शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

अहमदनगरमध्ये दररोज २० टक्के पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 08:52 IST

महापालिका सध्या मुळा धरणातून दररोज ७५० लाख लिटर पाणी उचलत असून नगरकरांना प्रति माणशी १०० लिटर पाणी मिळते.

अण्णा नवथर

अहमदनगर : महापालिका सध्या मुळा धरणातून दररोज ७५० लाख लिटर पाणी उचलत असून नगरकरांना प्रति माणशी १०० लिटर पाणी मिळते. तब्बल २० टक्केपाण्याची गळती होत असल्याने मध्यवर्ती शहरात दिवसाआड, तर उपनगरांत ३ ते ४ दिवसांनी पाणी दिले जात आहे.अहमदनगर शहराची लोकसंख्या साधारण ४ लाखांच्या घरात आहे. महापालिका जलसंपदा विभागाकडून दररोज ७५ एलडी पाणी घेते. प्रति माणशी १३० लिटर पाणी मिळणे अपेक्षित असताना १०० लिटर मिळते. दोन्ही जलवाहिन्या जुन्या झाल्याने त्यांना वारंवार गळती लागते. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित होतो. धरण खाली आणि शहर वर, अशी स्थिती असल्याने अन्य शहरांच्या तुलनेत अहमदनगर महापालिकेची पाणी योजना खर्चिक आहे. महापालिकेचे मुळानगर, विळद, नागापूर, वसंत टेकडी ही चार पाणी उपसा केंदे्र आहेत. या ठिकाणी बसविण्यात आलेल्या विद्युत पंपांचे वीज बिल दरमहा २ कोटी रुपये येते. दुरुस्तीसाठी येणारा खर्च ४ लाखांच्या घरात आहे. पाणी योजनेचा खर्च मोठा असला तरी त्या तुलनेत पाणीपट्टी वसूल होत नाही. दरवर्षी होणारा तोटा जवळपास १५ कोटींच्या घरात आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी महापालिकेने पाणीपट्टी दुप्पट करण्याचा ठराव २०१७ मध्ये दिला होता; परंतु त्यास मंजुरी दिली नाही. सध्या महापालिका दीड हजार रुपये पाणीपट्टी आकारते. असे असले तरी पाणीपट्टीचे २० कोटी थकीत आहेत.

107 कोटीची अमृत पाणी योजना

२०१० मध्ये ११६ कोटींची शहर सुधारित पाणी योजना, तर २०१७ मध्ये १०७ कोटींची अमृत पाणी योजना मंजूर आहेत; पण त्या अर्धवट असल्याने कमी पुरवठा होतो. शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेतून नगर शहरातील १९ जलकुंभांचे काम पूर्ण झाले आहे; परंतु जलवाहिनीचे काम अपूर्ण असल्याने हे कुंभ पूर्ण क्षमतेने भरत नाहीत.

टॅग्स :environmentपर्यावरणWaterपाणीAhmednagarअहमदनगर