शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटना लढविणार १०० जागा

By admin | Updated: June 8, 2024 21:40 IST

अहमदनगर : आघाडीने शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही तर विरोधात असलेल्या सेना-भाजपा युतीनेही नाकर्तेपणा सिध्द केला़

अहमदनगर : सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही तर विरोधात असलेल्या सेना-भाजपा युतीनेही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून नाकर्तेपणा सिध्द केला़ येणाऱ्या काळात सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा मंगळवारी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली़ संपूर्ण राज्यात शेतकरी संघटना १०० उमेदवार देणार असून, मतदारसंघनिहाय समविचारी व सक्षम उमेदवार मिळाले तर २८८ जागा लढविण्याची तयारी असल्याचेही त्यांनी पत्रकारपरिषदेत स्पष्ट केले़ नगर येथे झालेल्या बैठकीत रघुनाथदादा पाटील यांनी पुणे व नगर जिल्ह्यातील १० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली़ बुधवारी औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील पहिली यादी जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले़ तर बीड लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत कालिदास आपेट हे संघटनेकडून उमेदवारी करणार आहेत़ गेल्या पंधरा वर्षांत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच ठोस निर्णय घेतले नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजही सुरूच आहेत़ केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या़ मात्र, त्यांनीही शेतकऱ्यांची निराशा केली़ शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळू लागल्यानंतर केंद्र सरकारने इजिप्त व पाकिस्तान येथून कांद्याची आयात केली़ कांद्यासह बटाट्यावरही निर्यातबंदी घातली़ त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे़ मागील निवडणुकीत स्व़ बाळासाहेब ठाकरे यांनी युतीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी व वीजबिल माफीची घोषणा केली होती़ स्व़ बाळासाहेबांच्या या विधानाचा उद्धव ठाकरे यांना विसर पडला असून, त्यांना फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा हवा आहे, अशी टीका यावेळी पाटील यांनी केली़ राज्यात ५६ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे़ भ्रष्ट सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही कंटाळलेल्या जनतेला तिसरा सक्षम पर्याय देण्यासाठी निवडणूक लढविणार असल्याचे पाटील म्हणाले़