बाजार समितीचे माजी सभापती दीपक पटारे यांचे संस्थेवर वर्चस्व आहे. संस्थेच्या १३ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार सत्ताधारी गटाच्या १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी पात्र उमेदवार मिळू शकला नाही. त्यामुळे २५ जानेवारीला अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी बिनविरोध निवडणूक पार पडणार आहे.
दरम्यान, शेतकरी संघटनेचे पश्चिम विभागाचे प्रमुख बाळासाहेब पटारे, ठमाकांत साळवे, हरिभाऊ पटारे, कानिफनाथ चव्हाण, सोपानराव बोरूडे, संजय इंगळे, नानासाहेब बोरूडे, जयदीप पटारे, सुधीर भापकर यांनी पुणे येथील निवडणूक प्राधिकरण व सहायक निबंधक यांच्याकडे हरकत दाखल केली आहे. गोपनीयरित्या निवडणूक पार पाडण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफीनंतर संस्थेचे एक हजारांहून अधिक सभासद मतदानासाठी पात्र आहेत. मात्र, असे असताना मागील वर्षाच्या सभासद यादीवरून हा निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. त्यासाठी केवळ ६७ सभासद पात्र ठरले आहेत. याचाच अर्थ मोजकेच सभासद संस्थेचे भविष्य ठरविणार का? असा आक्षेप बाळासाहेब पटारे यांनी हरकतीमध्ये नोंदविला आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे पटारे यांनी सांगितले.
-----------
निवडणूक प्राधिकरणाने मान्यता दिल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्याकरिता निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. दाखल झालेल्या हरकतींवर आम्ही खुलासा केला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया नियमांनुसारच घेण्यात आली आहे.
- विजयसिंह लकवाल, सहायक निबंधक,श्रीरामपूर
------------