शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

दिवसातून ५ ते ६ तास व्यवसायाची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:21 IST

दहिगावने : जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी कोरोनाच्या अनुषंगाने ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन केला आहे. हा निर्णय ...

दहिगावने : जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी कोरोनाच्या अनुषंगाने ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन केला आहे. हा निर्णय मध्यमवर्गीय,गरीब जनतेच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. यामुळे हातावर पोट भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून हातावर पोट भरणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना वेळेचे बंधन घालून दिवसातून ५ ते ६ तास व्यवसाय करण्याची परवानगी द्या, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी मराठा महासंघाने शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांना दिले.

हा निर्णय घेताना गोरगरिबांच्या व मध्यम वर्गीयांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. शासकीय नोकरदारांना पगार मिळतो. मोठ्या व्यापाऱ्यांकडे गडगंज संपत्ती आहे. मात्र फेरीवाले, हातगाड्यांवर खाद्यपदार्थ बनवून विकणारे, चहा, पान टपरीवाले, फिटर व्यवसायिक, गॅरेज आदी छोटे व्यावसायिक कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवसायातून चालवत होते. परंतु, या निर्णयामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या संपूर्ण परिणामास शासन म्हणून जिल्हाधिकारी हेच जबाबदार आहेत. म्हणून हातावर पोट भरणारे व छोट्या व्यापाऱ्यांना वेळेचे बंधन घालून दिवसातून कमीत कमी ५ ते ६ तास व्यवसाय चालू ठेवण्यास परवानगी द्यावी. अन्यथा आम्हाला गोरगरिबांच्या व मध्यमवर्गीय लोकांच्या पोटापाण्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा निवेदनात दिला आहे.

निवेदनावर स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष किशोर लोढे, जिल्हा संपर्क प्रमुख सतीश पवार, अनिल सुपेकर, अमोल काटे आदींच्या सह्या आहेत.

--

०८ शेवगाव निवेदन

छोट्या व्यावसायिकांना वेळेचे बंधन घालून व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी मराठा महासंघाने शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांना दिले.