शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक बांधिलकी जपणारे मंडळ

By admin | Updated: September 22, 2015 00:23 IST

अहमदनगर : शहरातील नवीपेठेतील श्री जय आनंद महावीर युवक मंडळाच्यावतीने गेल्या पन्नास वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो़

अहमदनगर : शहरातील नवीपेठेतील श्री जय आनंद महावीर युवक मंडळाच्यावतीने गेल्या पन्नास वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो़ गणेशोत्सवासह वर्षभर विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन हे या मंडळाचे वैशिष्ट्ये आहे़ अशोकभाऊ फिरोदिया, शांतीलाल फिरोदिया, कन्हैयालाल चंगेडिया यांनी सामाजिक कार्याचा घालून दिलेला वारसा आजही पुढे चालवित असल्याचे मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत यांनी सांगितले़ मंडळाच्यावतीने प़ पू़ आनंदऋषी पुण्यतिथीनिमित्त अन्नदान, महिला व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, अनाथांना कपडे व अन्नधान्यांचे वाटप यासह सर्वरोग निदान, रक्तदान व हिमोग्लोबीन तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते़ या मंडळात महिलांचा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला असून, त्यांच्यावतीनेही महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते़ धार्मिक उत्सवातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य गेल्या पन्नास वर्षांपासून केले जात असल्याचे मुनोत यांनी सांगितले.प्रबोधनात्मक देखावे लक्ष्मी कारंजा येथील संकल्प युवक मंडळाच्यावतीने गेल्या पंचवीस वर्षांपासून गणेशोत्सवानिमित्त धार्मिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमांची परंपरा जोपासली जात आहे़ गणेशोत्सवासह मंडळाच्यावतीने वर्षभर महिलांसाठी कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, शालेय साहित्याचे वाटप व गरजुंना मदत दिली जाते़ गणेशोत्सवात मंडळाच्यावतीने दरवर्षी प्रबोधनात्मक देखावा तयार केला जातो़ मंडळाने या वर्षी सावित्रीची वटपूजा हा हलता देखावा साकारला आहे़ डिजे न वाजविता पारंपरिक वाद्य वाजवूनच दरवर्षी श्रींची प्रतिष्ठापना केली जात असल्याचे मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले़ धार्मिक कार्यक्रमगणेशोत्सवानिमित्त शहरातील माळीवाडा पंचमंडळाच्यावतीने दरवर्षी धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते़ भाविकांसाठी त्रासदायक ठरेल, अशा पद्धतींना फाटा देवून प्रबोधनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून हा उत्सव साजरा केला जातो़ यावर्षी दहा दिवस कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे़ पहिल्या दिवशी धीरज ससाणे यांचा महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम झाला़ गणेशयाग, अग्निहोत्र, उत्थापना आदी धार्मिक उत्सवांची परंपरा या मंडळाच्यावतीने जोपासली जात आहे़ शहरातील मानाच्या गणपतींपैकी असलेल्या कपिलेश्वर मंडळाच्यावतीने गणेशोत्सवात गेली अनेक वर्षे धार्मिकतेसह सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते़ दरवर्षी ऐतिहासिक किंवा पौराणिक देखावे सादर केले जातात़ यावर्षी मंडळाच्यावतीने ‘गणेश जन्म’ हा हलता देखावा सादर करण्यात आला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष कैलास गिरवले यांनी सांगितले़ नारळावर श्रीफळेश्वर यात्राअहमदनगर : तीन किलो वजनाच्या मोठ्या तिनाक्षी नारळावर येथील कलाकार अमोल बागूल यांनी १०८ मूर्त्यांसह श्रीफळेश्वर यात्रा मिरवणुकीचा हलता देवाखा घरगुती गणेशोत्सवात सादर केला आहे़ एक फूट लांबीच्या तीन अक्ष, तीन बाजू असलेल्या नारळावरील साकारलेल्या विविध आकर्षक मूर्ती लक्षवेधी आहेत़ या श्रीफळेश्वर यात्रेतील लहान मण्यांमध्ये कोरलेली गणेश मूर्ती, दगडी गणेश मूर्ती, मिरवणुकीत नाचणारे नर्तक, भगवा झेंडा घेतलेले भाविक, वाद, सुपारीवरील महाराष्ट्रातील अष्टविनायक, खडू शिल्पातील नगर शहरातील अष्टविनायक, छोटा भीम, डोरेमॉन, चुटीकी, मि़ बीन, कितरेसू आदी मूर्त्या तयार करून त्यांची आकर्षक पद्धतीने मांडणी केलेली आहे़ शहाळ्याभोवती फिरणारी दिल्लीगेट स्पेशल फुलराणी रेल्वे, संगीतावर चालणारे रहाटगाडगे, चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या, फुलणारे कमळ, कागदी घोडे, कोंबड्यांच्या झुंजीचे खेऴ असा आकर्षक देखावा बागूल यांनी सादर केला आहे़ कागद, पुठ्ठा, लाकूड, माती, नारळ, कापड, आदी निसर्गात सहज विघटन होणाऱ्या पर्यावरणपूरक माध्यमातून बागूल यांनी हा देखावा साकारताना टाकाऊ पासून टिकाऊ या पर्यावरण सुत्राचा वापर केला आहे़