उपविभागीय अभियंता सुहास साळवे यांच्याकडे करण्यात आली.
समितीने त्यांच्याकडून प्रकल्पाविषयी माहिती घेतली. पाणी आवर्तनाचे नियोजन ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत जाहीर करावे. कालवा सल्लागार समितीमध्ये संघर्ष समितीच्या प्रतिनिधींचा समावेश करावा.
अशा विविध मागण्या करण्यात आल्या. या वर्षीची पाणी मागणी शेतकऱ्यांनी वेळेत नोंदवा, असे
आवाहन त्यांनी केले. कुकडी पाणी संघर्ष समिती लाभक्षेत्रातील शेतकरी व
जलसंपदा विभाग यांच्यात समन्वय साधून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. प्रकल्पातील पाण्याचे लाभक्षेत्रानुसार समान वाटप होण्याकरिता कुकडी पाणी संघर्ष समिती राज्य जलसंपत्ती प्राधिकरणाकडे याचिका दाखल
करत आहे. याविषयीचे काम सध्या काम चालू असल्याची माहिती समितीचे सचिव मंगेश सालके यांनी दिली. यावेळी समितीचे प्रतिनिधी रामदास घावटे, मंगेश सालके, सतीश रासकर, नवनाथ सालके
उपस्थित होते. अभियंता सुहास साळवे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी हक्काची पाणीपट्टी भरली तर पाणी सोडण्यास आम्हाला कोणतीही अडचण नाही.
--------
फोटो ओळी - २६कुकडी निवेदन
पारनेर तालुक्यातील जवळा येथील संघर्ष समितीच्या वतीने रामदास घावटे, मंगेश सालके, नवनाथ सालके आदींनी कुकडी जलसिंचन अभियंत्यास निवेदन दिले.