शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नऊ मेपासून सुटणार कुकडीचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:21 IST

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून ९ मेपासून आवर्तन सोडण्यात येणार आहे. ‘टेल टू हेड’ पद्धतीने पाणी नियोजन करण्यात ...

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून ९ मेपासून आवर्तन सोडण्यात येणार आहे. ‘टेल टू हेड’ पद्धतीने पाणी नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यास कुकडीचे पाणी मिळण्यास जून महिना उजाडणार आहे. त्यामुळे तालुक्यातील फळबागधारक शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

कुकडी प्रकल्पातील पाण्याचे नियोजन आणि राजकारण यामुळे आवर्तन सुटण्यास तब्बल महिनाभर उशीर झाला. अशा परिस्थितीत या आवर्तनाची आस शेतकऱ्यांना आहे. कुकडीच्या आवर्तनासाठी साडेतीन टीएमसी पाणी वापरले जाणार आहे. मात्र, शेतकऱ्यांना १.८ टीएमसीच पाणी मिळणार आहे. इतर पाण्याची जलसंपदा विभागाने गळती धरली आहे. कालवा गळतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हा चिंतेचा विषय असून गळतीचे प्रमाण का वाढत आहे, यावर विचारमंथन होण्याची गरज आहे.

करमाळा तालुक्यास आठ दिवसांत ०.३७६ टीएमसी, कर्जत तालुक्यास अकरा दिवसांत ०.५६० टीएमसी, श्रीगोंदा तालुक्यास साडे सात दिवसांत ०.६१५ टीएमसी, तर पारनेर तालुक्यास अडीच दिवसात ०.२५० टीएमसी पाणी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. हे पाणी फळबागांना प्राधान्याने देणे आवश्यक आहे. जर गावोगावचे तलाव भरण्याची यादी पुढे आली, तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे आवर्तन मृगजळच ठरू शकते ही वस्तुस्थिती आहे.

---

आवर्तन कालावधीत बंदोबस्त..

सध्या कोरोना महामारीची जमावबंदी आदेश १४ मेपर्यंत आहेत. हे आदेश ३१ मे पर्यंत वाढण्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यामुळे कालव्यावर शेतकऱ्यांना एकत्र येण्यास मनाई हुकूम राहणार आहे. पाण्याची तीव्रता पाहता आवर्तन कालावधीत पोलीस बंदोबस्त ठेवण्याची वेळ पोलिसांवर येण्याची शक्यता आहे.