शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
4
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
5
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
6
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
7
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
8
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
9
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
10
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
11
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
12
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
13
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
14
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
15
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
16
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
17
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
18
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
19
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
20
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!

जि़प़मध्ये बदलाचा निर्णय समितीकडे

By admin | Updated: March 26, 2024 13:47 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या सत्तेत बदल करून युतीसोबत असणारी आघाडी संपुष्टात आणण्याचा निर्णय काँग्रेस- राष्ट्रवादीची राज्यस्तरावर असणारी समन्वय समिती घेणार आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या सत्तेत बदल करून युतीसोबत असणारी आघाडी संपुष्टात आणण्याचा निर्णय काँग्रेस- राष्ट्रवादीची राज्यस्तरावर असणारी समन्वय समिती घेणार आहे. याबाबत अद्याप जिल्हास्तरापर्यंत कोणतीच सूचना अथवा आदेश मिळालेले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली असून काँग्रेसने यासाठी एक पाऊल पुढे यावे, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. दरम्यान, येत्या सप्टेंबरला विद्यमान अध्यक्ष विठ्ठलरव लंघे यांचा कार्यकाळ संपत आहे. यापूर्वी बदल करावा की सप्टेंबरपर्यंत थांबावे, याबाबत गोंधळाची स्थिती आहे. २३ तारखेला राष्ट्रवादीची राज्यस्तरीय बैठक असून यावेळी लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात चर्चा होणार आहे. दोन वर्षापासून जि.प.मध्ये राष्ट्रवादी, सेना आणि भाजपा हे सत्तेत आहे. ७५ सदस्यांपैकी सर्वाधिक ६० सदस्य हे आघाडीचे आहेत. सेना आणि भाजपाचे प्रत्येकी सहा सदस्य आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन्ही पक्षाकडून जि.प. सत्ता बदलाबाबत चर्चा झाली. उपमुख्यमंत्री पवार यांनी तर नगरच्या जाहीर सभेत उस्मानाबाद आणि नगर जिल्हा परिषदेत एकाच वेळी बदल करण्याचे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदल होणार असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीच्या निकालावर बर्‍याच गोष्टी अवलंबून होत्या. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत युतीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात कमालीचे भितीचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेली नरेंद्र मोदी लाट विधानसभा निवडणुकीत कायम राहिली तर आपले काय? हा प्रश्न आघाडीतील नेत्यांसमोर आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेतील संभाव्य बदलाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात विचारणा केली असता, त्यांनी याबाबत राज्य पातळीवर निर्णय होईल आणि तो सर्व मान्य राहिल असे सांगण्यात आले.नगरसह अमरावती, यवतमाळ, उस्मानाबाद आणि कोल्हापूर या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तडजोडी केलेल्या आहे. या ठिकाणी एकाच वेळी सत्ता बदल होणार असल्याचे सांगण्यात आले. येत्या २० सप्टेंबरला विद्यमान अध्यक्ष लंघे यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपणार आहे. यापूर्वी बदल करावा की लगेच निर्णय घ्यावा याबाबत मात्र, गोंधळाची स्थिती आहे.येत्या २३ तारखेला मुंबईत राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीच्या निकालावर मंथन करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी जिल्ह्यातून पक्षाचे मंत्री, आमदार, जिल्हाध्यक्ष आणि लोकसभेचे उमेदवार यांना बोलविण्यात आलेले आहे. (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेतील सत्ता बदलाबाबत लोकसभा निवडणुकीवेळी चर्चा झालेली आहे. काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव एकत्र निर्णय घेतील. जिल्हास्तरावर अद्याप काहीच सूचना नाहीत. -जयंत ससाणे, जिल्हाध्यक्ष,काँग्रेस. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री मधुकरराव पिचड यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे. राज्यस्तरावर असणारी दोन्ही पक्षाची समन्वय समिती याबाबत अंतिम निर्णय घेईल. -घनश्याम शेलार, जिल्हाध्यक्ष,राष्टÑवादी