शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

शिर्डीतून लोकसभा लढविण्यास मी तयार, भाजपा नेतृत्वाशी चर्चा करणार - रामदास आठवले

By सचिन धर्मापुरीकर | Updated: February 3, 2024 19:07 IST

प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीबरोबरच नाही तर उध्दव ठाकरेंबरोबरच जाण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप त्यांना इंडीया आघाडीत समाविष्ट करण्यात आले नाही

शिर्डी ( जि. अहमदनगर): शिर्डी लोकसभा मतदान संघातून निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक आहोत. याबाबत भाजपाचे जेष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मधुकर पिचड यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी प्राथमिक चर्चा झालेली आहे.  तांत्रिक अडचन आहे मात्र, भाजपाच्या वाट्याला शिर्डीची जागा गेल्यास आपण शिर्डीतून निवडनुक लढवण्याबाबत भाजपा नेतृत्वाशी चर्चा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगीतले.

शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी सांगीतले की,  देशात आणि राज्यात मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए मोठे यश मिळणार आहे. मोदी सरकारने संविधानाचा सन्मान केला आहे मात्र, कॉंग्रेसने सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष केला. संविधनाच्या नावावर कॉंग्रेस चुकीचा आरोप सरकारवर करत आहे. संविधनाबाबतच्या कॉंग्रेसने भाजपावर केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. उलट कॉंग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबकरांचा वारवांर केलेला अपमान दलित समाज कदापीही विसरणार नयल्याचे आठवले यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीबरोबरच नाही तर उध्दव ठाकरेंबरोबरच जाण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप त्यांना इंडीया आघाडीत समाविष्ट करण्यात आले नाही. तरी प्रकाश आंबेडकरांनी राज्यात लोकसभा निवडनुकीसाठी १२- १२-१२ जागांचा फ़ॉर्मूला आघाडीसमोर ठेवला आहे. त्याचा महाविकास आघाडीने विचार केला पाहीजे. उध्दव ठाकरे यांना भाजपामधील नेत्यांच्या घराणेशाहीबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरेंनी  स्वत:च्या मुलाला आपल्या मंत्रीमंडळात स्थान दिल्याचे त्यांच्या स्मरणात राहीलेले नाही. एकनाथ शिंदे आमदारांसमवेत भाजपासोबत आले, त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटासोबत यायला हवे होते. भविष्यात ठाकरेंची कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत राजकीय सोयरीक टीकणार नाही. त्यांनी जर भाजपासोबत येण्याची इच्छा व्यक्त केली तर आपण त्यासाठी प्रयत्न करू. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए चारशे जागांचा आकडा पार करेल असा विश्वास आठवले यानी व्यक्त केला.

 राज्यातील दलित  जनता आमच्यासोबत असल्याने वंचीतचा फटका महायुतीला अजिबात बसणार नाही. लोकसभा निवडणुकीसाठी आरपीआयला दोन जागा एनडीएकडून मिळाव्यात, यासाठी आमचा प्रयत्न आहे . लालकृष्ण आडवानी यांना भारतरत्न देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. भविष्यात अण्णाभाऊ साठे आणि महात्मा फुले यांना भारतरत्न देण्याबाबत पंतप्रधान मोदींशी आपण चर्चा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले