शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

डाळिंबावर तेल्या रोग, शेतकऱ्यांनी नष्ट केल्या बागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:26 IST

संगमनेर तालुक्यातील पठारभागात अनेक ठिकाणी डाळिंब बागांवर तेल्या व मर रोग आल्याने शेतकऱ्यांनी बागा तोडायला सुरुवात केली आहे. सध्या ...

संगमनेर तालुक्यातील पठारभागात अनेक ठिकाणी डाळिंब बागांवर तेल्या व मर रोग आल्याने शेतकऱ्यांनी बागा तोडायला सुरुवात केली आहे. सध्या तालुक्यात अधून-मधून पडणारा पाऊस, मध्येच पडणारे कडक ऊन यामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अतिवृष्टीनंतर झालेल्या फुल गळतीमुळे शेतकऱ्यानी कसातरी मोठा खर्च करून, विविध औषधे वापरून डाळिंबाची सेटिंग झाले. परंतु सध्या हवामानातील बदलामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना तेल्याग्रस्त डाळिंब तोडून ती फेकून द्यावी लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी गेली वर्ष दोन वर्षे विविध संकटांशी सामना करीत मोठा खर्च करून आलेल्या बागाही तेल्याने जात आहेत. डाळिंबासाठी बहार धरण्यासाठी केलेल्या आजवरचा खर्च, खते-औषधे यांची दुकानदारांची देणी व वर्षभरासाठी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा. आता जगायचे तरी कशावर..? या आर्थिक प्रश्नांमुळे डाळिंब उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान, तेल्या व मर रोगावर शाश्वत औषधे नसल्याने व इतर औषधांवर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याने संगमनेर तालुक्यातील पठारभागातील आंबीखालसा, घारगाव, कोठे, अकलापूर, बोटा, नांदूर आदी गावांच्या परिसरात तेल्या व मर रोगाने अनेक बागा शेतकऱ्यांनी काढल्या असल्याचे कृषी विषयक सल्लागार रमेश कदम यांनी सांगितले.

....................

तेल्या व मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी यावरील विविध कंपनीची औषधे बाजारात येत आहेत. विविध औषधांचा प्रयोग करण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. विविध उपाय सुचविले जातात. शेतकरी प्रयोग करीत असतो. परंतु या रोगांना समूळ नष्ट करण्यासाठी औषध मात्र अद्यापही मिळाले नाही. औषधांच्या खर्चामुळे वैतागून माझी अडीच एकरवरील डाळिंबाची बाग काढून टाकली आहे.

- महेंद्र गगे, शेतकरी, आंबी खालसा, संगमनेर

.......................................

अनेक वर्षांपासून डाळिंब बागेत काम करून आम्हांला रोजगार मिळतो आहे. आज याच डाळिंब बागांवर तेल्या व मर रोगामुळे कुऱ्हाड चालविण्याची वेळ आली आहे. याच्यासारखे मोठे दुःख नाही.

- बाळासाहेब जाधव, शेत मजूर