शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आशुतोष काळे यांना जेवढे लीड, तेवढा जास्त निधी कोपरगावला देणार: अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2024 09:22 IST

आशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी कोपरगावात सभा

लोकमत न्यूज नेटवर्क, कोपरगाव : मागील निवडणुकीत आशुतोष काळे यांना साडेआठशेचे लीड मिळाले. यंदा कोल्हे यांनी पक्षाच्या सांगण्यानुसार थांबण्याचा निर्णय घेतला, त्यांचे धन्यवाद. आता आशुतोष काळे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. जेवढे लीड, तेवढा जास्त निधी कोपरगावला दिला जाईल. आशुतोष काळे यांना चांगली जबाबदारीसुद्धा दिली जाईल, हा माझा वादा आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी झालेल्या सभेत पवार बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते. प्रारंभी आमदार काळे म्हणाले, पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहे. कर्मवीर शंकरराव काळे यांनी सतत जनतेची कामे करीत राहण्याची शिकवण दिली. त्याच मार्गावर मी वाटचाल करीत आहे. अजित पवार यांनी मागील पाच वर्षांत भरपूर निधी दिला आहे. आपले सरकार पुन्हा येणार आहेच. तेव्हा पालखेड लाभक्षेत्रात उपसा सिंचन योजना सुरू करावी, पश्चिमेचे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याची योजना पूर्णत्वास न्यावी, झगडे फाटा ते संगमनेर आणि कोपरगाव ते वैजापूर या रस्त्यांच्या कामासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, उच्चशिक्षित, जनतेसाठी काम करणारा आमदार कोपरगावच्या जनतेने मागील निवडणुकीत दिला. विधिमंडळात देखील काळे यांनी धडाडीने काम केले आहे. आशुतोष काळे यांनी स्वतःसाठी काहीही मागितलेले नाही. ते मागतात ते मतदारसंघाच्या विकासासाठी मागतात. त्यांचे सर्व हट्ट मी पूर्ण केले आहेत. आता कोपरगावकरांनी त्यांना ८५ हजार मतांचे लीड द्यावे. त्याचे पुढचे सर्व हट्ट मी पूर्ण करतो. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसीम चोपदार यांनी आशुतोष काळे यांना पाठिंबा दिला. चोपदार यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी चारूदत्त सिनगर, विजय वहाडणे, रवींद्र बोरावके, महेमुद सय्यद यांची भाषणे झाली. व्यासपीठावर चैताली काळे, कपिल पवार, राजेश परजणे, अशोकराव रोहमारे, नितीनराव औताडे, राजेंद्र जाधव, विश्वासराव महाले, रावसाहेब रोहोम, धनंजय जाधव, कृष्णा आढाव, दत्ता काले, सुनील गंगुले, आदींची उपस्थिती होती.

मायचा लाल योजना बंद करू शकत नाही 

लाडकी बहीण योजना बंद होईल, असा कांगावा विरोधक करीत आहेत. त्यांच्या काळात त्यांनी सव्वा रुपया दक्षिणाही कुणाला दिली नाही. लाडकी बहीण योजना सुरू केल्याने महिला समाधानी आहेत. योजना सुरू ठेवण्यासाठी महायुती सरकारला पुन्हा निवडून द्या, पाच वर्षे ही योजना कोणी मायचा लाल बंद करू शकणार नाही, असेही अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकkopargaon-acकोपरगांवAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुती