शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगाव तालुक्यात १७ पाणी योजनांची वीज तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : ३१ मार्चअखेर संपूर्ण थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्याची मोहीम हाती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : ३१ मार्चअखेर संपूर्ण थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. कोपरगाव तालुक्यातील दोन वर्षापासून थकबाकी न भरणाऱ्या १५ ग्रामपंचायतीच्या १७ पाणीपुरवठा योजनाचे वीज कनेक्शन बुधवारपर्यंत तोडले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित केल्याने या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.

कोपरगाव तालुक्यात एकूण ७९ गावे असून ७५ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी कोपरगाव महावितरण कार्यालयांतर्गत तालुक्यातील एकूण ५५ गावे आहेत. तर उर्वरित २४ गावे ही राहाता उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येतात. कोपरगाव कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या १५ ग्रामपंचायतींचा तर राहाता उपविभागांतर्गत २ गावच्या असा एकूण १७ पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा तोडण्यात आला आहे. यात धोंडेवाडी ग्रामपंचायतीची ८ लाख ६१ हजार ६३७ सर्वाधिक तर मळेगाव थडी २० हजार ९२४ इतकी सर्वात कमी थकबाकी आहे.

.............

गावांची थकबाकी अशी..

येसगाव- ७४,२११.

अंचलगाव दोन योजना- १,००,५४०.

माहेगाव देशमुख - ६२,२८५.

कुंभारी - २५,९३१.

हिंगणी- १,७७,४३८.

करंजी- १,२८,६९२.

मळेगाव थडी -२०,९२४.

कारवाडी- मंजूर-४,९२,७१४.

वेळापूर - ५७,०३६.

चासनळी - १,४९,१९२.

हंडेवाडी- १,३३,०७३.

वडगाव - १,१९,६५४.

कोळगाव थडी दोन योजना- ६,९०,२८४.

सडे -५,८८,६७७

धोंडेवाडी-८,६१,६३७

..................

आजी-माजी आमदारांच्या गावातील वीज कट

कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या माहेगाव देशमुख ग्रामपंचायत तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या येसगाव ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचा थकबाकीमुळे महावितरणने वीज पुरवठा तोडला आहे. येसगाव ग्रामपंचायत ही गेली अनेक वर्ष कोल्हे यांच्याच ताब्यात आहे.

........

मार्चअखेर सर्वच प्रकारच्या ग्राहकांची विजेची थकबाकी वसूल करण्यासंदर्भात आदेश आहेत. वरिष्ठांकडून थकबाकी वसूल होत नसेल तर थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करून थकबाकी वसूल करा, असे कडक निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ही मोहीम हाती घेतली आहे.

- दिनेश चावडा, उपकार्यकारी अभियंता, महावितरण उपविभाग, कोपरगाव.

..............

गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायतीची पाणीपट्टीची वसुलीच झालेली नाही. त्यामुळे वीजबिल भरता आली नाहीत. यापूर्वी असा प्रसंग निर्माण झाल्यास १४ व्या वित्त आयोगाचा निधी ४५ दिवस वापरायला मिळत होता. त्यातून वीजबिल भरून पाणीपट्टी वसूल झाल्यानंतर घेतलेली रक्कम पुन्हा १४ व्या वित्त आयोगात जमा केली जात होती. परंतु तो आयोग आता संपला असून १५ व्या वित्त आयोगात तशी तरतूद नाही. त्यामुळे अडचणीचे ठरत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी ग्रामसेवकांची बैठक घेणार आहे.

- सचिन सूर्यवंशी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कोपरगाव.