शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

गुजरातमध्ये काँग्रेसचा जनाधार वाढला : बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 19:23 IST

गुजरात राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ८० जागांवर मिळालेला विजय मोठी लक्षणीय बाब आहे. हा विजय म्हणजे काँग्रेस पक्षाचा गुजरातमध्ये जनाधार वाढल्याचे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेसनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

अहमदनगर : गुजरात राज्य विधानसभा निवडणुकीतकाँग्रेसला ८० जागांवर मिळालेला विजय मोठी लक्षणीय बाब आहे. हा विजय म्हणजे काँग्रेस पक्षाचा गुजरातमध्ये जनाधार वाढल्याचे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेसनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.गुजरात प्रदेश काँग्रेसच्या उमेदवार निवड व छाननी समितीच्या अध्यक्षपदी थोरात यांची तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नियुक्ती केली होती. गुजरातमधील काँग्रेस उमेदवार निवडीत व प्रचारात थोरात यांची महत्त्वाची भूमिका होती. या पार्श्वभूमीवर थोरातांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने कायम सर्वधर्म समभावाचा विचार जोपासला. गोरगरिबांना केंद्रबिंदू मानून सातत्याने विकासकामे केली आहे. गुजरात निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर सर्वसामान्य जनतेने मोठा विश्वास दाखविला आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये ५७ जागांवरून ८० जागांवर मिळालेला विजय ही मोठी लक्षणीय बाब आहे. इतर ठिकाणीदेखील काँग्रेसच्या उमेदवारांनी कडवी झुंज दिली आहे. हुकूमशाही विचारसरणी असलेल्या भाजपच्या गुजरातमधील जागा घटल्या आहेत. यापुढे सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष दमदार वाटचाल करीत यश मिळवेल. गुजरातमधील भाजपचा विजय हा दबाव व धनशक्तीचा असून, काँग्रेसचा जनाधार वाढला आहे, असे थोरात म्हणाले.देशात मोदींची लोकप्रियता घसरत असून, भाजप व मोदींचा विकासकामांवर विश्वास नाही. त्यामुळे धार्मिक व जातीय तेढ निर्माण करून राम मंदिरासारखा संवेदनशील विषय निवडणूक काळात बाहेर काढला. काँग्रेसविरुद्ध दर्जाहिन अपप्रचार केला. मात्र मोदी-शहांच्या भूमीत ८० जागांवर मिळविलेला नेत्रदीपक विजय हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर जनतेने टाकलेला मोठा विश्वास असल्याची प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस