शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

चितळे रोडवर सर्वाधिक वर्दळ, वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST

-------------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहरातील चितळे रस्त्यावर सर्वाधिक वर्दळ आहे. भाजी विक्रेते रस्त्यांच्या दोन्ही बाजूने पथारी टाकून ...

--------------

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : शहरातील चितळे रस्त्यावर सर्वाधिक वर्दळ आहे. भाजी विक्रेते रस्त्यांच्या दोन्ही बाजूने पथारी टाकून बसतात. त्यात चारचाकी व दुचाकी वाहनांची गर्दी होत असल्याने या मार्गावर पायी चालणे कठीण झाले आहे. याकडे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील लहान मोठी अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. टपरीमार्केट मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. परंतु, मध्यवर्ती शहरातील कापडबाजार व चितळे रस्त्यावरील गर्दीकडे मात्र पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. चितळे रस्त्यावर कोरोना काळातही प्रचंड गर्दी होत आहे. भाजीविक्रेते सकाळपासूनच पथारी टाकून बसतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूने विक्रेते बसत असल्याने वाहतूकीसाठी रस्ता शिल्लक राहत नाही. त्यात भाजी खरेदीसाठी आलेल्यांना नागरिकांचीही वर्दळ असते. त्यात दुचाकी व चारचाकी वाहनांचीही या मार्गावर ये-जा सुरू असते. हा रस्ता आधीच अरुंद आहे. या मार्गावर पालिकेने फुटपाथच ठेवलेला नाही. फुटपाथ नसल्याने पादचाऱ्यांनी या मार्गावरून चालायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे

शहरातील दिल्लीगेट ते चौपाटी कारंजा, चौपाटी कारंजा ते माळीवाडा वेस, नवीपेठ, माणिक चौक, तेलीखुंट, या मार्गावर गर्दी होते. नागरिकांना रोजच वाहतूकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक कोंडीचा सर्वाधिक त्रास पायी चालणाऱ्यांना होतो. शहरातील फुटपाथ गायब झालेले आहेत. फुटपाथवर दुकानदारांनी पक्की बांधकामे केली असून, यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.

....

फुटपाथ कागदावरच

शहरात नव्याने रस्ते तयार करताना फुटपाथची तरतुद करण्यात येते. रस्त्यांच्या अंदाजपत्रकात फुटपाथची कागदोपत्री नोंद असते. प्रत्यक्षात शहरातील अंतर्गत रस्त्यांचे फुटपाथ गायब आहेत. फुटपाथवर पक्के बांधकाम, टपऱ्याच्या थाटण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पायी चालणाऱ्यांची मोठी गैरसाेय होत असून,याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

.....

अतिक्रमण हटाव मोहीम दाखवायलाच

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्यावतीने शहरात दररोज पथारीवाल्यांना हाटविले जाते. परंतु, रस्त्यांवर केलेले पक्के अतिक्रमण हटविले जात नाही. वर्षानुवर्षे ही अतिक्रमणे जैसे थे आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

....

- अतिक्रमण निर्मूलनासाठी महापालिकेने मोहीम सुरू केलेली आहे. पहिल्या टप्प्यात मोठी अतिक्रमणे हटविण्यात येणार असून, त्यानंतर फुटपाथही मोकळे करण्याची मोहीम राबविण्यात येईल.

- के. वाय. बल्लाळ, प्रमुख अतिक्रमण निर्मूलन विभाग

...