शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत विखेंची सत्ता आल्यानंतर कामांना ब्रेक : भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 17:52 IST

जिल्ह्यात विकास कामे करताना सरकारने कधीच दुजाभाव केला नाही. जिल्ह्यातील विकास कामांना सुद्धा कधी निधीची कमतरता पडू दिली नाही,

अहमदनगर : जिल्ह्यात विकास कामे करताना सरकारने कधीच दुजाभाव केला नाही. जिल्ह्यातील विकास कामांना सुद्धा कधी निधीची कमतरता पडू दिली नाही, पण जो निधी दिला त्याचा साधा उपयोग सुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या पदाधिका-यांना करता आला नाही. स्वत:चे उपयश झाकण्यासाठी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी पालकमंत्र्यांवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. कधी प्रशासनावर तर कधी विरोधकांवर आरोप करण्याचा नवा फंडाच विखे कुटूंबियांनी सुरु केला कि काय असा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनी लावला आहे.बेरड म्हणाले, विकास कामांना कधीच निधी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कमी पडू दिला नाही. याउलट विखेंची सत्ता जिल्हा परिषदेत आल्यानंतर विकास कामांनाच ब्रेक लागला. कालच्या सभेत तर जिल्हा परिषद हि ठेकेदारांसाठीची संस्था आहे. हा घणाघाती आरोप त्यांच्याच सहकारी पक्षाने करुन विखेंचे वाभाडे एक प्रकारे काढले आहे. हिच पावती विखे यांना काल सभागृहात त्यांच्या कामाची मिळाली. असे म्हणाले तर वावगे ठरणार नाही असेच म्हणावे लागेल. प्राथमिक शाळा निंबोडी येथील दुर्घटनेनंतर जिल्हा परिषदेकडून पुनर्विनियोजनाचे लघु पाटबंधारे २५ लक्ष, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे २५ लक्ष, रस्ते २५ लक्ष असे एकूण ७५ लक्ष रुपयांची विशेष तरतुद करण्यात आली. याच बरोबर विशेष सवलतीचे ८ लक्ष व गणवेश व लेखनाचे ३१ लक्ष असे एकूण ३९.५४ लक्ष रुपयांची तरतुद करण्यात आली होती. त्यामुळे एकूणच जानेवारी महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीत ४२५ लक्ष रुपयांची विशेष तरतुद बैठकी मंजुर करण्यात आली. त्याच बरोबर फेब्रुवारी महिन्यात नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत २५० लक्ष रुपयांची तरतुद करण्यात आली. त्यामुळे अंतिम तरतुद ७१४.५४ लक्ष करुन वाढीव तरतुद ३६४.५४ लाख रुपयांची करुनही निधी मिळाला नसल्याच्या वल्गना करणा-यांना ही आकडेवारी पुरेशी आहे. जानेवारी २०१८ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत विशेष निधीची तरतुद करुनही गेल्या ६ महिन्यापासून हे काम कोणामुळे थांबले याचा खुलासा करण्या ऐवजी पालकमंत्र्यांवर आरोप केले म्हणजे विषय संपतो, अशीच जणु जिल्हा परिषदेची धारणा बनत चालली आहे.या अगोदर सुद्धा जिल्हा परिषदेला निधी दिला तो ही परत गेला होता याचा विसर विखेंना पडला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ शालिनी विखे यांची दोन महिन्यापूर्वी प्रशासनावरच आपली गाडी घसरली होती. आमचे कोणी ऐकत नाही असे सांगुन त्यांनी प्रशासनाला आरोपीच्या पिंज-यात उभे केले. बहुदा विखेंचा दराराच कमी झाला हे यातून सिद्ध झाले आहे , असे सर्वत्र बोललेही जात होते ते आता खरे वाटू लागले आहे. विकास कामांना प्राधान्य देण्यापेक्षा, दिलेला निधीचा योग्य पद्धतीने उपयोग कसा होईल यात लक्ष घालण्यापेक्षा प्रत्येकांवरच संशयाची सुई उगारल्यामुळेच अशी अवस्था जिल्हा परिषदेतील सत्त्ताधार्यांची झाली की काय असा प्रश्?न निर्माण झाला आहे.जिल्हा परिषदेला विकास निधी मिळत नाही म्हणुन यांच्याच बगलबच्यांनी आंदोलनाचा इशारा दिला व पालकमंत्र्यांवर तेव्हाही आरोप करुन आपली राजकिय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. पण राज्याचे विरोधी पक्ष नेत्यांनी बहुदा काळाची पावले ओळखुन पालकमंत्र्यांबरोबर बैठक घेवुन आपण विषय मार्गी लावू असे सांगितल्यावरच तात्काळ पालकमंत्र्यांनी बैठक घेतली व निधी उपलब्ध केला. हि वस्तुस्थिती लपवुन राहिली नाही. पण स्व:तच्याच विकासाची कामे पूर्ण न करता, येथेही राजकारण विखे घराण्यांनी केले अनेकांना डावलले त्यातुनही काहींना डावा-उजवा अशी वागणूक दिली हे विखे यांना कितपत शोभते? असा सवाल बेरड यांनी केला आहे.स्वत: चे अपयश झाकण्यासाठी पालकमंत्र्यांना टार्गेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न होताना विखेंकडून दिसू लागला आहे. असा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड यांनी केला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपा