शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

शहरात दररोज साचतोय तब्बल ४५० टन कचरा; संकलनापोटी महिन्याला अडीच कोटींचे बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 19:25 IST

कचरा संकलनापोटी महिन्याकाठी अडीच कोटींचे बिल

ठळक मुद्देमहिनाभरात ६० टनाने वाढला कचरा  

औरंगाबाद : शहरातील ९पैकी ८ झोनमध्ये कचरा उचलण्याचे काम बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी ही खाजगी कंपनी करीत आहे. या कंपनीकडून दररोज ४५० टन कचरा उचलला जात असल्याची बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबरमध्ये ३९० टन कचरा जमा होत होता. अवघ्या महिनाभरात तब्बल  ६० टनाने कचरा वाढला आहे.

शहरात अभूतपूर्व कचराकोंडी निर्माण झाली होती. त्यानंतर शासनाने कचराकोंडी दूर करण्यासाठी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. या निधीतून ४ प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला. परंतु या प्रकल्पांची कामे कासवगतीने सुरू आहेत. शहरात कचरा संकलनाचे काम रेड्डी कंपनीकडून केले जात आहे. या कंपनीला प्रतिटनासाठी १६६२ रुपये महापालिकेकडून दिले जातात. यामध्ये महापालिकेच्या ९ पैकी ८ झोनमधून कंपनीकडून कचरा संकलन केले जाते. या ८ झोनमधून ४५० टन कचरा जमा होत असल्याची माहिती गुरुवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

कचऱ्यामध्ये दगड, विटा, बांधकाम साहित्य टाकून बिल वसूल केले जात असल्याचा प्रकार यापूर्वी उघडकीस आला होता. याकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. परंतु टनाटनाने कचरा वाढत असल्याने महापालिका आता जागी झाल्याचे दिसते. त्यासाठी खबरदारीचे पाऊल महापालिकेकडून उचलले जात आहे. कचरा डेपोच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी आंदोलन झाले. कचऱ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला. त्यामुळे राज्य शासनाने निधी दिला. त्यातून चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव आणि कांचनवाडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला. चिकलठाणा प्रकल्प सोडले तर उर्वरित तिन्ही प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. ही परिस्थिती असताना कचरा संकलनापोटी महिन्याकाठी कोट्यवधी रुपये जात आहेत. कंपनीकडून झोन- ६ मध्ये अद्यापही कचरा संकलन होत नाही. तर झोन-४ मधील अर्ध्या वॉर्डांमध्ये संकलनाचे काम होते. असे असतानाही महिनाभरात ३९० टनावरून कचरा ४५० टनावर गेला आहे. कचरा संकलनापोटी महिन्याकाठी महापालिकेचे अडीच कोटी जात आहेत.

स्वतंत्र वाहने देणारग्रीन वेस्ट आणि बांधकाम साहित्य (डेबरिज) उचलण्यासाठी महापालिकेतर्फे स्वतंत्र वाहने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. पावसामुळे कचऱ्याचे वजन वाढत असल्याचा दावा कंपनीने मध्यंतरी केला होता. परंतु पावसाळा संपल्यानंतरही कचऱ्याचे वजन ४५० टनावर गेले आहे. स्वतंत्र वाहने दिल्याने कचऱ्याचे प्रमाण कमी होऊन द्यावे लागणारे बिल कमी होईल, अशी अपेक्षा आहे. 

कचरा प्रक्रिया केंद्र अद्यापही बांधकामातच चिकलठाणा येथील कचरा प्रकल्पासाठी वजनकाटा बसविण्याची निविदा ९ महिन्यांपूर्वी मंजूर करण्यात आली. परंतु अद्यापही वजनकाटा बसविण्यासाठी आवश्यक असलेले बांधकामच सुरू आहे. त्यामुळे महापालिका कचरा संकलन करणाऱ्या कंपनीला खाजगी काट्यावर केलेल्या वजनानुसार रक्कम मोजत आहे. वजनकाट्याचे काम आतापर्यंत पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु वजनकाटा बांधकामातच अडकला आहे. वजनकाट्यासाठी पाया तयार करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादfundsनिधी