शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बागा जमीनदोस्त, घर जळाले

By admin | Updated: June 5, 2014 00:07 IST

संगमनेर : मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोरदार तडाखा तालुक्यातील विविध गावांना बसला असून वीजवाहक खांब मोठ्या प्रमाणावर कोसळले.

संगमनेर : मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोरदार तडाखा तालुक्यातील विविध गावांना बसला असून वीजवाहक खांब मोठ्या प्रमाणावर कोसळले. त्यामुळे अनेक गावांना अंधाराचा सामना करावा लागला. रस्त्यावरील व शेत बांधावरील छोटे-मोठे वृक्ष, वीजवाहक सिमेंटचे खांब, पाचटाची व पत्र्याची घरे या वादळात अनेक ठिकाणी पडली. तळपेवाडी येथे घराची भिंत पडल्यामुळे काही जण किरकोळ जखमी झाल्याचे नायब तहसीलदार शितलकुमार सावळे यांनी सांगितले. ज्या गावांमध्ये वादळामुळे नुकसान झाले आहे तेथे पंचनामे करण्याचा सूचना तलाठी व कृषी सहाय्यकांना दिल्याचे प्रांताधिकारी संदीप निचित यांनी सांगितले. दरम्यान या वादळामुळे सर्वाधिक नुकसान महावितरणचे झाले आहे. मंगळापूर, चिखली, कासारा-दुमाला, राजापूर, धांदरफळ, निमज, साकूर, घारगाव व अन्य गावांमध्ये वीजवाहक खांब मोठ्या प्रमाणावर पडले. ूमहावितरणने महत्त्वाच्या वीजवाहिन्या दुरूस्त केल्या असल्या तरी उपवाहिन्या दुरूस्त करण्यास उशीर लागणार आहे. (वार्ताहर) सात्रळ : राहुरी तालुक्यातील सात्रळ सोनगाव, धानोरे परिसरावर मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले. वीज पडून एका शेतकर्‍याचे घर जळाले. राहुरी तालुक्यातील सात्रळ पंचक्रोषीला मंगळवारी सायंकाळी गारपिटीचा मोठा तडाखा बसला. तुफानी वार्‍यासह जोरदार पाऊस व मोठ्या आकाराच्या गारांनी परिसराला जबरदस्त तडाखा दिला. गारांच्या तडाख्याने लोखंडी पत्रांना छिद्रे पडली. अनेकांची पत्रे उडाली. गाड्यांच्या काचा फुटल्या. त्यातच मंगळवारी सात्रळ परिसराचा आठवडे बाजार असल्याने बाजाराची पुरत वाट लागली. गारांच्या तडाख्याने तंबू फाटले, भाजीपाल्याचे नुकसान झाले. परिसरातील शेतकर्‍यांचे शेती मालाचे प्रचंड नुकसान झाले. डॉ. पंजाबी यांचे साडेपाच एकर टरबुजाच्या शेतीचे नुकसान झाले. अ‍ॅड. विजयराव कडू यांच्या सहा एकर केशर जातीच्या आंब्याच्या बागेचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. पंचायत समिती सदस्य डुक्रे यांची डाळींब बागही उद्धवस्त झाली. विठ्ठल ताजणे या शेतकर्‍याच्या राहत्या घरावर वीज पडून संपूर्ण घर जळून खाक झाले. सुदैवाने दहाच मिनिटे अगोदर संपूर्ण कुटुंब शेजारच्या वस्तीवर गेले होते म्हणून मोठा अनर्थ टळला. दिलीप कडू या शेतकर्‍याची गाय छप्पर पडून जखमी झाली. परिसरामध्ये विजेचे खांब वाकून संपूर्ण तारा तुटल्या. गेल्या वीस तासांपासून परिसरामध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. उसाचीही मोठी हानी झाली आहे. कृषी व महसूल खात्याचे अधिकारी घटनास्थळी जावून पाहणी करून पंचनामे करीत आहेत. (वार्ताहर) अकोले : तालुक्यात सोमवारी झालेल्या वादळाने आढळा खोर्‍यातील डाळिंबाची झाडे मुळासकट उपटून पडल्याने डाळींब उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून पीक नुकसानीचे पंचनामे करावे, अशी मागणी होत आहे. गणोरे, विरगाव, देवठाण, कळस, सुगाव, तांभोळ, सांगवी, केळीरुम्हणवाडी परिसराला मंगळवारी वादळ वार्‍याचा तडाखा बसला. डाळिंब झाडांच्या ओळीच्या ओळी उन्मळून पडल्या आहे. विरगावफाटा येथे वीज पडून दोन बैल ठार झाले. सुगाव येथे प्रवासी जीपवर बाभळीचे झाड पडले. देवठाण येथील आश्रमशाळेचे पन्नास पञे उडून गेले. तांभोळ रस्त्यावर झाड पडून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. धामणगाव पाट येथील सरस्वती विद्यालयाच्या तीन खोल्यांचे पञे उडून गेले. (तालुका प्रतिनिधी)