शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बियाणांसाठी सव्वापंधरा हजार अर्जातून साडेतीन हजार शेतकऱ्यांचे नशीब उजळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST

अहमदनगर : शासनाकडून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान दिले जाणार असून यासाठी जिल्ह्यातील १५ हजार २९५ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज ...

अहमदनगर : शासनाकडून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान दिले जाणार असून यासाठी जिल्ह्यातील १५ हजार २९५ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज दाखल केले होते. जिल्हा कृषी विभागाकडून नुकतीच या अर्जांची लॉटरी (सोडत) उघडण्यात आली. यामध्ये ३ हजार ४४६ शेतकरी पात्र ठरले असून ५ हजार ९२४ शेतकरी ‘वेटिंग’वर आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिके व शेतीबाबतच्या अवजारांची मागणी करण्यासाठी कृषी विभागाकडून महाडीबीटी पोर्टल विकसित करण्यात आले होते. चालू खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाणांवर अनुदान देण्याबाबत २४ मे पर्यंत शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या योजनेला नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १५ हजार २९५ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज दाखल केले होते. यातील ३ हजार ४४६ शेतकरी पात्र ठरले असून ५ हजार ९२४ शेतकरी ‘वेटिंग’वर आहेत. सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी आदी बियाणांचा यामध्ये समावेश आहे.

----

कृषी विभागाने अनुदानित बियाणांबाबत कोणतीही जनजागृती केलेली नाही. यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. नाईलाजास्तव महागडी बियाणे शेतकऱ्यांना घ्यावी लागणार आहेत.

-आप्पा जाधव,

शेतकरी श्रीगोंदा

----

महाडीबीटी पोर्टलवर बियाणांसाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी अर्ज करतात. त्यातून लॉटरी पद्धतीने मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ मिळतो. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. त्यांना मिळेल त्या भावाने बियाणे खरेदी करावे लागतात. त्यामुळे नोंदणी करणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना शासनाने अनुदानातून बियाणे द्यायला हवे.

-संदीप शिंदे,

शेतकरी, श्रीगोंदा.

----

शासनाने ऑनलाइन नोंदणीसह शेतकऱ्यांना ऑफलाइनही बियाणे उपलब्ध करून द्यायला हवेत. अनेक शेतकऱ्यांना ऑनलाइनची सुविधा नसते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे काय हा प्रश्न आहे. यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. मात्र तसे प्रयत्न कृषी विभागाकडून होताना दिसत नाहीत.

-रोहिदास शिंदे,

नगर