शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

आशुतोष काळे यांना जेवढे लीड, तेवढा जास्त निधी कोपरगावला देणार: अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2024 09:22 IST

आशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी कोपरगावात सभा

लोकमत न्यूज नेटवर्क, कोपरगाव : मागील निवडणुकीत आशुतोष काळे यांना साडेआठशेचे लीड मिळाले. यंदा कोल्हे यांनी पक्षाच्या सांगण्यानुसार थांबण्याचा निर्णय घेतला, त्यांचे धन्यवाद. आता आशुतोष काळे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. जेवढे लीड, तेवढा जास्त निधी कोपरगावला दिला जाईल. आशुतोष काळे यांना चांगली जबाबदारीसुद्धा दिली जाईल, हा माझा वादा आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी झालेल्या सभेत पवार बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते. प्रारंभी आमदार काळे म्हणाले, पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहे. कर्मवीर शंकरराव काळे यांनी सतत जनतेची कामे करीत राहण्याची शिकवण दिली. त्याच मार्गावर मी वाटचाल करीत आहे. अजित पवार यांनी मागील पाच वर्षांत भरपूर निधी दिला आहे. आपले सरकार पुन्हा येणार आहेच. तेव्हा पालखेड लाभक्षेत्रात उपसा सिंचन योजना सुरू करावी, पश्चिमेचे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याची योजना पूर्णत्वास न्यावी, झगडे फाटा ते संगमनेर आणि कोपरगाव ते वैजापूर या रस्त्यांच्या कामासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, उच्चशिक्षित, जनतेसाठी काम करणारा आमदार कोपरगावच्या जनतेने मागील निवडणुकीत दिला. विधिमंडळात देखील काळे यांनी धडाडीने काम केले आहे. आशुतोष काळे यांनी स्वतःसाठी काहीही मागितलेले नाही. ते मागतात ते मतदारसंघाच्या विकासासाठी मागतात. त्यांचे सर्व हट्ट मी पूर्ण केले आहेत. आता कोपरगावकरांनी त्यांना ८५ हजार मतांचे लीड द्यावे. त्याचे पुढचे सर्व हट्ट मी पूर्ण करतो. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसीम चोपदार यांनी आशुतोष काळे यांना पाठिंबा दिला. चोपदार यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी चारूदत्त सिनगर, विजय वहाडणे, रवींद्र बोरावके, महेमुद सय्यद यांची भाषणे झाली. व्यासपीठावर चैताली काळे, कपिल पवार, राजेश परजणे, अशोकराव रोहमारे, नितीनराव औताडे, राजेंद्र जाधव, विश्वासराव महाले, रावसाहेब रोहोम, धनंजय जाधव, कृष्णा आढाव, दत्ता काले, सुनील गंगुले, आदींची उपस्थिती होती.

मायचा लाल योजना बंद करू शकत नाही 

लाडकी बहीण योजना बंद होईल, असा कांगावा विरोधक करीत आहेत. त्यांच्या काळात त्यांनी सव्वा रुपया दक्षिणाही कुणाला दिली नाही. लाडकी बहीण योजना सुरू केल्याने महिला समाधानी आहेत. योजना सुरू ठेवण्यासाठी महायुती सरकारला पुन्हा निवडून द्या, पाच वर्षे ही योजना कोणी मायचा लाल बंद करू शकणार नाही, असेही अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकkopargaon-acकोपरगांवAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुती