शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
3
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
4
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
5
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
6
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
7
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
8
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
9
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
10
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
11
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
12
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
13
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
14
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
15
मराठा समाजासाठी आमच्या एवढे काम कोणी केले नाही काेणतीही याेजना बंद नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
16
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
17
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
18
भारत-नेदरलँड्स यांच्यात १७ करारांवर स्वाक्षऱ्या; पंतप्रधान मोदी-रॉब जेटेन यांच्यात धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३६ गावांमध्ये दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST

अहमदनगर : दरवर्षी पावसाळ्यापूर्वी साथरोग नियंत्रणासाठी जलस्त्रोत तपासून दूषित पाण्याचा आढावा आरोग्य विभागाकडून घेतला जातो. नगर जिल्ह्यात मागील महिन्यात ...

अहमदनगर : दरवर्षी पावसाळ्यापूर्वी साथरोग नियंत्रणासाठी जलस्त्रोत तपासून दूषित पाण्याचा आढावा आरोग्य विभागाकडून घेतला जातो. नगर जिल्ह्यात मागील महिन्यात १७३१ पाणी नमुने तपासण्यात आले. त्यात ३६ गावांतील ४५ (२.६० टक्के) नमुने दूषित आढळले असून तेथे आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्याच्या तोंडावर नियमितपणे पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. जून महिन्यात जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतांतील १७३१ पाणी नमुने तपासण्यात आले. यातील ४५ नमुने दूषित आढळले आहेत. या ठिकाणी पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. या काळात दूषित पाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. या दृष्टीने प्रशासनाकडून दरवर्षी उपाययोजना केल्या जातात; परंतु ग्रामस्थ खबरदारी घेत नसल्याने दरवर्षी पाणी नमुने दूषित आढळतात.

जलस्त्रोताजवळ उकिरडे, सांडपाणी, शौचालयाचा खड्डा असल्याने स्रोत दूषित झाले आहेत. अशा ठिकाणी ब्लिचिंग पावडरसारखे जलशुद्धीकरण करणाऱ्या औषधी वापरण्याच्या सूचना आहेत. तर काही ठिकाणी जलस्त्रोत बंद करण्याच्याही सूचना आहेत.

------------------

तपासणी केलेले नमुने - १७३१

किती नमुने दूषित - ४५

-----------------

तालुकानिहाय आढावा

तालुका नमुने घेतले दूषित नमुने

नगर १३३ ६

अकोले १७५ ५

जामखेड ११९ ०

कर्जत ७६ ०

कोपरगाव १३५ ३

नेवासा १३८ ०

पारनेर १५१ ०

पाथर्डी १५२ ७

शेवगाव ९३ ५

राहाता ५० १

राहुरी १३० ७

संगमनेर १७० ३

श्रीगोंदा १५४ ०

श्रीरामपूर ५५ ०

--------------------

एकूण १७३१ ४५

---------------------

पारनेर, राहुरी, पाथर्डीत सर्वाधिक दूषित पाणी

जिल्ह्यात आढळलेल्या ४५ दूषित पाणी नमुन्यांपैकी सर्वाधिक ८ नमुने पारनेर, तर प्रत्येकी ७ दूषित नमुने पाथर्डी, राहुरी तालुक्यात आढळलेले आहेत. त्यानंतर नगर तालुक्यात ६ दूषित नमुने आढळले आहेत.

----------

या गावांत दूषित पाणी

नारायणडोहो, कामरगाव, नागरदेवळे, देहरे, नांदगाव, सजलपूर, खिरविरे, देवठाण, संवत्सर, कोळपेवाडी, हतालखिंडी, वडुले, रायतळे, अस्तगाव, जवळा, सांगवीसूर्या, खांडगाव, खिरडे, आल्हनवाडी, पाडळी, चितळी, जवळे, जिरेवाडी, सुलतानपूर खु., आव्हाने बु., आखेगाव, शेकटे खु., विजापूर,अस्तगाव, शिलेगाव, तांदूळवाडी, अंमळनेर, चांदेगाव, जातक, राजापूर, वडगाव पान अशा ३६ गावांत ४५ पाणी नमुने दूषित आढळले आहेत.

---------

दूषित पाणी नमुने असलेल्या गावांना उपाययोजना सुचविल्या आहेत. त्याप्रमाणे गावांनी खबरदारी घेऊन उपाययोजना कराव्यात. पाणी स्त्रोत असलेल्या परिसरात स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.

- डाॅ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

--------------