शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

Maharashtra Election 2019: गेल्या ५ वर्षांतला युतीचा कारभार म्हणजे फटा पोस्टर निकला झिरो - अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 12:58 IST

कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक २०१९ - शिक्षण संस्थांचं जाळं उभारल्यानं बारामती विकासात्मक दृष्टिकोनातून आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगती पथावर आली

अहमदनगर - विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. गेल्या ५ वर्षांतला युतीचा कारभार म्हणजे फटा पोस्टर निकला झिरो असं म्हणायची वेळ आलीय. तरी 'मी पुन्हा येणार' असं CM सांगतात. कशासाठी? असा सवाल राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी विचारला आहे. 

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, 'मी पुन्हा येणार' असं मुख्यमंत्री सांगतात. कशासाठी? राज्याला कर्जबाजारी करण्यासाठी, बेरोजगारी वाढवण्यासाठी, संसार रस्त्यावर आणण्यासाठी, शेतकरी आत्महत्या वाढवण्यासाठी,साखर-कांदा आयात करण्यासाठी पुन्हा यायचंय? असा टोला अजित पवारांनी लगावला 

तसेच शिक्षण संस्थांचं जाळं उभारल्यानं बारामती विकासात्मक दृष्टिकोनातून आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगती पथावर आली. कर्जत-जामखेड मतदारसंघातही चांगल्या दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. महिला बचत गटाच्या वस्तू देखील बाजारात विकल्या जातील, अशी तरतूद करू असं आश्वासन अजित पवारांनी लोकांना दिलं. 

दरम्यान, कर्जत जामखेड मतदारसंघाचा रोहित पवार चांगल्या पद्धतीनं प्रतिनिधित्व करतील,असा मला विश्वास आहे. कुणाला कमीपणा वाटेल,असं काही घडणार नाही. तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. मिळालेल्या सत्तेचा वापर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी करायचा असतो, असं शरद पवार नेहमी सांगत आले आहेत. त्यामुळे रोहितला निवडून द्यावं असं आवाहन अजित पवारांनी लोकांना केले.  त्यापूर्वी बीडमध्ये झालेल्या सभेतही अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला. भाषण करताना बोलले ते तोलले पाहिजे. खोटे भाषण करणे आणि फसवणूक करणे याचा धंदा झाला आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिलांची सुरक्षा, वाढत जातीयवाद या प्रमुख समस्या असताना भाजपचे सरकार मेक इन इंडिया, शायनिंग इंडिया यामध्ये व्यस्त आहे. छत्रपती शिवरायांच्या नावाने सुरु केलेली शेतकरी कर्ज माफी योजना सपशेल फसवी असून हे भर सभेत पुराव्यानिशी अजित पवारांनी उपस्थितांना दाखवले. ज्याचं जळत त्यालाच कळत यामुळेच इतिहासात प्रथमच शेतकरी संपावर गेले. महाराष्ट्राची सत्ता आमच्या हातात द्या तीन महिन्यात ७/१२ कोरा करू असा दावा अजित पवारांनी शेतकऱ्यांना केला.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkarjat-jamkhed-acकर्जत-जामखेडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019