शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

शेतकरी संघटना लढविणार १०० जागा

By admin | Updated: June 8, 2024 21:40 IST

अहमदनगर : आघाडीने शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही तर विरोधात असलेल्या सेना-भाजपा युतीनेही नाकर्तेपणा सिध्द केला़

अहमदनगर : सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही तर विरोधात असलेल्या सेना-भाजपा युतीनेही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून नाकर्तेपणा सिध्द केला़ येणाऱ्या काळात सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा मंगळवारी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली़ संपूर्ण राज्यात शेतकरी संघटना १०० उमेदवार देणार असून, मतदारसंघनिहाय समविचारी व सक्षम उमेदवार मिळाले तर २८८ जागा लढविण्याची तयारी असल्याचेही त्यांनी पत्रकारपरिषदेत स्पष्ट केले़ नगर येथे झालेल्या बैठकीत रघुनाथदादा पाटील यांनी पुणे व नगर जिल्ह्यातील १० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली़ बुधवारी औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील पहिली यादी जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले़ तर बीड लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत कालिदास आपेट हे संघटनेकडून उमेदवारी करणार आहेत़ गेल्या पंधरा वर्षांत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच ठोस निर्णय घेतले नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजही सुरूच आहेत़ केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या़ मात्र, त्यांनीही शेतकऱ्यांची निराशा केली़ शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळू लागल्यानंतर केंद्र सरकारने इजिप्त व पाकिस्तान येथून कांद्याची आयात केली़ कांद्यासह बटाट्यावरही निर्यातबंदी घातली़ त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे़ मागील निवडणुकीत स्व़ बाळासाहेब ठाकरे यांनी युतीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी व वीजबिल माफीची घोषणा केली होती़ स्व़ बाळासाहेबांच्या या विधानाचा उद्धव ठाकरे यांना विसर पडला असून, त्यांना फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा हवा आहे, अशी टीका यावेळी पाटील यांनी केली़ राज्यात ५६ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे़ भ्रष्ट सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही कंटाळलेल्या जनतेला तिसरा सक्षम पर्याय देण्यासाठी निवडणूक लढविणार असल्याचे पाटील म्हणाले़