चुकीने वगळलेली नावे समाविष्ट करा
By Admin | Updated: June 20, 2014 00:38 IST2014-06-20T00:36:28+5:302014-06-20T00:38:43+5:30
अहमदनगर : भारतीय निवडणूक आयोगाचे सचिव अनुज जयपुरीया यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील मतदार जनजागृती कामाचा आढावा घेतला.

चुकीने वगळलेली नावे समाविष्ट करा
अहमदनगर : भारतीय निवडणूक आयोगाचे सचिव अनुज जयपुरीया यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील मतदार जनजागृती कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी चुकीने ज्या मतदारांची नावे वगळली गेली असतील ते नव्याने समाविष्ट करण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी अनिल कवडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुनिल माळी आणि जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. केंद्रिय सविच जयपुरीया म्हणाले की, जिल्ह्यात जानेवारी २०१४ या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्रांसह मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. हा कार्यक्रम ३० जून पर्यंत सुरू राहणार असून त्या अनुशंगाने मतदार जागृती कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे.
ज्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आलेली आहेत. ती नावे पुन्हा यादीत घेणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असणारा फॉर्म क्रमांक सहा सर्व तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आलेला आहेत. ज्या मतदारांचा मृत्यू झाला असेल, त्यांची डबल नावे मतदार यादीत असतील त्यांची नावे वगळण्यासाठी विशेष मोहिम राबविणे आवश्यक आहे. प्रत्येक गावात ज्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक एकत्र येत असतील. उदाहरणार्थ दूध डेअरी, स्वस्त धान्य दुकाने, बँका, बचत गट, सहकारी संस्था, पतसंस्था, महाविद्यालय, विवाह नोंदणी कार्यालय त्या ठिकाणी हा सहा नंबर फॉर्म उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी दिली. जिल्ह्यात सध्या पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. यात नावे समाविष्ट करण्याची २ हजार ३५८ प्रकरणे, नावे वगळण्याची १२३ प्रकरणे, दुरूस्तीची १७३ प्रकरणे आणि ठिकाण बदलीचे ४३ प्रकरणे असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली. देशात महाराष्ट्र राज्याला वेगळे महत्व असून राज्या नव मतदार नोंदणीचे काम जोमाने सुरू असल्याचे सचिव जयपुरीया यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)