शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कोरोनाने लुटले...माणूस गेला, पैसेही गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : पाच लाख बिल आले...सात लाख बिल आले.....पन्नास हजार बिल आले.... मात्र त्यातील ६० ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : पाच लाख बिल आले...सात लाख बिल आले.....पन्नास हजार बिल आले.... मात्र त्यातील ६० ते ७० टक्केच बिल विमा कंपन्यांनी अदा केले. राहिलेले पैसै आम्हालाच भरावे लागले. मेडिक्लेम पॉलिसीमधील तांत्रिक गुंतागुंत आम्हाला समजली नाही. आमचे पैसे गेले...माणूसही गेला आणि किती लूट झाली तेही आम्हाला समजले नाही, असे कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले. दुसऱ्या एका घटनेत वडील घरात एकमेव कमावते होते. त्यांना त्रास सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केले; मात्र काही तासातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना कोरोना संशयित म्हणून घोषित केले गेले. मृत्यू झालेला असल्याने चाचणीही करता आली नाही; मात्र मृत्यू कोरोना झाला की आणखी कशाने, याचा अहवाल नसल्याने मेडिक्लेम पास झालाच नाही, अशी प्रतिक्रिया नगरमधील एका युवकाने दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची मोठ्या प्रमाणावर लूट झाल्याचे पहायला मिळाले. ६० ते ७० टक्के नागरिकांना विमा कवच असल्याने ते थेट रुग्णालयात दाखल झाल्याचे पहायला मिळाले. विमा कवच असलेल्यांचा मृत्यू झाला आणि आता मेडिक्लेम मिळविण्यासाठी संबंधित कंपनी आणि रुग्णालयांशी भांडावे लागत आहे. अनेक रुग्णांचा कोरोनाचा चाचणी अहवाल प्राप्त नसल्याने विमा कंपन्यांनीनी हात वर केल्याचे प्रकारही नगरमध्ये घडले आहेत. यामुळे कोरोनाचे रुग्ण आणि मयत झालेल्यांचे नातेवाईक अशा सर्वांनाच त्रास सहन करावा लागला.

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत २ लाखांच्यावर नागरिकांना कोरोना झाला होता. त्यातील ३० ते ४० टक्के रुग्णांनी रुग्णालयात उपचार घेतले असून, त्यांनी विमा पॉलिसी काढली होती, असे नगर शहरातील डॉक्टरांनी सांगितले. यामध्ये शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक यांनी आरोग्य विमा काढल्याचे आढळून आले. काहींनी संबंधित कंपनीशी पत्रव्यवहार केल्याचे सांगितले आहे.

------------------

विमा रकमेत कपात कारण....

१) कोरोनाच्या उपचारात महागडी औषधे, डिस्पोजल, पीपीई किट यांसारखे साहित्य विम्यातून वगळलेले असते. त्यामुळे पाच ते दहा लाखांची आरोग्य विमा पॉलिसी असताना उपचाराचा खर्च मात्र दीड ते दोन लाखापर्यंत करण्यात आल्याचे प्रकार घडले.

२) विमा कंपनी पॉलिसी विकताना पूर्ण उपचार खर्च देण्याचा दावा करते; मात्र त्यांच्या पॉलिसीच्या अटी-शर्ती बारकाईने वाचल्यावर, अनेक गोष्टींचे पैसे विमा कंपन्या देत नाहीत, हे स्पष्ट केलेले असते. त्यामुळे उपचाराचे कोटेशन, अप्रुव्हल, विम्याची रक्कम मंजुरी यात तफावत हे रुग्णालयात वादाचे कारण बनते.

३) रुग्णालयात रुग्ण आल्यावर जेव्हा कुटुंबीय विम्याची सुविधा घेण्यासाठी पुढे येतात, तेव्हा त्यांच्यासमोर कॉशलेस आणि खर्चाची प्रतिपूर्ती पर्याय असतात. प्रत्येक व्यक्ती कॉशलेस विम्याची सुविधा मिळविण्याचा प्रयत्न करतो; मात्र, तसे होत नाही. कारण विमा कंपन्यांनी हॉस्पिटलसोबत केलेली संलग्नता अटीनुसार १ टक्क्यांपर्यंत विम्याची रक्कम अदा करते.

-------------

ही घ्या उदाहरणे....

१) नगरमधील एक युवक नऊ दिवस एका खासगी रुग्णालयात कोरोनाचा उपचार घेऊन बरा झाला. त्याला ८५ हजार रुपयांचे एकूण बिल झाले. त्यापैकी विमा कंपनीकडून त्याला ६० हजार रुपये मिळाल्याचे या युवकाने सांगितले.

२)नगरमधील एका रुग्णाच्या नातेवाइकाच्या पत्नीची प्रसूती झाली. त्यांना कोरोना संशयित म्हणून नंतर त्यांच्यावर उपचार केले. त्यासाठी दहा दिवस खासगी रुग्णालयात ठेवून घेतले. बाळ सुखरुप असल्याने त्याला लगेच आईपासून बाजूला केले. नंतर आई सुरक्षित राहिली; मात्र कोरोना पॉझिटिव्हचा कोणताही अहवाल या रुग्णालयाने दिला नसल्याने ४२ हजार रुपयांचे बिल नाहक भरावे लागले, असे संबंधितांनी सांगितले.

-----------------

दुसऱ्या लाटेत रुग्णांवर उपचार-८०,०००

किती जणांचा मेडिक्लेम-२४,०००

किती पैशांचा- १२ ते १५ कोटी

प्रत्यक्ष मंजूर- ८ ते १० कोटी

-----------------