शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

जि़प़मध्ये बदलाचा निर्णय समितीकडे

By admin | Updated: March 26, 2024 13:47 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या सत्तेत बदल करून युतीसोबत असणारी आघाडी संपुष्टात आणण्याचा निर्णय काँग्रेस- राष्ट्रवादीची राज्यस्तरावर असणारी समन्वय समिती घेणार आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या सत्तेत बदल करून युतीसोबत असणारी आघाडी संपुष्टात आणण्याचा निर्णय काँग्रेस- राष्ट्रवादीची राज्यस्तरावर असणारी समन्वय समिती घेणार आहे. याबाबत अद्याप जिल्हास्तरापर्यंत कोणतीच सूचना अथवा आदेश मिळालेले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली असून काँग्रेसने यासाठी एक पाऊल पुढे यावे, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. दरम्यान, येत्या सप्टेंबरला विद्यमान अध्यक्ष विठ्ठलरव लंघे यांचा कार्यकाळ संपत आहे. यापूर्वी बदल करावा की सप्टेंबरपर्यंत थांबावे, याबाबत गोंधळाची स्थिती आहे. २३ तारखेला राष्ट्रवादीची राज्यस्तरीय बैठक असून यावेळी लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात चर्चा होणार आहे. दोन वर्षापासून जि.प.मध्ये राष्ट्रवादी, सेना आणि भाजपा हे सत्तेत आहे. ७५ सदस्यांपैकी सर्वाधिक ६० सदस्य हे आघाडीचे आहेत. सेना आणि भाजपाचे प्रत्येकी सहा सदस्य आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन्ही पक्षाकडून जि.प. सत्ता बदलाबाबत चर्चा झाली. उपमुख्यमंत्री पवार यांनी तर नगरच्या जाहीर सभेत उस्मानाबाद आणि नगर जिल्हा परिषदेत एकाच वेळी बदल करण्याचे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदल होणार असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीच्या निकालावर बर्‍याच गोष्टी अवलंबून होत्या. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत युतीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात कमालीचे भितीचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेली नरेंद्र मोदी लाट विधानसभा निवडणुकीत कायम राहिली तर आपले काय? हा प्रश्न आघाडीतील नेत्यांसमोर आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेतील संभाव्य बदलाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात विचारणा केली असता, त्यांनी याबाबत राज्य पातळीवर निर्णय होईल आणि तो सर्व मान्य राहिल असे सांगण्यात आले.नगरसह अमरावती, यवतमाळ, उस्मानाबाद आणि कोल्हापूर या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तडजोडी केलेल्या आहे. या ठिकाणी एकाच वेळी सत्ता बदल होणार असल्याचे सांगण्यात आले. येत्या २० सप्टेंबरला विद्यमान अध्यक्ष लंघे यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपणार आहे. यापूर्वी बदल करावा की लगेच निर्णय घ्यावा याबाबत मात्र, गोंधळाची स्थिती आहे.येत्या २३ तारखेला मुंबईत राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीच्या निकालावर मंथन करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी जिल्ह्यातून पक्षाचे मंत्री, आमदार, जिल्हाध्यक्ष आणि लोकसभेचे उमेदवार यांना बोलविण्यात आलेले आहे. (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेतील सत्ता बदलाबाबत लोकसभा निवडणुकीवेळी चर्चा झालेली आहे. काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव एकत्र निर्णय घेतील. जिल्हास्तरावर अद्याप काहीच सूचना नाहीत. -जयंत ससाणे, जिल्हाध्यक्ष,काँग्रेस. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री मधुकरराव पिचड यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे. राज्यस्तरावर असणारी दोन्ही पक्षाची समन्वय समिती याबाबत अंतिम निर्णय घेईल. -घनश्याम शेलार, जिल्हाध्यक्ष,राष्टÑवादी