शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 13:17 IST

Rohit Patil : दिवंगत नेते आर आर पाटील (आबा) यांचे पुत्र रोहित पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

Rohit Patil ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचारसभा सुरू आहेत. काल महाविकास आघाडीची अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांच्यासाठी प्रचारसभा झाली. या सभेत दिवंगत नेते आर आर पाटील (आबा) यांचे पुत्र रोहित पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. रोहित पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल

"निलेश लंके जर साधा माणूस असता तर नगर दक्षिणमध्ये देशाच्या पंतप्रधानांना सभा घेण्याची का गरज भासली याच उत्तर भाजपाच्या उमेदवाराने देण्याची आवश्यक्ता आहे, असा टोलाही रोहित पाटील यांनी सुजय विखे पाटील यांना लगावला.'देवेंद्र फडणवीस साहेब भाषणाला उभे राहिले की सांगतात की, इथल्या स्थानिक उमेदवाराकडे बघू नका. पंतप्रधान मोदींना करायचं आहे तुम्ही त्यांच्याकडे बघून मत द्या. आता याचा एकच अर्थ होतो की त्यांचा स्थानिक उमेदवारावर त्यांचा विश्वास नसावा. पाथर्डीला बैलांचा मोठा बाजार भरतो. इथले अनेक लोक बाजारात जात असतील, बैल खरेदी करत असतील, बैल विकत असतील. मालकाकडे बघून बैल खरेदी केला असं एकरी उदाहरण महाराष्ट्रात आहे का? उद्या आमचे प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीतून मोदी साहेब इकडे येणार आहेत का?, असा सवाल रोहित पाटील यांनी केला.

रोहित पाटील म्हणाले, मतदानाचे आणखी टप्पे वाढवले असते तर बोधे गावात सुद्धा सभा घ्यायला यांनी मागे पुढे बघितले नसते. एवढी दयनीय परिस्थिती यांच्या पक्षाची झाली आहे.  

काँग्रेस सरकारचं नगर जिल्ह्यात मोठं काम 

"महाराष्ट्र वेगळपण महाराष्ट्राने नेहमी जपलं. राज्यावर काँग्रेस तसेच सर्वच घटक पक्षाने उपकार केले आहेत. १९७२ च्या दुष्काळात मोठं काम केले आहे. नगर जिल्ह्याने अनेक मोठी माणस घडवली. सगळ्या नेत्यांचे उपकार या परिसरावर आहेत. या उपकाराची जर परतफेड व्हायची असेलतर या निवडणुकीपेक्षा दुसरी कोणतीही संधी नाही. ही देशाची निवडणूक आहे. देशाचा पंतप्रधान निवडण्याची ही निवडणूक आहे. महाराष्ट्रातील लोकांना माझा एक सवाल आहे, छत्रपती शिवाजी महाराजांपासून आम्ही एक स्वप्न बघत आहे, महाराष्ट्रातून कुणीतरी उठावं आणि दिल्ली काबीज करावी. दिल्लीवरती राज्य करावे, पवार साहेबांच्या माध्यमातून ही संधी आली होती. पण, तानाजी मालुसरेंसारखी कोणी साथ देण्याऐवजी सूर्याजी पिसाळ होऊन पाय खेचण्याचे काम आमच्याच मातीत केले. आता पवार साहेबांचा दिल्लीत मान वाढवायचा असेल तर आपण सर्वांनी महाराष्ट्रातून पवार साहेबांच्या मागे खासदार वाढवले पाहिजेत, असंही रोहित पाटील म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४