शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

पारंपरिक शेतीला फाटा देत फुलवली संत्र्याची बाग, व्यापाऱ्याकडून 81 लाखांत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 11:13 IST

पारंपरिक पिके घेऊन हाती काहीच पडत नव्हते. तीन - चार वर्षातून एकदा दुष्काळ ठरलेला. त्यामुळे शेतीतून हाती काही यायचे ...

पारंपरिक पिके घेऊन हाती काहीच पडत नव्हते. तीन - चार वर्षातून एकदा दुष्काळ ठरलेला. त्यामुळे शेतीतून हाती काही यायचे नाही. यावर पर्याय म्हणून फळबाग करण्याचे मनात आले. जमिनीची मशागत करून तीन वर्षांपूर्वी संत्राची तब्बल ५ हजार ५०० झाडे लावली. यंदा पहिल्यांदाच बहार धरला. उत्तम प्रतीची फळे झाडांना लागली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी धाव घेत तब्बल ८१ लाखांना बाग खरेदी केली. ही यशोगाथा आहे नगर तालुक्यातील वाळकी गावातील भाऊसाहेब नानासाहेब बोठे आणि सरस्वती बोठे या शेतकरी दाम्पत्याची.

नगर तालुक्याचा अवर्षणग्रस्त भागात समावेश होता. या तालुक्यात कायमच पाण्याचा प्रश्न गंभीर असतो. पाण्याच्या प्रश्नावर मात करत अनेक शेतकऱ्यांनी यश मिळवले आहे. वाळकी येथील भाऊसाहेब बोठे यांनी २०१९मध्ये संत्राच्या ५ हजार ५०० झाडांची लागवड केली. साडेतीन वर्षात झाडांची योग्य काळजी घेतली. सेंद्रिय शेतीवर भर दिला. सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी २ कोटी लीटरचे शेततळे बांधले. त्यामुळे झाडांना पाण्याची कमतरता भासत नाही. झाडांकरिता ठिबक सिंचन केले. तसेच वेगवेगळी सेंद्रिय खते वापरली. झाडांची पूर्णवेळ काळजी घेतली. औषध फवारणीसाठी आधुनिक पध्दत वापरली. ट्रॅक्टरच्या साहाय्याने औषधांची फवारणी केली जाते. साधारणपणे तीन वर्षात ५० लाख रुपयांच्या आसपास खर्च झाला. त्यामध्ये यंदाच्या वर्षातील १५ लाखांच्या खर्चाचा समावेश आहे.

यंदा पहिल्यांदाच मृग बहार धरण्यात आला. पहिलाच बहार असल्याने निम्म्याच झाडांना फळे लागली. काही झाडांना कमी प्रमाणात फळे आली. झाडांची चांगली मशागत केल्याने फळांचा आकार आणि चमक उत्तम, गोडी आली. फळे उत्तम असल्याने मागणी होती. व्यापाऱ्यांनी घरी येऊन फळांची खरेदी केली. तब्बल ८१ लाखांना फळे विकली केली. त्यामुळे ५ वर्षात झालेला खर्च निघाला. या यशात घरातील सर्वांनीच हातभार लावला. त्यामुळे यश मिळाले.

पारंपरिक शेती करून कंटाळा आला होता. त्यामुळे फळबागेकडे वळण्याचा मार्ग सूचला. तीन वर्षांपूर्वी ५ हजार ५०० संत्रा झाडांची लागवड केली. झाडांची योग्य काळजी घेतली. यंदा पहिलाच बहार धरला. पहिल्यांदाच ८१ लाखांचा लॉटरी लागली. तीन वर्षात केलेला खर्च निघाला. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण आहे.

- भाऊसाहेब बोठे, प्रगतशील शेतकरी

...................

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीOrange Festivalआॅरेंज फेस्टिव्हल