शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक शेतीला फाटा देत फुलवली संत्र्याची बाग, व्यापाऱ्याकडून 81 लाखांत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 11:13 IST

पारंपरिक पिके घेऊन हाती काहीच पडत नव्हते. तीन - चार वर्षातून एकदा दुष्काळ ठरलेला. त्यामुळे शेतीतून हाती काही यायचे ...

पारंपरिक पिके घेऊन हाती काहीच पडत नव्हते. तीन - चार वर्षातून एकदा दुष्काळ ठरलेला. त्यामुळे शेतीतून हाती काही यायचे नाही. यावर पर्याय म्हणून फळबाग करण्याचे मनात आले. जमिनीची मशागत करून तीन वर्षांपूर्वी संत्राची तब्बल ५ हजार ५०० झाडे लावली. यंदा पहिल्यांदाच बहार धरला. उत्तम प्रतीची फळे झाडांना लागली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी धाव घेत तब्बल ८१ लाखांना बाग खरेदी केली. ही यशोगाथा आहे नगर तालुक्यातील वाळकी गावातील भाऊसाहेब नानासाहेब बोठे आणि सरस्वती बोठे या शेतकरी दाम्पत्याची.

नगर तालुक्याचा अवर्षणग्रस्त भागात समावेश होता. या तालुक्यात कायमच पाण्याचा प्रश्न गंभीर असतो. पाण्याच्या प्रश्नावर मात करत अनेक शेतकऱ्यांनी यश मिळवले आहे. वाळकी येथील भाऊसाहेब बोठे यांनी २०१९मध्ये संत्राच्या ५ हजार ५०० झाडांची लागवड केली. साडेतीन वर्षात झाडांची योग्य काळजी घेतली. सेंद्रिय शेतीवर भर दिला. सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी २ कोटी लीटरचे शेततळे बांधले. त्यामुळे झाडांना पाण्याची कमतरता भासत नाही. झाडांकरिता ठिबक सिंचन केले. तसेच वेगवेगळी सेंद्रिय खते वापरली. झाडांची पूर्णवेळ काळजी घेतली. औषध फवारणीसाठी आधुनिक पध्दत वापरली. ट्रॅक्टरच्या साहाय्याने औषधांची फवारणी केली जाते. साधारणपणे तीन वर्षात ५० लाख रुपयांच्या आसपास खर्च झाला. त्यामध्ये यंदाच्या वर्षातील १५ लाखांच्या खर्चाचा समावेश आहे.

यंदा पहिल्यांदाच मृग बहार धरण्यात आला. पहिलाच बहार असल्याने निम्म्याच झाडांना फळे लागली. काही झाडांना कमी प्रमाणात फळे आली. झाडांची चांगली मशागत केल्याने फळांचा आकार आणि चमक उत्तम, गोडी आली. फळे उत्तम असल्याने मागणी होती. व्यापाऱ्यांनी घरी येऊन फळांची खरेदी केली. तब्बल ८१ लाखांना फळे विकली केली. त्यामुळे ५ वर्षात झालेला खर्च निघाला. या यशात घरातील सर्वांनीच हातभार लावला. त्यामुळे यश मिळाले.

पारंपरिक शेती करून कंटाळा आला होता. त्यामुळे फळबागेकडे वळण्याचा मार्ग सूचला. तीन वर्षांपूर्वी ५ हजार ५०० संत्रा झाडांची लागवड केली. झाडांची योग्य काळजी घेतली. यंदा पहिलाच बहार धरला. पहिल्यांदाच ८१ लाखांचा लॉटरी लागली. तीन वर्षात केलेला खर्च निघाला. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण आहे.

- भाऊसाहेब बोठे, प्रगतशील शेतकरी

...................

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीOrange Festivalआॅरेंज फेस्टिव्हल