शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नगर जिल्ह्यात यंदा डेंग्यूच्या रुग्णात घट; मलेरियाही नियंत्रणात; डॉ.रजनी खुणे यांची माहिती

By अनिल लगड | Updated: July 17, 2020 11:09 IST

नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या वातावरणात कीटकजन्य आजार फैलावण्याचा मोठा धोका असतो. या पार्श्वभूमीवर मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णात घट झाली आहे. तर मलेरियाची स्थितीतही वाढ किंवा घट नाही. तरी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयाच्या अधिकारी डॉ. रजनी खुणे यांनी बुधवारी (१५ जलै) ‘लोकमत’शी बोलताना केले. 

लोकमत संवाद / 

डेंग्यू, मलेरियाचे मागील वर्षीच्या तुलनेत प्रमाण किती?

- मागील वर्षी जानेवारी ते जून २०१९ अखेर डेंग्यूचे २८ रुग्ण होते. यंदा फक्त ७ रुग्ण आहेत. त्यात जवळपास २१ रुग्णांची घट आहे. मागील वर्षी ११८ रक्त नमुने गोळा केले होते. यंदा ६० रक्त नमुने गोळा केले. त्यात ७ दूषित रुग्ण आढळून आले आहेत. तर मलेरियाचे मागील वर्षी ३ लाख ७ हजार ५९७ रक्त नुमने घेतले होते. त्यात फक्त २ रुग्ण आढळून आले होते. यावर्षी २ लाख ६४ हजार ३०० रक्त नमुने गोळा केले होते. त्यात २ रुग्ण आढळून आले. २०२५ पर्यंत जिल्ह्यात मलेरियाची निर्मूलन करण्यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयाची वाटचाल सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या प्रमाण १२.०६ टक्क्यांनी घटले आहे. तर मलेरियात शून्य टक्क्यांची वाढ अथवा घट आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरियाची कशी तपासणी केली जाते?- जिल्हा हिवताप कार्यालयाचे कामकाज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत माध्यमांव्दारे जनजागृती करीत आहोत. याबाबत सर्व आरोग्य कर्मचारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांनाही मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत. हे सर्व रात्रंदिवस कोरोना रोखण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

या आजारांपासून कशी काळजी घ्यावी?-डेंग्यू, मलेरिया हे दोन्ही आजार गंभीर आहेत. हे दोन्ही कीटकजन्य आहेत. कीटकांपासून ते होतात. यात आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यासाठी नागरिकांनी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. व्हेंटपाईलपला जाळी बांधावी. घराच्या बाजूच्या पाणी साचणा-या वस्तूचा नायनाट करावा. उदा. छोटे डब्बे, फुटके कप, नारळ कवट्या, टायर्स, बाटलीचे झाकणे, निरोपयोगी वस्तू. खड्डे बुजवावेत. घराच्या खिडक्यांना जाळी बसवावी. झोपताना डांस प्रतिबंधक अगरबत्ती लावावी.

जिल्हा हिवताप कार्यालयाने याबाबत काय उपाययोजना केल्या आहेत?- आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन ताप रुग्णांचे रक्तनमुने घेतात. त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. यात रुग्ण दूषित आढळला तर त्याला समूळ उपचार देण्यात येतो. कीटकशास्त्रीय सर्वेक्षणामध्ये आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा सेविका यांच्यामार्फत घरोघरी जाऊन परिसरातील पाणीसाठे तपासणी करीत आहेत. दूषित आढळलेली कंटेनर त्वरित निकाम केली जातात. रिकामे न करण्यासारख्या कंटेनरमध्ये अ‍ॅबेट टाकले जाते. गप्पीमासे सोडण्यायोग्य डासोत्पत्ती स्थानामध्ये डासअळी भक्षक गप्पीमासे सोडण्यात येत आहेत. संशयित डेंग्यू रुग्णांचे  रक्तजल नमुने संकलित करून नगरमधील सेंटीनल सेंटरमध्ये तपासणीसाठी पाठिवले जात आहेत. दूषित आढळलेल्या रुग्णाच्या परिसरात जलद ताप सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येते. डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून नागरिकांची जनजागृती केली जाते. जून २०२० मध्ये हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात आला. जुलै २०२० मध्ये डेंग्यू प्रतिरोध महिना साजरा करण्यात येत आहे, असेही डॉ. रजनी खुणे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरdengueडेंग्यूHealth Tipsहेल्थ टिप्सdocterडॉक्टर