शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या विम्यासाठी न्यायालयात जाणार

By admin | Updated: November 28, 2014 01:14 IST

अहमदनगर : हवामान आधारित विमा योजनेसाठी जनरल इन्शुरन्स कंपनीने नगर जिल्ह्याची निवड केली आहे. मात्र ही निवड करताना तापमानाच्या सरासरीसाठी नगर जिल्ह्यातील

अहमदनगर : हवामान आधारित विमा योजनेसाठी जनरल इन्शुरन्स कंपनीने नगर जिल्ह्याची निवड केली आहे. मात्र ही निवड करताना तापमानाच्या सरासरीसाठी नगर जिल्ह्यातील ११ तालुक्यांसाठी वेगळा नियम व नगर तालुका आणि अकोले तालुक्यासाठी वेगळा नियम ठेवण्यात आला आहे. या नियमाचा फटका नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसणार असल्याने हे शेतकरी विमा लाभापासून वंचित राहणार आहेत. नगर तालुक्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात माजी खासदार व ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार आहेत.राज्य सरकारने हवामानावर आधारित विमा योजनेसाठी विभागातून एक याप्रमाणे पाच जिल्ह्यांची निवड केली आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये नगर जिल्ह्याचा समावेश आहे. नगर जिल्ह्यासाठी धान्य पिकांमध्ये हरबरा व ज्वारी यांचा समावेश आहे. नगर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी यासाठी पीक विमा रक्कम भरत नोंदणी केली आहे. पण जनरल इंशुरन्स कंपनीने जिल्ह्यात वेगवेगळे नियम ठेवले आहेत. नगर तालुका व अकोले तालुका यांच्यासाठी तापमानाची अट किमान ७ डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान गेल्यास विम्यास पात्र अशी अट ठेवली आहे, तर इतर अकरा तालुक्यांसाठी किमान ११ डिग्री सेल्सिअसच्या खाली विम्यास पात्र अशी अट ठेवण्यात आली आहे.नगर तालुक्याचे तापमान गेल्या कित्येक वर्षात ७ डिग्री पेक्षा कमी गेलेले नाही. यामुळे नगर तालुक्यातील शेतकरी या अटीनुसार विम्यास पात्र होणार नाहीत. नगर तालुक्याच्या शेजारच्या तालुक्यांना वेगळा नियम व नगर तालुक्यासाठी वेगळा नियम ठेवत कंपनी नगर तालुक्यातील शेतकऱ्यांवर विम्याबाबत अन्याय करीत आहेत. विशेष म्हणजे नगर तालुक्यासाठी १० डिग्री तापमानाची शिफारस राहुरी कृषी विद्यापीठाने शासनाकडे व कंपनीकडे केली असताना कंपनी मनमानी करत आहे. या कंपनीच्या अन्यायी धोरणाच्या विरोधात ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार आहेत.(प्रतिनिधी) शेतकरी आभारही मानत नाहीतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी मी खस्ता खाल्ल्या. शेतकऱ्यांना मागील वर्षी मोठा प्रयत्न करून ३८ कोटी ५० लाखांचा लाभ मिळवून दिला. यापूर्वीही तीन-चार वर्षांपासून मी पीक विम्यासाठी संघर्ष करीत आहे. पण तालुक्यातील शेतकरी साधे आभार मानायला सुद्धा माझ्याकडे फिरकले नाहीत, अशी खंत दादा पाटील शेळके यांनी व्यक्त केली.तालुक्यातील पुढाऱ्यांना यात रस नाहीनगर जिल्ह्यातीलच काय पण नगर तालुक्यातील पुढाऱ्यांना व जिल्हा बँकेलाही शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यात रस नाही. तालुक्यातील लोकप्रतिनिधी फक्त मला शिव्या शाप देण्याचेच काम करतात. पण शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी त्यांचे योगदान नाही, मुळात त्यांना विम्यातले काही कळत नाही अशी टीका शेळके यांनी केली. विमा मिळाल्यानंतर मात्र श्रेय घेण्यात सगळे पुढे पळतात असेही शेळके म्हणाले.