शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

आता ग्राहकांना मिळणार जलदगतीने न्याय; गजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

By अरुण वाघमोडे | Updated: July 29, 2020 12:56 IST

अहमदनगर : देशात २० जुलैपासून नवीन ग्राहक संरक्षण कायदा लागू झाला आहे. या कायद्यात नवीन तरतुदी काय आहेत, आता ग्राहकाला तातडीने न्याय मिळेल का? या संदर्भात ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र क्षीरसागर यांच्याशी ‘लोकमत’ ने संवाद साधला.

संडे मुलाखत

भारतात ग्राहक संरक्षण कायदा कधी लागू झाला होता?भारतीय ग्राहक चळवळीचे जनक व ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष बिंदुमाधव जोशी यांच्या अथक परिश्रमातून भारतात १९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा लागू झाला. या कायद्यामुळे ग्राहक शोषण मुक्तीचे एक पर्व सुरू झाले. या कायद्यात मात्र काळानुरूप अनेक बदल होणे गरजेचे होते. गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. कायद्यातील नवीन तरतुदी लागू कराव्यात, अशी सर्व स्तरातून मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवीन तरतुदी लागू करून महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

काय तरतुदी आहेत नवीन कायद्यात?२० जुलैपासून दाखल होणाºया दाव्यांची सुनावणी नवीन कायद्यानुसार होईल. नवीन कायद्याने ‘ग्राहक’ ही व्याख्या अधिक व्यापक केली आहे. या कायद्यानुसार ग्राहकांना नुकसान भरपाईची मोठी रक्कम मागता येणार आहे. दोन वर्षांमध्ये ग्राहक राहतो किंवा जेथे नोकरी, व्यवसाय करतो त्या ठिकाणी, तक्रार करू शकतो. २१ दिवसात तक्रार दाखल करून घेत विरुद्ध पक्ष यांना नोटीस देणे बंधनकारक आहे. तक्रारीवर तीन महिन्यात निकाल देणे बंधनकारक आहे. सुनावणीचे दिवशी ग्राहक, अनुपस्थित राहिला तरी तक्रार खारीज न करता कागदपत्रांच्या आधारे निर्णय देता येईल. ग्राहकाचे म्हणणे ऐकल्याशिवाय, तक्रार खारीज करता येणार नाही.

आॅनलाईन वस्तू खरेदीत फसवणूक झाल्यास दाद मागता येईल का?कमीत कमी तारखांमध्ये जलद निर्णय देणे हा नवीन कायद्याचा आत्मा आहे. ग्राहकांना दिशाभूल करणाºया जाहिराती दाखवल्यास कारवाई केली जाणार आहे. तसेच आॅनलाईन आणि टेलिशॉपिंग कंपन्यांनी लुबाडणूक केल्यास त्यांना चाप बसणार आहे. सर्व तरतुदी ग्राहक हिताचे आहेत मात्र या कायद्याची तंतोतंत आणि तातडीने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

 नवीन कायद्याची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत?ग्राहक तक्रारींची वाढलेली व्याप्ती, ग्राहक न्यायालयांना दिलेले वाढीव अधिकार, केवळ दंड किंवा भरपाईऐवजी सदोष किंवा बनावट उत्पादनाबद्दल उत्पादक व विक्रेत्यास तुरुंगातही धाडणे, फसव्या अथवा अतिरंजित जाहिरातीबद्दल उत्पादकाप्रमाणेच, ती जाहिरात करणाºया ‘सेलिब्रिटीं’यांनाही  जबाबदार धरणे आणि दाव्याचा निकाल देण्यापूर्वी प्रकरण मध्यस्थीने सोडविण्याचा प्रयत्न करणे ही या कायद्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत. 

ग्राहकांच्या अधिकारात वाढ झाली आहे का?नवीन कायद्यानुसार ग्राहकांच्या अधिकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हा कायदा आता सर्व प्रकारच्या वस्तू व सेवा यांना लागू आहे. जो व्यक्ती मोबदला देऊन वस्तू किंवा सेवा खरेदी करतो, तो ग्राहक समजण्यात येतो. यामध्ये उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करणाºयांचा समावेश होतो. ग्राहकाने कोठेही खरेदी केली तरी तो ज्या ठिकाणी राहतो किंवा नोकरी, व्यवसाय करतो तेथील ग्राहक आयोगात तक्रार दाखल करू शकतो. आता ग्राहकाला कोणत्याही जिल्ह्यात दावा दाखल करता येणार आहे. ग्राहक मंचाचे नाव आता जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग असे करण्यात आले आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे बिल्डर, विमा कंपनी, रेल्वे, टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनी, मोबाईल कंपनी, बँका आणि पुरवठादार संस्थांनी दिलेल्या सदोष सेवेच्या विरोधात दाद मागता येते. पूर्वी वीस लाखांपेक्षा जास्त ते एक कोटी किमतीच्या वस्तूंची फसवणूक झाल्यास ग्राहकाला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागावी लागत होती. आता जिल्हा ग्राहक आयोगात एक कोटी रुपये पर्यंतच्या तक्रारी दाखल करता येतील.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरinterviewमुलाखत