शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

'आता मागे हटायचं नाही', 27 मार्चला मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 16:27 IST

शेतकऱ्यांची झालेली लूट आम्ही परत मागत आहोत, ती कर्जमाफी नव्हे. उद्योगांची करमाफी व कर्जमाफी मिळून सरकारने 18 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली.

अहमदनगर : नाशिकमधून 20 पासून शेतकऱ्यांचा लाँग मार्च सुरू होईल. 27 ला तो मंत्रालयावर पोहोचेल. अद्यापही मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, असा आरोप अजित नवले यांनी केला आहे. शहरी लोक म्हणतात, किती कर्जमाफी करायची. पण, त्यांना सांगा प्रत्येकवेळी शेतकरी लुटला गेला. शेतमालाचे भाव वाढले की सरकार भाव पाडते, कीटकनाशकांचा भाव सरकारला ठरविता येते नाही. पण सरकार शेतमालाचे भाव वाढले की हस्तक्षेप करते. यातून शेतकर्यांची लूट होत असल्याचेही अजित नवले यांनी म्हटले. 

शेतकऱ्यांची झालेली लूट आम्ही परत मागत आहोत, ती कर्जमाफी नव्हे. उद्योगांची करमाफी व कर्जमाफी मिळून सरकारने 18 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. त्यावर कोणी ओरडत नाही. त्यांना का कर्जमाफी म्हणून कोणी आक्षेप घेत नाही. मग, शेतकऱ्यांच्याच बाबतीत असे का. एकाही उद्योजकाने आत्महत्या केली नाही. इकडे शेतकरी रोज मरत आहेत. शेतकरी आणि उद्योजक दोघेही भारताचे नागरिक आहेत. पण दोघांनाही वेगवेगळा न्याय का.?

आता, सरकारशी धोरणात्मक निर्णयाचा, न्यायालयीन लढाईचा आणि तिसरा टप्पा रस्त्यावरच्या लढाईचा असेल. आता, संपूर्ण कर्जमुक्तीशिवाय मागे हटायचे नाही. पॉलिहाऊस शेतकऱ्यांवर 10 लाख, 20 लाख, 40 लाख कर्ज आहे. सरकारने या शेतकऱ्यांना दीड लाखाची कर्जमुक्ती देऊ केली. पण, उर्वरित कर्ज भरण्याची अट टाकली. म्हणजे आम्ही 10, 20 लाख भरायचे आणि दीड लाख घ्यायचे. ही सरकारची कर्जमुक्ती नाही कर्ज वसुली मोहीम सरकारने राबवली. जेव्हढे पैसे सरकारने कर्ज माफीत दिले नाहीत, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने वसुली करून घेतली. आता मुख्यमंत्र्यांना सोडणार नाही, पूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असेही अजित नवले यांनी अहमदनगर येथील राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषदेत बोलताना म्हटले.  

टॅग्स :MumbaiमुंबईFarmerशेतकरीMantralayaमंत्रालयChief Ministerमुख्यमंत्री