शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

लॉकडाऊनमध्ये सरकारची पणन व्यवस्था अपयशी : राधाकृष्ण विखे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 11:30 IST

कृषि व पणन विभागाच्‍या निष्‍काळजीपणामुळे शेतक-यांसमोर आव्‍हानात्‍मक परिस्थिती निर्माण झाली. अडचणीच्‍या काळातही सरकारची पणन व्‍यवस्‍था  शेतक-यांच्‍या पाठिशी सक्षमपणे उभी राहू शकली नाही, अशी खंत आ.राधाकृष्‍ण विखे यांनी व्‍यक्‍त केली. 

राहाता : कोरोना संकटाच्‍या काळात शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. कृषि व पणन विभागाच्‍या निष्‍काळजीपणामुळे शेतक-यांसमोर आव्‍हानात्‍मक परिस्थिती निर्माण झाली. अडचणीच्‍या काळातही सरकारची पणन व्‍यवस्‍था  शेतक-यांच्‍या पाठिशी सक्षमपणे उभी राहू शकली नाही, अशी खंत आ.राधाकृष्‍ण विखे यांनी व्‍यक्‍त केली. राहाता कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीने लॉकडाऊनच्‍या काळातही शेतक-यांचा शेतीमाल खरेदी करण्‍यासाठी निर्माण केलेली व्‍यवस्‍था ही शेतक-यांना दिलासा देणारी ठरली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. राहाता बाजार समितीने शासन नियमाचे पालन करुन शेतक-यांचा उत्‍पादीत माल खरेदी केला. याचा लाभ नगर जिल्‍ह्यासह शेजारील जिल्‍ह्यातील शेतक-यांनाही झाला. बाजार समितीने कांदा खरेदी कांदा खरेदी मार्केटही सुरु केले. आ.राधाकृ‍ष्‍ण विखे यांनी रविवारी बाजार समितीच्‍या आवारात कांदा उत्‍पादक शेतकरी, व्‍यापारी आणि बाजार समितीच्‍या पदाधिका-यांची सदिच्‍छा भेट घेवून त्‍यांच्‍याशी संवाद साधला. शेतकरी, व्‍यापारी आणि बाजार समितीच्‍या व्‍यवस्‍थापनासमोर असलेल्‍या अडचणी जाणून घेतल्‍या. समितीत आलेल्‍या कांदा पिकाची पाहाणी करुन मिळत असलेल्‍या भावाबाबतही त्‍यांनी जाणून घेतली.कोरोनाने संपूर्ण देश थांबला पण आमचा बळीराजा मात्र काम करीत राहिला म्‍हणूनच शेती उत्‍पादीत मालाचा पुरवठा होवू शकला. पण यासाठी शेतक-यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे  लागले. शासनाच्‍या पणन विभागाची निष्‍क्रीयता याला कारणीभूत ठरली. शासनाच्‍या अखत्‍यारीत येणाºया एकाही व्‍यवस्‍थेने शेतक-यांचा उत्‍पादीत माल खरेदी करण्‍याची इच्‍छाशक्‍ती दाखविली नाही. शासनाने शेतक-यांचा शेतीमाल खरेदी केला असता तर माल रस्‍त्‍यावर फेकून देण्‍याची वेळ आली नसती. पण दुर्दैवाने सरकारच्‍या पणन विभागाला याचे महत्‍व समजले नाही. राज्‍यातील बाजार समित्‍या नियोजनपूर्व सुरु ठेवल्‍या असत्‍या तर शेतकºयांना बाजारपेठ मिळाली असती. सध्‍या उपलब्‍ध असलेला भाजीपाला शेतक-यांनी विक्रीसाठी बाजारात आणलेला आहे. पण दुसरीकडे मात्र नवीन मालाची लागवड दिसत नाही. कांदा उत्‍पादकांनीही उत्‍पादीत झालेला संपूर्ण कांदा बाजारात आणलेला नाही. त्‍यामुळे भवि‍ष्‍यात भाजीपाल्‍याबरोबरच इतरही शेती मालाचा तुटवडा निर्माण होण्‍याची भीती विखे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरrahaataराहाताRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलMarket Yardमार्केट यार्ड