शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

‘गुरुकुल’च्या काळातील अहवाल तपासून पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:25 IST

अहमदनगर : शिक्षक बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा एकूण कारभार हा अत्यंत सभासदाभिमुख व समाजामध्ये शिक्षकांची प्रतिमा बुलंद करणारा आहे. ...

अहमदनगर : शिक्षक बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा एकूण कारभार हा अत्यंत सभासदाभिमुख व समाजामध्ये शिक्षकांची प्रतिमा बुलंद करणारा आहे. भ्रष्टाचाराचा कोणताही मुद्दा या संचालक मंडळाने हाताळलेला नाही. कारभारावर नावे ठेवण्यासाठी विरोधकांकडे मुद्देच नसल्याने अहवालातील फोटोंना अल्बमची उपमा देण्याचा केविलवाणा प्रयत्न गुरुकुल मंडळाच्या नेतेमंडळींनी केला आहे. मात्र एकदा त्यांनी इतिहासामध्ये जाऊन त्यांच्या काळातील अहवाल तपासून पाहावे, असा सल्ला गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांनी दिला.

रविवारी (दि. २९) होणाऱ्या शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने सध्या जिल्ह्यात पत्रकबाजीला उधाण आले आहे. सत्ताधारी व विरोधी गटाकडून वेगवेगळे आरोप एकमेकांवर केले जात आहेत. शुक्रवारी गुरुकुल मंडळाचे नेते संजय कळमकर यांनी सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाबद्दल अनेक आक्षेप घेतले होते. त्याला उत्तर देताना साळवे म्हणाले, सर्व फोटो नियमानुसार घेतलेले आहेत. बँकेकडून परागंदा शिक्षकांचे हप्ते सभासद मयत कर्ज निवारण निधीमधून तात्पुरते भरण्यात येतात. तसेच जे सभासद नोकरीवर हजर झाले आहेत, त्यांच्याकडून कर्ज वसूलही करण्यात आले आहे. ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते. परागंदा शिक्षकांच्या कर्जाचे ह्प्ते मयत सभासद कर्ज निवारण निधीतून भरण्याच्या प्रक्रियेला आरबीआयने आक्षेप घेतलेला असल्याने ती पद्धत बंद झाली आहे. मात्र जामीनदारांना त्रास होऊ नये म्हणून तात्पुरती व्यवस्था म्हणून मयत सभासद निधीमधून ते भरले जातात. मात्र ते माफ केले जात नाहीत. याची शहानिशा विरोधकांनी केली. आमच्या संचालक मंडळाच्या कारभाराला नावे ठेवणाऱ्यांनी त्यांच्या काळातील बनावट विमा पॉलिसी देणे, कर्मचाऱ्यांच्या बदल्या, बोनस, रजा पगार, मेहनताना व अशा अनेक गोष्टी आठवाव्यात, असेही ते म्हणाले.

विद्यमान संचालकांनी पाच वर्षांच्या काळात सभासदाभिमुख कारभार केल्याचे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष विठ्ठल फुंदे यांनी यावेळी सांगितले.

त्यांच्या काळातील कारभाराचे मार्जिन किती टक्के होते, हेही त्यांनी तपासून पाहावे, असा खोचक सल्ला गुरुमाऊली मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांनी दिला आहे.

........................

ही तर कळमकरांची वैचारिक दिवाळखोरी

विद्यमान संचालक मंडळाने पहिल्यावर्षी विकास मंडळ उभारणीसाठी निधी देण्याबाबत ठराव केला असता, ‘गुरुकुल’चे नेते संजय कळमकर यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. त्यासाठी आंदोलनदेखील करण्यात आले होते. आता मात्र इमारतीसाठी विकास मंडळाला बँकेने मदत करावी, असे कळमकर म्हणत आहेत. त्यांच्यामध्ये असे अचानक परिवर्तन का झाले? ही त्यांची वैचारिक दिवाळखोरी आहे. त्यांना सुद्धा एखादा गाळा देण्याचे आश्वासन मिळाले काय? असे प्रश्न साळवे यांनी उपस्थित केले आहेत.