शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

नाशिक-पुणे महामार्गावर मालवाहू ट्रकला आग, ट्रकचा उरला फक्त सांगाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 10:28 IST

संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी परिसरातील घटना ; जीवितहानी नाही; चालक फरार

घारगाव (जि अहमदनगर) : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावच्या हद्दीत रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अचानक आग लागली. सुदैवाने, यात कोणतीही जिवतहानी हानी झाली नाही. मात्र, ट्रक जळून खाक झाला. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही, चालक मात्र फरार झाला आहे.              

प्रथमदर्शनी हा ट्रक अज्ञात वाहनाला पाठीमागुन धडकल्याने आग लागल्याची चर्चा आहे. दरम्यान, नाशिककडे जाणाऱ्या वाहनांचा रांगा लागल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून नाशिकच्या दिशेने वाहनांचे साहित्य घेऊन ट्रक (क्रमांक - एम.पी.०९ ,एच.जी.०११२) नाशिकच्या दिशेने निघाला होता. ट्रक रविवारी पहाटे तीन वाजलेच्या सुमारास खंदरमाळवाडी गावच्या हद्दीत आला असता ट्रकने पेट घेतला. प्रथमदर्शनी ट्रक अज्ञात वाहनाला पाठीमागून धडकला असावा म्हणून ट्रकने पेट घेतला असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यावेळी चालक फरार झाल्याने कारण अस्पष्ट आहे.

दरम्यान, ट्रकला आग लागल्याचे माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील साळवे, मनेष शिंदे, उमेश गव्हाणे यांसह घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र लांघे, संतोष खैरे,पोलीस कॉन्स्टेबल नामदेव बिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. संगमनेर महानगरपालिकेचे व साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. दोन्ही अग्निशामक बंबद्वारे ट्रक विझवण्यात आला. मात्र, सकाळी ट्रकच्या टायरची आग सुरूच होती. यात ट्रकचा फक्त सांगाडा शिल्लक राहीला आहे. अद्यापपर्यंत एकेरी वाहतूक सुरू आहे. मागील काही दिवसांपूर्वी याच महामार्गावर चंदनापुरी घाटात बारावीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या चालत्या ट्रकला आग लागली होती. 

टॅग्स :highwayमहामार्गAccidentअपघातfireआगAhmednagarअहमदनगर