शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

दुष्काळात शेतक-याच्या हाकेला धावणारे लोकसेवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 12:23 IST

तालुक्यातील भीषण दुष्काळामुळे त्रस्त झालेली जनता, पशुधन वाचवण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रशासकीय पदावरून नियोजन

हरिहर गर्जेपाथर्डी : तालुक्यातील भीषण दुष्काळामुळे त्रस्त झालेली जनता, पशुधन वाचवण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रशासकीय पदावरून नियोजन व व्यवस्थापनासाठी २४ तास तत्पर असलेले तहसीलदार नामदेव पाटील यांनी आपत्कालीन परिस्थितीत व्यवस्थापनाचा नवा आदर्श उभा केला आहे.शेतकरी कुटुंबात जन्मलेले तहसीलदार नामदेव रामचंद्र पाटील यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पडालसे. पाथर्डी तहसीलचा कारभार सांभाळल्यापासून तहसीलमध्ये येणाºया प्रत्येक तक्रारदाराचे थेट म्हणणे ऐकून तात्काळ तोडगा काढण्याचा पायंडा पाटलांनी पाडला. गेल्या दुष्काळात शेतकऱ्यांना खरीपाचे ४२ कोटीचे अनुदान विनातक्रार वाटप केले. तसेच तांत्रिक अडचणीत अडकलेल्या व ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झालेल्या अनुदानपात्र शेतकºयांसाठी अतिरिक्त १४ कोटींची मागणी शासनाकडे करून काही अनुदान वाटपाला सुरवात केली आहे.तालुका माझे कुटुंब आहे, असे समजून विविध संकटे, नैसर्गिक आपत्ती ही लढण्याची संधी देत असतात, असा विश्वास बाळगून गत दुष्काळात शेतकºयांसाठी थेट उपाययोजना व व्यवस्थापणावर भर दिला. तालुक्यात १०८ छावण्यांमध्ये ६९ हजार जनावरे तसेच १०३ गावासाठी अमरापूर येथून २४ टॅँकर, राक्षी येथून ९१ टॅँकर, पांढरीपूल येथे ४२ असे एकूण १५७ टॅँकरच्या माध्यमातून ३९१ खेपांचा ताळमेळ घालून पारदर्शी नियोजन केले. तालुक्यातील विद्युत पुरवठा, भारनियमन, महामार्ग अपघात, दहावी-बारावी कॉपी थांबवण्यासाठी, शिव रस्ते खुले करण्यासाठी शिवार भेटी घेवून सामोपचाराने जागेवरच वाद मिटवण्यास प्राधान्य देताना जनसामान्याच्या मनात पाटलांनी आपुलकी निर्माण केली.व्यवस्थापनात गडबड झाली तर तात्काळ उपाययोजना करून येणारे मोर्चे, आंदोलकांना शांततेने तोडगा काढून हसतमुखाने माघारी पाठवले जात असल्याने प्रशासनाला काम करण्यासाठी अधिक वेळ मिळत आहे.तालुक्यातील शासनाच्या सर्व कार्यालयाशी व्यवस्थित ताळमेळ घालून कामकाज करत तलाठी, पशुधन अधिकारी यांच्याकडून दैनदिन अहवाल मागवून जनावरांच्या छावण्यांचेही त्यांनी योग्य नियोजन केले आहे.परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी प्रबोधनदहावी बारावीच्या परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी भरारी पथकासह विद्यार्थी व पालकांच्या प्रबोधनाचा नवीन प्रयोग तहसीलदारांनी तालुक्यात सुरू केला. त्यामुळे अभ्यासू विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढले. जनावरांच्या छावणीमधील तक्रार प्राप्त होताच तात्काळ कार्यवाही केली. ताळमेळ घालण्यासाठी सोशल मीडियाचा योग्य वापर केला. पाणी चोरी रोखण्यासाठी उद्भव ते वितरणाचे ठिकाण येथे तपासणी करण्यासाठी प्रतिनिधी नेमले. फुंदेटाकळी येथील पाणी चोरीबाबत तात्काळ गुन्हा नोंदवला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी