शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा कोप, अत्यंसंस्कारावरच पालिकेचे २५ लाख खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनाच्या संकट काळात सामाजिक बांधिलकी जपत मृत रुग्णांवर महापालिकेने अंत्यसंस्कार केले. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कोरोनाच्या संकट काळात सामाजिक बांधिलकी जपत मृत रुग्णांवर महापालिकेने अंत्यसंस्कार केले. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना ऐनवेळी धावपळ करावी लागली नाही. शहर व ग्रामीण भागातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मनपाचे आतापर्यंत सुमारे २५ लाख रुपये खर्च झाले आहेत.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात न देता प्रशासनाकडून अंत्यविधी केला जात आहे. ही जबाबदारी अहमदनगर महापालिकेने स्वीकारली आहे. महापालिकेवर वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच टीका होत असते. परंतु, कोरोनाच्या संकट काळात महापालिकेने केलेले हे काम शहरासह जिल्ह्यातील नागरिकांच्या कायमच स्मरणात राहील, असेच आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मृत्यूचा आकडा ६० वर पोहोचला होता. मनपाच्या नालेगाव येथील अमरधाम येथे एकच विद्युत दाहिनी होती. विद्युत दाहिनीत अंत्यविधी करण्यासाठी दीड तास लागतो. त्यामुळे अंत्यविधीसाठी वेटिंग होती. ही गरज लक्षात घेऊन मनपाने नालेगाव अमरधाम येथे आणखी एक विद्युत दाहिनी बसविली. परंतु, मृत्यूची संख्या वाढल्याने मनपाने लाकूड व गोवऱ्यांवर अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. पण, यामुळे सर्वत्र धुराचे लोळ पसरत होते. त्यामुळे महापालिकेने सावेडी कचरा डेपोत पत्र्याचे शेड उभारून तिथे अंत्यविधी करण्यास सुरुवात केली. महापालिकेने अंत्यविधी करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक केली. त्यांना प्रति दिवस ७०० रुपये रोजंदारी देण्यात आली. तसेच विद्युत दाहिनीची देखभाल दुरुस्ती, लाकूड व गोवऱ्यांसाठीही मनपाला पैसे मोजावे लागले. महापालिकेने नातेवाइकांकडून एक रुपयाही न घेता अंत्यविधीचा खर्च केला.

...

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित - २ लाख ६९ हजार ५६२

बरे झालेले - २ लाख ६० हजार ९१०

सध्या उपचार घेत असलेले - ५ हजार ८१

एकूण मृत्यू - ३ हजार ५७१

.....

एका अंत्यविधीसाठी ३ हजार ८०० रुपये

महापालिकेने अंत्यविधीसाठी चार स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे. त्यासाठी त्यांना प्रत्येकी ७०० रुपये रोज देण्यात येतो. चार स्वयंसेवकांचे २ हजार ८०० रुपये संबंधित संस्थेला दिले जात असून, विद्युत दाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रत्येकी १ हजार रुपये खर्च येतो. असे म्हणून एका अंत्यविधीसाठी ३ हजार ८०० रुपये खर्च येतो. याशिवाय लाकडावर अंत्यविधी केल्यास लाकूड, गोवऱ्या आदी साहित्यासाठी १ हजार ६०० रुपये लागतात. त्यामुळे अंत्यविधीचा ४ हजार ४०० रुपये खर्च येतो.

.....

अंत्यसंस्काराची जबाबदारी चार स्वयंसेवकांवर

महापालिकेने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक केली असून, अंत्यविधी करण्याची जबाबदारी स्वयंसेवकांवर आहे.

.....

- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. जिल्हा रुग्णालयातून मृतदेह नालेगाव किंवा सावेडी अमरधाम येेथे आणून अंत्यविधी करण्यात येत आहेत. हा सर्व खर्च महापालिका करत आहेत.

- सादिक पठाण, पर्यवेक्षक मनपा

--