करत नाही, राञी उशीरा लिलाव होतो. सर्व व्यापारी वेळेत येत नाही. लॉबी करुन शेतकर्‍यांचा माल कमी भावाने घेतला जातो असा आरोप करत संतप्त शेतकर्‍यांनी लिलाव बंद पाडले. उशिराने आलेल्या व्यापार्‍याच्या गाडीला घेराव घालत समिती प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.