शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये काँग्रेसचा जनाधार वाढला : बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 19:23 IST

गुजरात राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ८० जागांवर मिळालेला विजय मोठी लक्षणीय बाब आहे. हा विजय म्हणजे काँग्रेस पक्षाचा गुजरातमध्ये जनाधार वाढल्याचे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेसनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

अहमदनगर : गुजरात राज्य विधानसभा निवडणुकीतकाँग्रेसला ८० जागांवर मिळालेला विजय मोठी लक्षणीय बाब आहे. हा विजय म्हणजे काँग्रेस पक्षाचा गुजरातमध्ये जनाधार वाढल्याचे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेसनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.गुजरात प्रदेश काँग्रेसच्या उमेदवार निवड व छाननी समितीच्या अध्यक्षपदी थोरात यांची तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नियुक्ती केली होती. गुजरातमधील काँग्रेस उमेदवार निवडीत व प्रचारात थोरात यांची महत्त्वाची भूमिका होती. या पार्श्वभूमीवर थोरातांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने कायम सर्वधर्म समभावाचा विचार जोपासला. गोरगरिबांना केंद्रबिंदू मानून सातत्याने विकासकामे केली आहे. गुजरात निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर सर्वसामान्य जनतेने मोठा विश्वास दाखविला आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये ५७ जागांवरून ८० जागांवर मिळालेला विजय ही मोठी लक्षणीय बाब आहे. इतर ठिकाणीदेखील काँग्रेसच्या उमेदवारांनी कडवी झुंज दिली आहे. हुकूमशाही विचारसरणी असलेल्या भाजपच्या गुजरातमधील जागा घटल्या आहेत. यापुढे सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष दमदार वाटचाल करीत यश मिळवेल. गुजरातमधील भाजपचा विजय हा दबाव व धनशक्तीचा असून, काँग्रेसचा जनाधार वाढला आहे, असे थोरात म्हणाले.देशात मोदींची लोकप्रियता घसरत असून, भाजप व मोदींचा विकासकामांवर विश्वास नाही. त्यामुळे धार्मिक व जातीय तेढ निर्माण करून राम मंदिरासारखा संवेदनशील विषय निवडणूक काळात बाहेर काढला. काँग्रेसविरुद्ध दर्जाहिन अपप्रचार केला. मात्र मोदी-शहांच्या भूमीत ८० जागांवर मिळविलेला नेत्रदीपक विजय हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर जनतेने टाकलेला मोठा विश्वास असल्याची प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस