शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धटेक भक्तनिवासाची चौथ्यांदा निविदा प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:19 IST

सिद्धटेक : सिद्धटेक (ता. कर्जत) येथील शासकीय भक्तनिवासाची तिसरी निविदा प्रक्रिया रद्द झाल्यानंतर गुरुवारी (दि. २२) ‘लोकमत’ने याबाबत वृत्त ...

सिद्धटेक : सिद्धटेक (ता. कर्जत) येथील शासकीय भक्तनिवासाची तिसरी निविदा प्रक्रिया रद्द झाल्यानंतर गुरुवारी (दि. २२) ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच चौथ्यांदा निविदा प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेत आता जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.

साडेतीन वर्षांपासून बंद असलेली कोट्यवधी रुपयांच्या वास्तूची दुरवस्था होत आहे. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर तत्काळ दुसऱ्या दिवशी शुक्रवारी भक्त निवास, बहुउद्देशीय सभागृह, आदी वास्तू भाडेतत्त्वावर देण्याची चौथी निविदा काढली. पूर्वीचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सिद्धटेकला भेट देऊनही त्यांना ही वास्तू सुरू करण्यात यश आले नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ३० नोव्हेंबरला सिद्धटेकला भेट देऊन जम्बो बैठक घेतली. परंतु, त्यांनाही हे भक्तनिवास सुरू करण्यात अद्याप यश आलेले नाही. चौथ्या निविदेत तरी वास्तू सुरू होण्यास यशस्वी होतात की नाही हे काळच ठरवेल.

अष्टविनायकांपैकी एक सिद्धटेक हे भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे. दर दिवशी हजारो भाविक या ठिकाणी भेट देत असतात. परंतु, दौंड-पुणे येथे निवासासाठी चांगली व्यवस्था असल्याने बरेच भाविक तिकडेच थांबण्यास प्राधान्य देतात.

सिद्धटेक येथील भक्त निवास, बहुउद्देशीय सभागृह, व्यापारी गाळे आदी वास्तू सुरू झाल्यास भाविक सिद्धटेक येथे थांबू शकतात. त्यामुळे शासकीय महसुलासह स्थानिक बाजारपेठेसही उर्जितावस्था येईल. यासाठी वरील वास्तू सुरू होणे आवश्यक आहे.

------

भाडेतत्त्वाबाबतच्या दराचा विचार व्हावा...

ग्रामीण भाग, या वास्तूविषयी शासनाचे असलेले धरसोडीचे धोरण, वास्तूचे झालेले निकृष्ट काम, ठेक्याचा असलेला कमी कालावधी, पायभूत जास्त दराची बोली यामुळे ठेकेदार ठेका घेण्यास तयार नाहीत. प्रशासन मात्र शहरी दराने या वास्तू भाडेतत्त्वावर देण्याबाबत अडून बसले आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया वेळोवेळी रद्द होत आहे.

यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने ग्रामीण भागाचा व भाविकांना सेवा देण्याचा विचार करता ठेक्याची मुदत पाच वर्षांसाठी व कमी दराने देऊन कोट्यवधीच्या वास्तूची दुरवस्था टाळावी, अशी भावना भाविकांमध्ये आहे.

---

२४सिद्धटेक

सिद्धटेक येथील बंद अवस्थेतील भक्तनिवास.