शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यात लागू ...

अहमदनगर : जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यात लागू झाली आहे. त्यामध्ये नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्राचाही समावेश आहे. मात्र, महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करायची की नाही ? याबाबत जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवले आहे.

जिल्ह्यातील एकूण १३१८ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ७६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या ६६७ इतकी आहे. ही संख्या निम्म्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्राचाही समावेश आहे. नगरपालिका क्षेत्र आणि ग्रामपंचायत क्षेत्र यामध्ये फारसे अंतर नसते. त्यामुळे नगपपालिका क्षेत्राशी संबंधित विकास कामांचा, कार्यक्रमांचा मतदारांवर प्रभाव निर्माण होऊ शकतो. शेजारील गावांचाच नगरपालिका हद्दीत समावेश होतो. या गावांच्या लगतच अनेक ग्रामपंचायती असतात. त्यामुळे आचारसंहितीची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात आहे.

-------------

एकूण संख्येपैकी निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींची निवडणूक असेल तर संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू केली जाते. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात सगळीकडे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करायची की नाही, याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवले आहे. हे मार्गदर्शन राज्यासाठीही उपयुक्त राहील.

-ऊर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी, महसूल

-----------

सव्वामहिना आचारसंहिता

११ डिसेंबरला निवडणूक जाहीर झाली. त्या दिवसापासून ते १८ जानेवारीपर्यंत आचारसंहिता असेल. या कालावधीत मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही कृती खासदार, आमदार, स्थानिक संस्थांमधील लोकप्रतिनिधी यांना करता येणार नाही. जी विकास कामे अर्धवट किंवा प्रगतिपथावर आहेत, अशी कामे आचारसंहिता काळातही करता येतील. कोविडसंबंधित किंवा अत्यावश्यक कामांना आचारसंहितेमधून वगळण्यात आले आहे.