शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीतून लोकसभा लढविण्यास मी तयार, भाजपा नेतृत्वाशी चर्चा करणार - रामदास आठवले

By सचिन धर्मापुरीकर | Updated: February 3, 2024 19:07 IST

प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीबरोबरच नाही तर उध्दव ठाकरेंबरोबरच जाण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप त्यांना इंडीया आघाडीत समाविष्ट करण्यात आले नाही

शिर्डी ( जि. अहमदनगर): शिर्डी लोकसभा मतदान संघातून निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक आहोत. याबाबत भाजपाचे जेष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मधुकर पिचड यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी प्राथमिक चर्चा झालेली आहे.  तांत्रिक अडचन आहे मात्र, भाजपाच्या वाट्याला शिर्डीची जागा गेल्यास आपण शिर्डीतून निवडनुक लढवण्याबाबत भाजपा नेतृत्वाशी चर्चा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगीतले.

शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी सांगीतले की,  देशात आणि राज्यात मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए मोठे यश मिळणार आहे. मोदी सरकारने संविधानाचा सन्मान केला आहे मात्र, कॉंग्रेसने सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष केला. संविधनाच्या नावावर कॉंग्रेस चुकीचा आरोप सरकारवर करत आहे. संविधनाबाबतच्या कॉंग्रेसने भाजपावर केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. उलट कॉंग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबकरांचा वारवांर केलेला अपमान दलित समाज कदापीही विसरणार नयल्याचे आठवले यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीबरोबरच नाही तर उध्दव ठाकरेंबरोबरच जाण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप त्यांना इंडीया आघाडीत समाविष्ट करण्यात आले नाही. तरी प्रकाश आंबेडकरांनी राज्यात लोकसभा निवडनुकीसाठी १२- १२-१२ जागांचा फ़ॉर्मूला आघाडीसमोर ठेवला आहे. त्याचा महाविकास आघाडीने विचार केला पाहीजे. उध्दव ठाकरे यांना भाजपामधील नेत्यांच्या घराणेशाहीबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरेंनी  स्वत:च्या मुलाला आपल्या मंत्रीमंडळात स्थान दिल्याचे त्यांच्या स्मरणात राहीलेले नाही. एकनाथ शिंदे आमदारांसमवेत भाजपासोबत आले, त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटासोबत यायला हवे होते. भविष्यात ठाकरेंची कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत राजकीय सोयरीक टीकणार नाही. त्यांनी जर भाजपासोबत येण्याची इच्छा व्यक्त केली तर आपण त्यासाठी प्रयत्न करू. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए चारशे जागांचा आकडा पार करेल असा विश्वास आठवले यानी व्यक्त केला.

 राज्यातील दलित  जनता आमच्यासोबत असल्याने वंचीतचा फटका महायुतीला अजिबात बसणार नाही. लोकसभा निवडणुकीसाठी आरपीआयला दोन जागा एनडीएकडून मिळाव्यात, यासाठी आमचा प्रयत्न आहे . लालकृष्ण आडवानी यांना भारतरत्न देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. भविष्यात अण्णाभाऊ साठे आणि महात्मा फुले यांना भारतरत्न देण्याबाबत पंतप्रधान मोदींशी आपण चर्चा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले