शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ने वाढविली चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST

अहमदनगर : जिल्ह्याने आता कुठेतरी कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू केली होती. मात्र, पुन्हा ‘डेल्टा प्लस’ने चिंतेत भर टाकली आहे. ...

अहमदनगर : जिल्ह्याने आता कुठेतरी कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू केली होती. मात्र, पुन्हा ‘डेल्टा प्लस’ने चिंतेत भर टाकली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासन पुन्हा एकदा डोळ्यात तेल घालून रस्त्यावर उतरले आहे. सुदैवाने नगर जिल्ह्यात एकही ‘डेल्टा प्लस’चा रुग्ण आढळून आला नाही, असे आरोग्य यंत्रणेने सांगितले.

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला होता. दररोज चार हजार रुग्ण आढळून येत होते. तसेच ४० ते ५० जणांचा मृत्यू होत होता. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कडक निर्बंध घातले होते. त्यामुळे तीन ते चार महिने बाजारपेठ ठप्प होती. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली होती. वेळीच उपाययोजना हाती घेतल्याने कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली. काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या चारशे ते पाचशे इतकी आहे. काही तालुक्यात रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहेत. नगर शहरातही १० ते १५ एवढेच दैनंदिन रुग्ण आढळून येत आहेत. एकीकडे जिल्ह्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली असताना दुसरीकडे मात्र ‘डेल्टा प्लस’ने नवे संकट निर्माण केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आला नसला तरी आरोग्य विभागाने ‘डेल्टा प्लस’ची धास्ती घेतली आहे. यावरील उपाययोजना करण्यासाठी प्रशासन तयारीला लागले आहे.

--------------

जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढविली

जिल्ह्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली असली तरी कोरोना तपासणी मात्र थांबविण्यात आली नाही. जिल्हाभरात दररोज १० ते १५ हजार जणांची आरटीपीसीआर व अँटिजेन तपासणी केली जात आहे. कोरोना तपासणी केलेल्या संशयितांच्या तपासणीचा अहवालही लवकर येत असल्याने कोरोनाचे लवकर निदान होत आहे. रुग्ण आढळल्यास तत्काळ उपचारासाठी दाखल केले जात आहे. ज्यांना लक्षणे नाहीत, असे घरीच उपचार घेत आहेत.

------------

धोका अद्याप टळला नाही

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी ‘डेल्टा प्लस’चा धोका कायम आहे. त्यामुळे अजूनही काळजी घ्यावी लागणार आहे. आरोग्य विभाग उपाययोजना करण्यासाठी तत्पर असला तरी जोखीमग्रस्त रुग्ण, तरुण वर्ग यांनी कोरोना लस घेणे आवश्यक आहे. लग्न, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल. मास्क, सॅनिटायझरचा नियमित करणे आवश्यक आहे.

-डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी

-----------------

ही घेतली जातेय खबरदारी...........

सकाळी सात ते दुपारी चारपर्यंतच दुकाने सुरू

सायंकाळी पाचनंतर संचारबंदी लागू

लग्न समारंभास ५०, तर अंत्यविधीला २० जणांना परवानगी

कोरोना नियमांचे पालन बंधनकारक

शनिवार व रविवारी पूर्णपणे बंद

शासकीय व खासगी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती

--------------

डमी आहे.....डमी क्रमांक -८४४