शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये सरकारची पणन व्यवस्था अपयशी : राधाकृष्ण विखे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 11:30 IST

कृषि व पणन विभागाच्‍या निष्‍काळजीपणामुळे शेतक-यांसमोर आव्‍हानात्‍मक परिस्थिती निर्माण झाली. अडचणीच्‍या काळातही सरकारची पणन व्‍यवस्‍था  शेतक-यांच्‍या पाठिशी सक्षमपणे उभी राहू शकली नाही, अशी खंत आ.राधाकृष्‍ण विखे यांनी व्‍यक्‍त केली. 

राहाता : कोरोना संकटाच्‍या काळात शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. कृषि व पणन विभागाच्‍या निष्‍काळजीपणामुळे शेतक-यांसमोर आव्‍हानात्‍मक परिस्थिती निर्माण झाली. अडचणीच्‍या काळातही सरकारची पणन व्‍यवस्‍था  शेतक-यांच्‍या पाठिशी सक्षमपणे उभी राहू शकली नाही, अशी खंत आ.राधाकृष्‍ण विखे यांनी व्‍यक्‍त केली. राहाता कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीने लॉकडाऊनच्‍या काळातही शेतक-यांचा शेतीमाल खरेदी करण्‍यासाठी निर्माण केलेली व्‍यवस्‍था ही शेतक-यांना दिलासा देणारी ठरली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. राहाता बाजार समितीने शासन नियमाचे पालन करुन शेतक-यांचा उत्‍पादीत माल खरेदी केला. याचा लाभ नगर जिल्‍ह्यासह शेजारील जिल्‍ह्यातील शेतक-यांनाही झाला. बाजार समितीने कांदा खरेदी कांदा खरेदी मार्केटही सुरु केले. आ.राधाकृ‍ष्‍ण विखे यांनी रविवारी बाजार समितीच्‍या आवारात कांदा उत्‍पादक शेतकरी, व्‍यापारी आणि बाजार समितीच्‍या पदाधिका-यांची सदिच्‍छा भेट घेवून त्‍यांच्‍याशी संवाद साधला. शेतकरी, व्‍यापारी आणि बाजार समितीच्‍या व्‍यवस्‍थापनासमोर असलेल्‍या अडचणी जाणून घेतल्‍या. समितीत आलेल्‍या कांदा पिकाची पाहाणी करुन मिळत असलेल्‍या भावाबाबतही त्‍यांनी जाणून घेतली.कोरोनाने संपूर्ण देश थांबला पण आमचा बळीराजा मात्र काम करीत राहिला म्‍हणूनच शेती उत्‍पादीत मालाचा पुरवठा होवू शकला. पण यासाठी शेतक-यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे  लागले. शासनाच्‍या पणन विभागाची निष्‍क्रीयता याला कारणीभूत ठरली. शासनाच्‍या अखत्‍यारीत येणाºया एकाही व्‍यवस्‍थेने शेतक-यांचा उत्‍पादीत माल खरेदी करण्‍याची इच्‍छाशक्‍ती दाखविली नाही. शासनाने शेतक-यांचा शेतीमाल खरेदी केला असता तर माल रस्‍त्‍यावर फेकून देण्‍याची वेळ आली नसती. पण दुर्दैवाने सरकारच्‍या पणन विभागाला याचे महत्‍व समजले नाही. राज्‍यातील बाजार समित्‍या नियोजनपूर्व सुरु ठेवल्‍या असत्‍या तर शेतकºयांना बाजारपेठ मिळाली असती. सध्‍या उपलब्‍ध असलेला भाजीपाला शेतक-यांनी विक्रीसाठी बाजारात आणलेला आहे. पण दुसरीकडे मात्र नवीन मालाची लागवड दिसत नाही. कांदा उत्‍पादकांनीही उत्‍पादीत झालेला संपूर्ण कांदा बाजारात आणलेला नाही. त्‍यामुळे भवि‍ष्‍यात भाजीपाल्‍याबरोबरच इतरही शेती मालाचा तुटवडा निर्माण होण्‍याची भीती विखे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरrahaataराहाताRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलMarket Yardमार्केट यार्ड