शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी की स्वबळ...कार्यकर्त्यांचा संभ्रम संपवा !

By admin | Updated: June 5, 2014 00:07 IST

अहमदनगर : काँग्रेसने पराभवाबाबत चिंतन केले आहे. त्याची कारणमीमांसा झाल्याने उपाययोजना सुरू आहेत.

अहमदनगर : काँग्रेसने पराभवाबाबत चिंतन केले आहे. त्याची कारणमीमांसा झाल्याने उपाययोजना सुरू आहेत. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी करून लढायचे की स्वबळावर हे पक्षश्रेष्ठींनी ठरविले पाहिजे. लोकसभा किंवा विधानसभा पातळीवर आघाडी असते. मात्र स्थानिक पातळीवर कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध लढतात. यातून संभ्रम वाढतो. त्यामुळे यापुढे राजकारण आघाडीचे करायचे की स्वबळाचे हे एकदाचे ठरवून टाकण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट मत युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ कार्यालयास तांबे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी संपादकीय विभागाशी युवक काँग्रेसचे धोरण, निवडणुकीबाबत रणनीती, पराभवाबाबत उपाययोजना आदी विषयांवर गप्पा मारल्या. पराभवाची कारणे सापडूनही त्याच्यावर उपाययोजना न केल्यास यश मिळणे कठीण आहे. दोन्ही काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकमेकांविरूद्ध लढतात. त्यातून कार्यकर्त्यांत कटुता निर्माण होते. आणि ऐन निवडणुकीत नेते मनोमीलनाचे आवाहन करतात. त्यावेळी मनोमीलन कसे होईल, असा सवालही तांबे यांनी उपस्थित केला. आगामी निवडणुकीसाठी आताच रणनीती ठरली पाहिजे, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या पराभवाबाबत सर्वांनी आपापल्या पद्धतीने विश्लेषण केले आहे. मात्र, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या चिंतन बैठकीनंतर उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. युवक व एनएसयुआय (विद्यार्थी संघटना)यांचे भविष्यातील धोरण काय असावे हे ठरविण्यासाठी देशपातळीवर एक समिती नेमली आहे. आठ दिवसांत हे धोरण ठरेल. युवक काँग्रेसमध्ये ठराविक काळानंतरच नेतृत्वाची संधी मिळत असल्याने संघटना वाढीस मर्यादा येतात, असेही त्यांनी मान्य केले. दरम्यान, पक्षाने आदेश दिल्यास अहमदनगर शहर काय कोठूनही विधानसभेची उमेदवारी करण्यास तयार असल्याचे त्यांनी शेवटी सांगीतले.(प्रतिनिधी)यूपीए सरकारने अनेक लोककल्याणाच्या योजना आणल्या. मात्र, त्याचे मार्केटिंग करता आले नाही. आम्ही प्रशासनावर अवलंबून राहिलो. कार्यकर्ता म्हणून कोणी कामच केले नाही. भाजपाने प्रचाराची प्रत्येक यंत्रणा वापरली. आरएसएसनेही मोठी भूमिका बजावली. आमच्या बोलण्यातील, वागण्यातील मुजोरी नडली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत विसंवाद झाला, त्यातून पराभव ओढावला, असे आज्यच्या स्थितीचे विश्लेषण करता येईल. मात्र, मोदींनी अवास्तव स्वप्न दाखविली आहेत. ती पूर्ण न झाल्यास लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडेल. ते देशासाठी घातक ठरेल, अशी भितीही तांबेंनी व्यक्त केली.आगामी निवडणुकीत तरूणांना ३० टक्के जागांवर उमेदवारी दिली जाणार आहे. विधानसभा आणि लोकसभा हे दोन्ही फॅक्टर वेगळे आहेत. तरूणांना संधी दिल्यास नक्कीच काँग्रेसला यश मिळेल. रणनीती ठरविल्यास कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर होईल. नगर जिल्ह्यात काँग्रेसला ५, राष्ट्रवादी ७ असे सूत्र आहे. एक जागा त्यांच्याकडे जास्त आहे. दोघांचीही ताकद सारखी असल्याने दोघांना प्रत्येकी ६ जागा पाहिजे, अशी मागणीही तांबे यांनी केली.