शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
3
हंटाव्हायर बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
4
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
5
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
6
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
7
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
8
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
9
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
10
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
11
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
12
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
14
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
15
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
16
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
17
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
18
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
19
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
20
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आषाढ, चातुर्मासातही शुभमंगल सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:15 IST

जुलै महिन्यात सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो, तेव्हा पंचांगातील आषाढ महिना सुरू होतो. देवशयनी आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. ...

जुलै महिन्यात सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो, तेव्हा पंचांगातील आषाढ महिना सुरू होतो. देवशयनी आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. जुलै ते नोव्हेंबर हा चातुर्मासाचा काळ असतो. देवशयनी म्हणजे देवांचा विश्रांती काळ असतो. तेव्हा उपासना, व्रतवैकल्ये केली जातात. याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या काळात विवाह होत नाहीत, अशी धारणा आहे. मात्र, कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आषाढ महिना आणि चातुर्मासातही विवाह होत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असताना ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून निर्बंध घालून देण्यात आले.

या काळात विवाह सोहळ्यांवर निर्बंध होते. त्यानंतर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाहाला परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास कडक निर्बंध लादले जाऊ शकतात. असेही अनेकांना वाटते. त्यामुळे विवाह सोहळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत का होईना आटोपून घेण्यात येत आहेत. आषाढ महिना आणि चातुर्मासातदेखील विवाह सोहळे होत असल्याचे हेही एक महत्त्वाचे कारण आहे.

-------------

आषाढ, चातुर्मासातील विवाह तारखा

२२, २५,२८, २९ (जुलै), ११, १४, १८,२०,२१, २५, २६, २७, ३०, ३१ (ऑगस्ट)

-------------

घरासमोरच विवाह सोहळे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करायचा असल्याने अनेकांनी घरासमोर मंडप घालून विवाह सोहळे उरकून घेतले. तसेच मंगल कार्यालये, लॉन्स येथेही विवाह सोहळे पार पडत आहेत. मात्र, विवाह कोठेही करत असाल तरीही तो मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पाडावा, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

--------------

अनेकांच्या अनेक अडचणी असतात. त्यामुळे गौण काळात (चातुर्मास काळ) आमच्याकडे अनेक यजमान येतात. त्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी विवाह मुहूर्त ते मागतात. नाईलाज म्हणून त्यांना पंचागांत आलेले आणि वधु-वरांना लाभणारे मुहूर्त आम्ही देतो. कोरोनाच्या संकटात त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, अशीच आमची अपेक्षा असते.

-भाऊराव जाखडी, अध्यक्ष, संगमनेर पुरोहित संघ

------------

आता साखरपुडा करून विवाह निश्चित करता येऊ शकतो. तुळशी विवाह झाल्यानंतर विवाह करू शकतात. शक्यतो आषाढ महिना आणि चातुर्मासात विवाह करणे टाळावे. ते शास्त्राला धरून नसून ते निषिद्ध मानले जाते.

संदीप वैद्य, उपाध्यक्ष, संगमनेर पुरोहित संघ

-----------

दहा हजार रुपयांचा दंड

गर्दी जमवून विवाह सोहळे होत असलेल्या ठिकाणी प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉन्समध्ये रविवारी आयोजित विवाह सोहळ्यात गर्दी झाल्याने पोलिसांनी दंडात्मक करावाई करत दहा हजार रुपयांचा दंड केला.

-----