शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

आधी तुझं माझं जमेना, आता तुझ्यावाचून करमेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:22 IST

अहमदनगर : बेरोजगारी, व्यसनाधीनता, चारित्र्यावरील संशय, मोबाइल व सोशल मीडियाचा अतिवापर, प्रेमप्रकरणे, कुटुंबीयांपासून वेगळे राहण्याचा अट्टहास, माहेरून पैसे आणावेत, ...

अहमदनगर : बेरोजगारी, व्यसनाधीनता, चारित्र्यावरील संशय, मोबाइल व सोशल मीडियाचा अतिवापर, प्रेमप्रकरणे, कुटुंबीयांपासून वेगळे राहण्याचा अट्टहास, माहेरून पैसे आणावेत, अशा अनेक कारणांमुळे पती-पत्नींमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढले आहेत. हे वाद भरोसा सेलकडे दाखल झाल्यानंतर समुपदेशनातून गेल्या साडेआठ महिन्यांत ५५० जोडप्यांचा पुन्हा संसार सुरळीत सुरू झाला आहे.

येथील भरोसा सेलमध्ये १ जानेवारी ते २४ सप्टेंबर २०२१ दरम्यान एकूण १६२० तक्रारी दाखल झाल्या. यातील ९० टक्के तक्रारदार या महिलांच्या आहेत. उर्वरित दहा टक्क्यांमध्ये पुरुष व काही ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील आहेत. भरोसा सेलच्या प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक पल्लवी उंबरहंडे यांच्यासह सेलमधील हेड कॉस्टेबल उमेश इंगवले व इतर समुपदेशकांनी तक्रारदार महिला, तिचा पती व इतर नातेवाइकांचे समुपदेशन करून त्यांच्यातील वाद मिटविले. पत्नीला नांदवयाचेच नाही अथवा आता मला सासरी जायचेच नाही, असा पवित्रा घेणाऱ्या जोडप्यांचे येथील समुपदेशकांनी मनपरविर्तन केले. त्यांना कायदेशीर बाबींची समज देत भविष्यात होणाऱ्या नुकसानीचीही जाणीव करून दिली. अशा प्रकारे ५५० जोडप्यांचा संसार पुन्हा एकदा आनंदाने फुलला.

--------------------------

नवरा सारखाच मोबाइल पाहतो

महिला किंवा पुरुषांकडून मोबाइलचा तसेच सोशल मीडियाचा अतिवापर हे बहुतांश तक्रारींतील एक कारण आहे. पती मला वेळ देत नाही. सारखा मोबाइलमध्ये बिझी असतो. तो त्याच्या मैत्रिणींशी चॅटिंग करतो. तर पत्नी सारखी मोबाइलमध्ये गुंतलेली असते. सोबतच बायको वारंवार माहेरी जाते, शॉपिंगला सारखे पैसे मागते. आदी शुल्लक कारणांमुळे वाद विकोपाला गेल्याचे दिसतात.

---------------------

वर्षभरात भरोसा सेलकडे दाखल प्रकरणे

एकूण तक्रारी - १६२०

वाद मिटलेले- ५५०

स्वतंत्र निर्णय-३१७

दप्तरी- १४७

कायदेशीर मदतीसाठी- २५

गुन्हा दाखल करण्याची शिफारस- २६७

---------------------------

भरोसा सेलमध्ये दाखल होणारे प्रत्येक प्रकरण गांभीर्याने हाताळले जाते. यात ९० टक्यांपेक्षा जास्त प्रकरणे ही पती-पत्नीमधील वादाची असतात. तक्रारीनंतर पती-पत्नीसह त्यांच्या नातेवाइकांना सेलमध्ये बोलावून त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांचा संसार सुरळीत व्हावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. एखाद्या महिलेचा सासरी छळ झाल्याच्या बाबी समोर आल्यानंतर त्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली जाते, तसेच सदर महिलेस पुढील कायदेशीर मदत केली जाते.

- पल्लवी उंबरहंडे, प्रभारी अधिकारी, भरोसा सेल