शहरं
Join us  
Trending Stories
1
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
2
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
3
सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
4
राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
5
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
6
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
7
महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
8
Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
9
तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?
10
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
11
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
12
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
13
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
14
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
15
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
16
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
17
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
18
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
19
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
20
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये सरकारची पणन व्यवस्था अपयशी : राधाकृष्ण विखे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 11:30 IST

कृषि व पणन विभागाच्‍या निष्‍काळजीपणामुळे शेतक-यांसमोर आव्‍हानात्‍मक परिस्थिती निर्माण झाली. अडचणीच्‍या काळातही सरकारची पणन व्‍यवस्‍था  शेतक-यांच्‍या पाठिशी सक्षमपणे उभी राहू शकली नाही, अशी खंत आ.राधाकृष्‍ण विखे यांनी व्‍यक्‍त केली. 

राहाता : कोरोना संकटाच्‍या काळात शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. कृषि व पणन विभागाच्‍या निष्‍काळजीपणामुळे शेतक-यांसमोर आव्‍हानात्‍मक परिस्थिती निर्माण झाली. अडचणीच्‍या काळातही सरकारची पणन व्‍यवस्‍था  शेतक-यांच्‍या पाठिशी सक्षमपणे उभी राहू शकली नाही, अशी खंत आ.राधाकृष्‍ण विखे यांनी व्‍यक्‍त केली. राहाता कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीने लॉकडाऊनच्‍या काळातही शेतक-यांचा शेतीमाल खरेदी करण्‍यासाठी निर्माण केलेली व्‍यवस्‍था ही शेतक-यांना दिलासा देणारी ठरली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. राहाता बाजार समितीने शासन नियमाचे पालन करुन शेतक-यांचा उत्‍पादीत माल खरेदी केला. याचा लाभ नगर जिल्‍ह्यासह शेजारील जिल्‍ह्यातील शेतक-यांनाही झाला. बाजार समितीने कांदा खरेदी कांदा खरेदी मार्केटही सुरु केले. आ.राधाकृ‍ष्‍ण विखे यांनी रविवारी बाजार समितीच्‍या आवारात कांदा उत्‍पादक शेतकरी, व्‍यापारी आणि बाजार समितीच्‍या पदाधिका-यांची सदिच्‍छा भेट घेवून त्‍यांच्‍याशी संवाद साधला. शेतकरी, व्‍यापारी आणि बाजार समितीच्‍या व्‍यवस्‍थापनासमोर असलेल्‍या अडचणी जाणून घेतल्‍या. समितीत आलेल्‍या कांदा पिकाची पाहाणी करुन मिळत असलेल्‍या भावाबाबतही त्‍यांनी जाणून घेतली.कोरोनाने संपूर्ण देश थांबला पण आमचा बळीराजा मात्र काम करीत राहिला म्‍हणूनच शेती उत्‍पादीत मालाचा पुरवठा होवू शकला. पण यासाठी शेतक-यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे  लागले. शासनाच्‍या पणन विभागाची निष्‍क्रीयता याला कारणीभूत ठरली. शासनाच्‍या अखत्‍यारीत येणाºया एकाही व्‍यवस्‍थेने शेतक-यांचा उत्‍पादीत माल खरेदी करण्‍याची इच्‍छाशक्‍ती दाखविली नाही. शासनाने शेतक-यांचा शेतीमाल खरेदी केला असता तर माल रस्‍त्‍यावर फेकून देण्‍याची वेळ आली नसती. पण दुर्दैवाने सरकारच्‍या पणन विभागाला याचे महत्‍व समजले नाही. राज्‍यातील बाजार समित्‍या नियोजनपूर्व सुरु ठेवल्‍या असत्‍या तर शेतकºयांना बाजारपेठ मिळाली असती. सध्‍या उपलब्‍ध असलेला भाजीपाला शेतक-यांनी विक्रीसाठी बाजारात आणलेला आहे. पण दुसरीकडे मात्र नवीन मालाची लागवड दिसत नाही. कांदा उत्‍पादकांनीही उत्‍पादीत झालेला संपूर्ण कांदा बाजारात आणलेला नाही. त्‍यामुळे भवि‍ष्‍यात भाजीपाल्‍याबरोबरच इतरही शेती मालाचा तुटवडा निर्माण होण्‍याची भीती विखे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरrahaataराहाताRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलMarket Yardमार्केट यार्ड