शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

शहरांचा दूध पुरवठा रोखणार, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 14:08 IST

दुधाला सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रतिलिटर किमान २७ रुपये भाव द्या, या प्रमुख मागणीसाठी राज्यभर आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.

अहमदनगर -  दुधाला सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रतिलिटर किमान २७ रुपये भाव द्या, या प्रमुख मागणीसाठी राज्यभर आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. लुटणे थांबवा, शरम नसेल तर ‘फुकटच’ न्या, असे ग्रामसभांमध्ये ठराव करत सरकारला मोफत दुध पुरवण्याचा पवित्रा दुध उत्पादकांनी घेतला आहे. ३ ते ९ मे यादरम्यान राज्यभर चौकाचौकात मोफत दूध वाटप सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. 

भाजपाचे आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींना ‘लुटता कशाला फुकटच न्या’ म्हणात दूध प्यायला खास आमंत्रण दिली जाणार आहेत. तहसील कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये व शहरातील प्रमुख चौकात दूध गरम करून प्याल्यात भरून वाटप करण्याचे कार्यक्रम सर्व दूध उत्पादक जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. सर्व पक्ष, संघटनांचे  कार्यकर्ते, नेते या आंदोलनात सहभागी होत आहेत. सात दिवस या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी रास्तारोको, धरणे, मोर्चे व घेराव घालून आंदोलन तिव्र करण्यात येणार आहे.आंदोलनाच्या तयारीसाठी अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी व बीड जिल्ह्यात दुध उत्पादकांचे जिल्हाव्यापी मिळावे घेऊन नियोजन करण्यात आले आहे. दूध क्षेत्रात कार्यरत असलेल्या अभ्यासू बुद्धीजीवींनी ही आंदोलनात सहभागी होण्याची भूमिका घेतली आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर कोसळल्याने राज्यात दुधाचा महापूर आल्याचे सरकार कडून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र शेतक-यांकडून ३.५ फॅट व ८.५ एस. एन. एफ. चे गायीचे दूध संकलित केले जात असताना त्यात प्रक्रियेच्या नावाखाली पाणी व रसायनांची भेसळ केली जाते. भेसळ करून ते दूध ३.५ ऐवजी १.५ फॅट गुणवत्तेचे केले जाते. असे करताना एका दुधाच्या टॅकरचे तीन टॅकर तयार करून त्याला ‘टोन दूध’ असे नाव देत पिशव्यांमधून ते ग्राहकांच्या माथी मारले जाते. 

दुधाच्या महापुराचे हेच खरे कारण असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. दुधाचा महापूर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय बाजारात किंवा गायीच्या गोठ्यात नव्हे तर भेसळीच्या कारखान्यात तयार होतो आहे.  शेतक-यांकडून घेतलेले ३.५ फॅट व ८.५ एस. एन. एफ गुणवत्तेचे ‘गाईचे दूध’ अशा प्रकारे तिप्पट करून ‘मशिनच्या दुधात’ परिवर्तीत करून ग्राहकांच्या माथी मारले जात आहे. शिवाय शेतक-यांना ३.५ फॅट व ८.५ एस. एन. एफ. गुणवत्तेच्या दुधाला केवळ  १७ रुपये दर दिला जात असताना, गुणवत्ता घटवलेल्या १.५ फॅट गुणवत्तेच्या दुधाला मात्र ग्राहकांकडून ५० रुपये उकळले जात आहेत. सरकारच्या धोरणाचा फायदा घेत अशा प्रकारे ग्राहक व शेतकरी दोघांचीही लुटमार सुरु आहे. ग्राहक व शेतक-यांची लुटमार थांबवा, ग्राहकांना  गुणवत्ता घटविलेले ‘मशीनचे’ नव्हे तर गुणवत्तापूर्ण, भेसळ व विष मुक्त ‘गायीचे’ दूध पुरविण्याचे धोरण घ्या, सरकारने जाहीर केलेला दर शेतक-यांना मिळावा यासाठी भावांतर योजना लागू करून जाहीर दर व प्रत्यक्ष दर यातील अंतर भरून काढण्यासाठी लिटरमागे दहा रुपये अनुदान सरळ शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करा, दुधाच्या पावडरला निर्यात अनुदान द्या, शालेय पोषण आहारात दुधाचा समावेश करा व या उपायांतून दुध संकटावर मात करण्यासाठी तातडीने पावले उचला या मागण्या दूध उत्पादक संघर्ष समितीने केल्या आहेत.

लुटता कशाला फुकटच न्या असा संताप व्यक्त करत ग्रामसभेचा पहिला ठराव करणा-या औरंगाबाद जिल्ह्यातील लाखगंगा गावात सकाळी भजन कीर्तन करत दुध सरकारला फुकट देत ३ मे रोजी  व अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनच्या पूर्वसंध्येला दगडाच्या सरकारवर दुग्धाभिषेक करून आंदोलनाची सुरुवात करण्यात येत आहे.

टॅग्स :milkदूधFarmerशेतकरीagitationआंदोलन