शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

शिर्डीतून लोकसभा लढविण्यास मी तयार, भाजपा नेतृत्वाशी चर्चा करणार - रामदास आठवले

By सचिन धर्मापुरीकर | Updated: February 3, 2024 19:07 IST

प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीबरोबरच नाही तर उध्दव ठाकरेंबरोबरच जाण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप त्यांना इंडीया आघाडीत समाविष्ट करण्यात आले नाही

शिर्डी ( जि. अहमदनगर): शिर्डी लोकसभा मतदान संघातून निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक आहोत. याबाबत भाजपाचे जेष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मधुकर पिचड यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी प्राथमिक चर्चा झालेली आहे.  तांत्रिक अडचन आहे मात्र, भाजपाच्या वाट्याला शिर्डीची जागा गेल्यास आपण शिर्डीतून निवडनुक लढवण्याबाबत भाजपा नेतृत्वाशी चर्चा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगीतले.

शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी सांगीतले की,  देशात आणि राज्यात मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए मोठे यश मिळणार आहे. मोदी सरकारने संविधानाचा सन्मान केला आहे मात्र, कॉंग्रेसने सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष केला. संविधनाच्या नावावर कॉंग्रेस चुकीचा आरोप सरकारवर करत आहे. संविधनाबाबतच्या कॉंग्रेसने भाजपावर केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. उलट कॉंग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबकरांचा वारवांर केलेला अपमान दलित समाज कदापीही विसरणार नयल्याचे आठवले यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीबरोबरच नाही तर उध्दव ठाकरेंबरोबरच जाण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप त्यांना इंडीया आघाडीत समाविष्ट करण्यात आले नाही. तरी प्रकाश आंबेडकरांनी राज्यात लोकसभा निवडनुकीसाठी १२- १२-१२ जागांचा फ़ॉर्मूला आघाडीसमोर ठेवला आहे. त्याचा महाविकास आघाडीने विचार केला पाहीजे. उध्दव ठाकरे यांना भाजपामधील नेत्यांच्या घराणेशाहीबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरेंनी  स्वत:च्या मुलाला आपल्या मंत्रीमंडळात स्थान दिल्याचे त्यांच्या स्मरणात राहीलेले नाही. एकनाथ शिंदे आमदारांसमवेत भाजपासोबत आले, त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटासोबत यायला हवे होते. भविष्यात ठाकरेंची कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत राजकीय सोयरीक टीकणार नाही. त्यांनी जर भाजपासोबत येण्याची इच्छा व्यक्त केली तर आपण त्यासाठी प्रयत्न करू. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए चारशे जागांचा आकडा पार करेल असा विश्वास आठवले यानी व्यक्त केला.

 राज्यातील दलित  जनता आमच्यासोबत असल्याने वंचीतचा फटका महायुतीला अजिबात बसणार नाही. लोकसभा निवडणुकीसाठी आरपीआयला दोन जागा एनडीएकडून मिळाव्यात, यासाठी आमचा प्रयत्न आहे . लालकृष्ण आडवानी यांना भारतरत्न देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. भविष्यात अण्णाभाऊ साठे आणि महात्मा फुले यांना भारतरत्न देण्याबाबत पंतप्रधान मोदींशी आपण चर्चा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले