शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
4
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
5
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
6
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
7
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
8
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
9
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
10
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
11
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
12
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
13
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
14
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
15
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
16
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
17
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
18
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
19
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
20
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

डाळिंबावर तेल्या रोग, शेतकऱ्यांनी नष्ट केल्या बागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:26 IST

संगमनेर तालुक्यातील पठारभागात अनेक ठिकाणी डाळिंब बागांवर तेल्या व मर रोग आल्याने शेतकऱ्यांनी बागा तोडायला सुरुवात केली आहे. सध्या ...

संगमनेर तालुक्यातील पठारभागात अनेक ठिकाणी डाळिंब बागांवर तेल्या व मर रोग आल्याने शेतकऱ्यांनी बागा तोडायला सुरुवात केली आहे. सध्या तालुक्यात अधून-मधून पडणारा पाऊस, मध्येच पडणारे कडक ऊन यामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अतिवृष्टीनंतर झालेल्या फुल गळतीमुळे शेतकऱ्यानी कसातरी मोठा खर्च करून, विविध औषधे वापरून डाळिंबाची सेटिंग झाले. परंतु सध्या हवामानातील बदलामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना तेल्याग्रस्त डाळिंब तोडून ती फेकून द्यावी लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी गेली वर्ष दोन वर्षे विविध संकटांशी सामना करीत मोठा खर्च करून आलेल्या बागाही तेल्याने जात आहेत. डाळिंबासाठी बहार धरण्यासाठी केलेल्या आजवरचा खर्च, खते-औषधे यांची दुकानदारांची देणी व वर्षभरासाठी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा. आता जगायचे तरी कशावर..? या आर्थिक प्रश्नांमुळे डाळिंब उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान, तेल्या व मर रोगावर शाश्वत औषधे नसल्याने व इतर औषधांवर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याने संगमनेर तालुक्यातील पठारभागातील आंबीखालसा, घारगाव, कोठे, अकलापूर, बोटा, नांदूर आदी गावांच्या परिसरात तेल्या व मर रोगाने अनेक बागा शेतकऱ्यांनी काढल्या असल्याचे कृषी विषयक सल्लागार रमेश कदम यांनी सांगितले.

....................

तेल्या व मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी यावरील विविध कंपनीची औषधे बाजारात येत आहेत. विविध औषधांचा प्रयोग करण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. विविध उपाय सुचविले जातात. शेतकरी प्रयोग करीत असतो. परंतु या रोगांना समूळ नष्ट करण्यासाठी औषध मात्र अद्यापही मिळाले नाही. औषधांच्या खर्चामुळे वैतागून माझी अडीच एकरवरील डाळिंबाची बाग काढून टाकली आहे.

- महेंद्र गगे, शेतकरी, आंबी खालसा, संगमनेर

.......................................

अनेक वर्षांपासून डाळिंब बागेत काम करून आम्हांला रोजगार मिळतो आहे. आज याच डाळिंब बागांवर तेल्या व मर रोगामुळे कुऱ्हाड चालविण्याची वेळ आली आहे. याच्यासारखे मोठे दुःख नाही.

- बाळासाहेब जाधव, शेत मजूर