शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दररोज साचतोय तब्बल ४५० टन कचरा; संकलनापोटी महिन्याला अडीच कोटींचे बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 19:25 IST

कचरा संकलनापोटी महिन्याकाठी अडीच कोटींचे बिल

ठळक मुद्देमहिनाभरात ६० टनाने वाढला कचरा  

औरंगाबाद : शहरातील ९पैकी ८ झोनमध्ये कचरा उचलण्याचे काम बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी ही खाजगी कंपनी करीत आहे. या कंपनीकडून दररोज ४५० टन कचरा उचलला जात असल्याची बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबरमध्ये ३९० टन कचरा जमा होत होता. अवघ्या महिनाभरात तब्बल  ६० टनाने कचरा वाढला आहे.

शहरात अभूतपूर्व कचराकोंडी निर्माण झाली होती. त्यानंतर शासनाने कचराकोंडी दूर करण्यासाठी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. या निधीतून ४ प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला. परंतु या प्रकल्पांची कामे कासवगतीने सुरू आहेत. शहरात कचरा संकलनाचे काम रेड्डी कंपनीकडून केले जात आहे. या कंपनीला प्रतिटनासाठी १६६२ रुपये महापालिकेकडून दिले जातात. यामध्ये महापालिकेच्या ९ पैकी ८ झोनमधून कंपनीकडून कचरा संकलन केले जाते. या ८ झोनमधून ४५० टन कचरा जमा होत असल्याची माहिती गुरुवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

कचऱ्यामध्ये दगड, विटा, बांधकाम साहित्य टाकून बिल वसूल केले जात असल्याचा प्रकार यापूर्वी उघडकीस आला होता. याकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. परंतु टनाटनाने कचरा वाढत असल्याने महापालिका आता जागी झाल्याचे दिसते. त्यासाठी खबरदारीचे पाऊल महापालिकेकडून उचलले जात आहे. कचरा डेपोच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी आंदोलन झाले. कचऱ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला. त्यामुळे राज्य शासनाने निधी दिला. त्यातून चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव आणि कांचनवाडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला. चिकलठाणा प्रकल्प सोडले तर उर्वरित तिन्ही प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. ही परिस्थिती असताना कचरा संकलनापोटी महिन्याकाठी कोट्यवधी रुपये जात आहेत. कंपनीकडून झोन- ६ मध्ये अद्यापही कचरा संकलन होत नाही. तर झोन-४ मधील अर्ध्या वॉर्डांमध्ये संकलनाचे काम होते. असे असतानाही महिनाभरात ३९० टनावरून कचरा ४५० टनावर गेला आहे. कचरा संकलनापोटी महिन्याकाठी महापालिकेचे अडीच कोटी जात आहेत.

स्वतंत्र वाहने देणारग्रीन वेस्ट आणि बांधकाम साहित्य (डेबरिज) उचलण्यासाठी महापालिकेतर्फे स्वतंत्र वाहने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. पावसामुळे कचऱ्याचे वजन वाढत असल्याचा दावा कंपनीने मध्यंतरी केला होता. परंतु पावसाळा संपल्यानंतरही कचऱ्याचे वजन ४५० टनावर गेले आहे. स्वतंत्र वाहने दिल्याने कचऱ्याचे प्रमाण कमी होऊन द्यावे लागणारे बिल कमी होईल, अशी अपेक्षा आहे. 

कचरा प्रक्रिया केंद्र अद्यापही बांधकामातच चिकलठाणा येथील कचरा प्रकल्पासाठी वजनकाटा बसविण्याची निविदा ९ महिन्यांपूर्वी मंजूर करण्यात आली. परंतु अद्यापही वजनकाटा बसविण्यासाठी आवश्यक असलेले बांधकामच सुरू आहे. त्यामुळे महापालिका कचरा संकलन करणाऱ्या कंपनीला खाजगी काट्यावर केलेल्या वजनानुसार रक्कम मोजत आहे. वजनकाट्याचे काम आतापर्यंत पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु वजनकाटा बांधकामातच अडकला आहे. वजनकाट्यासाठी पाया तयार करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादfundsनिधी