शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
5
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
6
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
7
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
8
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
9
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
10
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
11
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
12
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
13
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
14
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
15
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
16
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
17
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
18
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
19
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
20
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...

शेतकरी संघटना लढविणार १०० जागा

By admin | Updated: June 8, 2024 21:40 IST

अहमदनगर : आघाडीने शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही तर विरोधात असलेल्या सेना-भाजपा युतीनेही नाकर्तेपणा सिध्द केला़

अहमदनगर : सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही तर विरोधात असलेल्या सेना-भाजपा युतीनेही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून नाकर्तेपणा सिध्द केला़ येणाऱ्या काळात सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा मंगळवारी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली़ संपूर्ण राज्यात शेतकरी संघटना १०० उमेदवार देणार असून, मतदारसंघनिहाय समविचारी व सक्षम उमेदवार मिळाले तर २८८ जागा लढविण्याची तयारी असल्याचेही त्यांनी पत्रकारपरिषदेत स्पष्ट केले़ नगर येथे झालेल्या बैठकीत रघुनाथदादा पाटील यांनी पुणे व नगर जिल्ह्यातील १० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली़ बुधवारी औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील पहिली यादी जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले़ तर बीड लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत कालिदास आपेट हे संघटनेकडून उमेदवारी करणार आहेत़ गेल्या पंधरा वर्षांत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच ठोस निर्णय घेतले नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजही सुरूच आहेत़ केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या़ मात्र, त्यांनीही शेतकऱ्यांची निराशा केली़ शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळू लागल्यानंतर केंद्र सरकारने इजिप्त व पाकिस्तान येथून कांद्याची आयात केली़ कांद्यासह बटाट्यावरही निर्यातबंदी घातली़ त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे़ मागील निवडणुकीत स्व़ बाळासाहेब ठाकरे यांनी युतीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी व वीजबिल माफीची घोषणा केली होती़ स्व़ बाळासाहेबांच्या या विधानाचा उद्धव ठाकरे यांना विसर पडला असून, त्यांना फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा हवा आहे, अशी टीका यावेळी पाटील यांनी केली़ राज्यात ५६ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे़ भ्रष्ट सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही कंटाळलेल्या जनतेला तिसरा सक्षम पर्याय देण्यासाठी निवडणूक लढविणार असल्याचे पाटील म्हणाले़