शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला व-हाडी पन्नास...बाहेरच थांबले पाहुणे खास; कोरम पूर्ण झाल्याने आई-वडिलांनी बाहेरूनच टाकल्या अक्षदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:44 IST

५० जणांच्यावर मंगल कार्यालयातही प्रवेश नाकारण्यात येतो आहे. नगर शहरातील एका मंगल कार्यालयात ५० जणांचा कोरम पूर्ण झाल्याने वराचे आई-वडील, काका-काकू यांनाच बाहेर थांबण्याची वेळ ओढावली. शेवटी प्रवेशद्वारातूनच त्यांना वधू-वरांवर अक्षदा टाकाव्या लागल्या.

सुदाम देशमुख ।  
अहमदनगर : जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने पन्नास लोकांच्या उपस्थितीत मंगल कार्यालयात लग्न लावली जात आहेत. वर किंवा वधूपैकी एकाच्याच कुटुंबातील सदस्यांची संख्या ही ५० च्या वर जात असल्याने यजमानांची पंचाईत झाली आहे. ५० जणांच्यावर मंगल कार्यालयातही प्रवेश नाकारण्यात येतो आहे. नगर शहरातील एका मंगल कार्यालयात ५० जणांचा कोरम पूर्ण झाल्याने वराचे आई-वडील, काका-काकू यांनाच बाहेर थांबण्याची वेळ ओढावली. शेवटी प्रवेशद्वारातूनच त्यांना वधू-वरांवर अक्षदा टाकाव्या लागल्या.

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे काही चांगल्या, तर काही मजेशीर गोष्टी घडत आहेत. नगर जिल्ह्यात २२ मे पासून लॉकडाऊन शिथिल झाला. ५० जणांच्या उपस्थितीत मंगल कार्यालयात किंवा घरामध्ये लग्न लावण्याची प्रशासनाने परवानगी दिली. यातही कोविड-१९ च्या अधिनियमांचे पालन करून ही परवानगी देण्यात आली. त्यामुळे दोन महिन्यांपासून मंगल कार्यालयांची बंद असलेली घडी पुन्हा सुरळीत झाली आहे. मात्र पन्नास जणांची अट मंगल कार्यालय मालक, यजमान यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. पन्नास जणांची यादी करणे वधू-वरांच्या पालकांसाठी कठीण गोष्ट बनली आहे. 

लग्नासाठी कार्यालयांचे पॅकेज
पन्नास जणांची सोय, चार ते पाच फूट अंतरावर खुर्च्यांची व्यवस्था प्रत्येक मंगल कार्यालयात करण्यात आलेली आहे. मास्क, सॅनिटायझरही मंगल कार्यालयामार्फत दिले जात आहेत. मंगल कार्यालयाच्या भाड्याव्यतिरिक्त पन्नास जणांचे जेवण तयार करून दिले जात आहे. याशिवाय एक भटजी, सनईवाला, अक्षदा, कार्यालयातील सजावट, चहा-पाणी, सरबत, हार-फुले आदी सर्व पॅकेजमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. एरव्ही एक ते दीड लाखापर्यंत मंगल कार्यालयाचे एक दिवसाचे भाडे आकारले जाते. मात्र पन्नास जणांमध्ये लग्न आणि कमी वेळेत, कमी विधी करीत लग्न होत असल्याने २५ ते ३० हजार निव्वळ भाडे आणि जेवणासह असेल तर किमान ५० ते ७५ हजार रुपये भाडे आकारले जात आहे.

सनई, घोडा, वाढपी, केटर्सना विश्रांती
मंगल कार्यालयामधील उपस्थिती ही ५०च्या वर असणार नाही, याची काळजी मंगल कार्यालयांची आहे. तयार जेवण कार्यालयात मागविले जाते. जेवण वाढण्याची जबाबदारीही नातेवाईकांनाच पार पाडावी लागत आहे. संख्या वाढत असल्याने सनई, घोडेवाला, वाजंत्री, बॅण्डपथक, वरात आदींना फाटा देण्यात आला आहे. 


लग्नकार्य म्हटले की बारा बलुतेदारांना कामे मिळतात. मात्र पन्नास जणांच्या अटीमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. लग्न ही आयुष्यातील एकमेव व अविस्मरणीय घटना असते. पन्नास नातेवाईकांना मंगल कार्यालयामार्फत मोफत मास्क, सॅनिटायझरही दिले जात आहेत, असे भगवान फुलसौंदर यांनी सांगितले. 

 कमी संख्या असल्याने कार्यालयांचे एकत्र पॅकेज केले आहे. कार्यालयाचे भाडेही पूर्वीपेक्षा २५ टक्केच (जेवण वगळून) आकारले जात आहे. पाच-पाच फुटाच्या अंतरावर नातेवाईकांना बसण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग होईल. मात्र अनेकांना लग्नकार्य थाटामाटात करायचे असते. ते सध्याच्या नियमात बसत नाही. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या तारखा नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच पुढे ढकलल्या आहेत. वºहाडी मंडळींना सर्व सोयी जागेवर पुरवल्या जात आहेत, जेणेकरून कार्यालयातील संख्या वाढणार नाही, याची दक्षता घेतो, असे धनंजय जाधव यांनी सांगितले.

    पूर्वीपेक्षा कार्यालयाचे भाडे कमी करण्यात आलेले आहे. जेवणासह लग्नकार्य करून देण्याची व्यवस्था केली जाते. पन्नास जणांचा आणि फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन व्हावे म्हणून वाजंत्री, बॅण्डपथक, सनई यांना आम्ही परवानगी देत नाहीत. याशिवाय कार्यालयील स्वच्छता यावर भर दिला जात आहे. गर्दी होणार नाही, यावरही आम्हाला नजर ठेवावी लागते. वर-वधू एकाच जिल्ह्यात आहेत, अशीच लग्नकार्य होत आहेत. वधू किंवा वरापैकी एकजण परजिल्ह्यात असल्याने इच्छा असूनही अनेकांना सध्या लग्न करता येत नाहीत. अशांनी दिवाळीनंतरच तारखा बुकिंग करण्यावर भर दिला आहे, असे कार्यालय चालक जयेश खरपुडे यांनी सांगितले. 
 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न