शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुष्काळात शेतक-याच्या हाकेला धावणारे लोकसेवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 12:23 IST

तालुक्यातील भीषण दुष्काळामुळे त्रस्त झालेली जनता, पशुधन वाचवण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रशासकीय पदावरून नियोजन

हरिहर गर्जेपाथर्डी : तालुक्यातील भीषण दुष्काळामुळे त्रस्त झालेली जनता, पशुधन वाचवण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रशासकीय पदावरून नियोजन व व्यवस्थापनासाठी २४ तास तत्पर असलेले तहसीलदार नामदेव पाटील यांनी आपत्कालीन परिस्थितीत व्यवस्थापनाचा नवा आदर्श उभा केला आहे.शेतकरी कुटुंबात जन्मलेले तहसीलदार नामदेव रामचंद्र पाटील यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पडालसे. पाथर्डी तहसीलचा कारभार सांभाळल्यापासून तहसीलमध्ये येणाºया प्रत्येक तक्रारदाराचे थेट म्हणणे ऐकून तात्काळ तोडगा काढण्याचा पायंडा पाटलांनी पाडला. गेल्या दुष्काळात शेतकऱ्यांना खरीपाचे ४२ कोटीचे अनुदान विनातक्रार वाटप केले. तसेच तांत्रिक अडचणीत अडकलेल्या व ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झालेल्या अनुदानपात्र शेतकºयांसाठी अतिरिक्त १४ कोटींची मागणी शासनाकडे करून काही अनुदान वाटपाला सुरवात केली आहे.तालुका माझे कुटुंब आहे, असे समजून विविध संकटे, नैसर्गिक आपत्ती ही लढण्याची संधी देत असतात, असा विश्वास बाळगून गत दुष्काळात शेतकºयांसाठी थेट उपाययोजना व व्यवस्थापणावर भर दिला. तालुक्यात १०८ छावण्यांमध्ये ६९ हजार जनावरे तसेच १०३ गावासाठी अमरापूर येथून २४ टॅँकर, राक्षी येथून ९१ टॅँकर, पांढरीपूल येथे ४२ असे एकूण १५७ टॅँकरच्या माध्यमातून ३९१ खेपांचा ताळमेळ घालून पारदर्शी नियोजन केले. तालुक्यातील विद्युत पुरवठा, भारनियमन, महामार्ग अपघात, दहावी-बारावी कॉपी थांबवण्यासाठी, शिव रस्ते खुले करण्यासाठी शिवार भेटी घेवून सामोपचाराने जागेवरच वाद मिटवण्यास प्राधान्य देताना जनसामान्याच्या मनात पाटलांनी आपुलकी निर्माण केली.व्यवस्थापनात गडबड झाली तर तात्काळ उपाययोजना करून येणारे मोर्चे, आंदोलकांना शांततेने तोडगा काढून हसतमुखाने माघारी पाठवले जात असल्याने प्रशासनाला काम करण्यासाठी अधिक वेळ मिळत आहे.तालुक्यातील शासनाच्या सर्व कार्यालयाशी व्यवस्थित ताळमेळ घालून कामकाज करत तलाठी, पशुधन अधिकारी यांच्याकडून दैनदिन अहवाल मागवून जनावरांच्या छावण्यांचेही त्यांनी योग्य नियोजन केले आहे.परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी प्रबोधनदहावी बारावीच्या परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी भरारी पथकासह विद्यार्थी व पालकांच्या प्रबोधनाचा नवीन प्रयोग तहसीलदारांनी तालुक्यात सुरू केला. त्यामुळे अभ्यासू विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढले. जनावरांच्या छावणीमधील तक्रार प्राप्त होताच तात्काळ कार्यवाही केली. ताळमेळ घालण्यासाठी सोशल मीडियाचा योग्य वापर केला. पाणी चोरी रोखण्यासाठी उद्भव ते वितरणाचे ठिकाण येथे तपासणी करण्यासाठी प्रतिनिधी नेमले. फुंदेटाकळी येथील पाणी चोरीबाबत तात्काळ गुन्हा नोंदवला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी