शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

शेतकरी आपल्या घरासमोर जाळणार मूठभर कापूस, २२ मेला आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 20:48 IST

अहमदनगर : आधारभूत किमतीनुसार कापूस खरेदीत होणाºया दिरंगाईमुळे कोट्यवधी रुपयांचा कापूस खरेदीवाचून राहण्याची शक्यता आहे. शेतकरी संघटनेने यापूर्वीच केलेल्या मागण्या मान्य न केल्यामुळे शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी २२ मे रोजी कापूस उत्पादक जिल्ह्यात प्रत्येक शेतकरी मूठभर कापूस जाळण्याचे आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : आधारभूत किमतीनुसार कापूस खरेदीत होणाºया दिरंगाईमुळे कोट्यवधी रुपयांचा कापूस खरेदीवाचून राहण्याची शक्यता आहे. शेतकरी संघटनेने यापूर्वीच केलेल्या मागण्या मान्य न केल्यामुळे शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी २२ मे रोजी कापूस उत्पादक जिल्ह्यात प्रत्येक शेतकरी मूठभर कापूस जाळण्याचे आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.  या पत्रकात म्हटले आहे की,विदर्भ मराठवाड्यात शेतकºयांनी लाखो क्विंटल कापूस विक्रीसाठी बाजार समितीत नोंदणी केली आहे. सिसिआय व कॉटन फेडरेशनमार्फत सुरु असलेली कापूस खरेदी अतिशय धिम्या गतीने सुरु आहे. या गतीने सर्व लांब धाग्याचा कापूस सुद्धा मोजून होणार नाही. शेतकरी संघटनेने अनेकदा खरेदी केंद्र वाढवण्याची शासनाकडे मागणी केली आहे. मात्र शासनाने त्याचा विचार केलेला नाही. सिसिआयच्या एफएक्यू ग्रेडमध्ये लांब, मध्यम व आखूड अशा तीन प्रती आहेत. मात्र शासनाने फक्त लांब धाग्याचाच कापूस विकत घेण्याचे आदेश दिले असल्यामुळे शेतकºयांना आपला कापूस मातीमोल भावाने व्यापाºयाला विकावा लागत आहे.शासकीय खरेदीचा वेग पहाता पावसाळ्यापूर्वी सर्व कापूस खरेदी होण्याची शक्यता नाही. त्यासाठी शासनाने, आवश्यक तेथे, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करुन शासकीय खरेदी सुरु करावी. किंवा शेतकºयांनी जिन मालकाला किंवा व्यापाºयाला विकलेला कापसाच्या व आधारभूत किमतीच्या फरकाची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करुन भावांतर योजना राबवावी.  शासनाच्या चालढकल वृत्तीचा मोठा आर्थिक फटका राज्यातील कापूस उत्पादकांना सोसावा लागणार आहे. शासनाच्या या हलगर्जीपणाचा निषेध करण्यासाठी, राज्याच्या कापूस उत्पादक जिल्ह्यात २२ मे रोजी सकाळी ११ वाजता, कापूस उत्पादक शेतकरी आपल्या घरासमोर मूठभर कापूस जाळून शासनाचा निषेध करतील, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.------

जनहित याचिका दाखल करणारकापूस उत्पादक शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. एफएक्यू दर्जाचा कापूस असूनही नाकारल्या गेलेल्या कापसाचे नमुने घेऊन त्याचे पंचनामे करावेत. त्यांची अधिकृत चाचणी करुन प्रत निश्चित करण्यात येणार आहे. एफएक्यू दर्जाचा असूनही नाकारल्या गेलेल्या कापसाची नुकसान भरपाई शासनाने द्यावी, अशी विनंती न्यायालयात करण्यात येणार आहे.